AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजकारणात खळबळ! बड्या नेत्याचे मंत्रिपद जाणार? राष्ट्रवादीकडून जुन्यांसह या नव्या चेहऱ्यांना संधी

राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. लवकरच मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता असून नरहरी झिरवळ यांचे मंत्रिपद जाण्याची शक्यता आहे. त्यांच्या जागी धनंजय मुंढे यांच्यासह सुनील शेळके आणि राजू नवघरे यांचा मंत्रि‍पदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे.

राजकारणात खळबळ! बड्या नेत्याचे मंत्रिपद जाणार? राष्ट्रवादीकडून जुन्यांसह या नव्या चेहऱ्यांना संधी
Maharashtra Cabinet ReshuffleImage Credit source: Google
| Updated on: Jul 14, 2026 | 5:43 PM
Share

गेल्या काही काळापासून राज्यासह केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. अशातच आता राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. लवकरच मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता असून नरहरी झिरवळ यांचे मंत्रिपद जाण्याची शक्यता आहे. त्यांच्या जागी धनंजय मुंढे यांच्यासह सुनील शेळके आणि राजू नवघरे यांचा मंत्रि‍पदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे. विश्वसनीय सूत्रांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे आता संपूर्ण राज्याचे लक्ष आता मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

या नेत्यांना संधी मिळण्याची शक्यता

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंढे आणि सुनील शेळके यांची कॅबिनेटमंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भातून राजू नवघरे यांनाही मंत्रि‍पदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे. तर मंत्री नरहरी झिरवळ यांचे मंत्रिपद जाणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. झिरवळ यांच्यासह इतरही काही मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. त्यांच्या जागी काही नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

धनंजय मुंढे मंत्रिमंडळात परतणार

धनंजय मुंढे यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीनंतर स्थापन झालेल्या महायुती सरकारमध्ये मुंढे यांची वर्णी लागली होती, मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणी त्यांना राजीनामा द्यावा लागला होता, मात्र आता त्यांचा समावेश पुन्हा एकदा मंत्रिमंडळात केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच पुणे जिल्ह्यातून आमदार सुनील शेळके यांचे देखील नाव मंत्रि‍पदासाठी चर्चेत असल्याचे बोलले जात आहे. या दोघांना कॅबिनेटमध्ये स्थान दिले जाऊ शकते. तर विदर्भातून आमदार राजू नवघरे यांनाही मंत्रिमंडळात संधी दिली जाण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दुसरीकडे नरहरी झिरवळ यांच्यासह अनेक काही मंत्र्यांचे मंत्रिपद जाण्याची शक्यता आहे. झिरवळ हे दोन प्रकरणांमध्ये चर्चेत आले होते, त्यामुळे विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. आता आगामी मंत्रिमंडळ विस्तारात त्यांच्या जागी नव्या चेहऱ्याला संधी मिळण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

Follow Us
राष्ट्रीवादीत मोठ्या हालचाली? कोअर कमितटीच्या बैठीकत रोहित पवारांची...
राष्ट्रीवादीत मोठ्या हालचाली? कोअर कमितटीच्या बैठीकत रोहित पवारांची अनुपस्थिती, बड्या नेत्याने थेट...
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर; नेमकं कारणही आलं समोर
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर; नेमकं कारणही आलं समोर
हनुमंताचे दर्शन घेऊन जरांगे पाटलांनी सुरू केले उपोषण; मागण्या न मान्य
हनुमंताचे दर्शन घेऊन जरांगे पाटलांनी सुरू केले उपोषण; मागण्या न मान्य झाल्यास...
कुंभमेळ्यातील भ्रष्टाचारावर साधूसंतही नाराज; राऊतांची सरकारवर टीका...
Sanjay Raut | कुंभमेळ्यातील भ्रष्टाचारावर साधूसंतही नाराज; राऊतांची सरकारवर सडकून टीका
मनोज जरांगे पाटलांचं आजपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषण; राजकीय...
मनोज जरांगे पाटलांचं आजपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषण; राजकीय घडामोडींना वेग
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचे निर्णायक उपोषण. सरकारला थेट इशारा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचे निर्णायक उपोषण. सरकारला दिला थेट इशारा
NTA मध्ये मोठा फेरबदल, IPS रवी कुमार सिंह यांची NTA संचालकपदी नियुक्ती
NTA मध्ये मोठा फेरबदल: आयपीएस रवी कुमार सिंह यांच्यासह तीन नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती
'हिम्मत असेल तर पोलीस संरक्षणाशिवाय फिरा'- गंगाधर काळकुटे
Gangadhar Kalkute on Gunratna Sadavarte : काळकुटेंचं सदावर्तेंना आव्हान, 'हिंमत असेल तर पोलीस संरक्षणाशिवाय फिरा'
राजीनामा द्या, आदिवासी आंदोलक अन् अशोक उईकेंमध्ये खडाजंगी
नाशिकमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचा मंत्री अशोक उईकेंविरोधात एल्गार: राजीनाम्याची मागणी
रियाज पठाण हत्या प्रकरणात 13 वर्षांनी निकाल
अहिल्यानगर: रियाज पठाण हत्या प्रकरणात 13 वर्षांनी निकाल, सात आरोपींना जन्मठेप