मुंबई : राज्यासह देशाचे डोळे लागून राहिलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल (Maharashtra Assembly Election Result 2019) जाहीर होत आहेत. राज्यातील 288 मतदारसंघातील 3 हजार 237 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला हाती येणार आहे. महाराष्ट्रात भाजप शिवसेना महायुती आपली सत्ता कायम राखणार की काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडी पुन्हा सत्तेवर येणार, याचा फैसला काही तासांमध्ये होणार आहे.