AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Delhi Election : ‘दिल्लीत केजरीवाल जिंकू शकतात’, महाराष्ट्रातील मोठ्या काँग्रेस नेत्याचा पक्षाला घरचा आहेर

Delhi Election : काँग्रेसच्या नेत्यांना स्वत:च्या पक्षावर विश्वास उरलेला दिसत नाहीय. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार सुरु झालेला असताना महाराष्ट्रातील एका मोठ्या काँग्रेस नेत्याने भुवया उंचावणार विधान केलं आहे. एकप्रकारे हा पक्षाला घरचा आहेर दिला आहे.

Delhi Election : 'दिल्लीत केजरीवाल जिंकू शकतात', महाराष्ट्रातील मोठ्या काँग्रेस नेत्याचा पक्षाला घरचा आहेर
Congress Party
| Updated on: Jan 09, 2025 | 1:41 PM
Share

मागच्यावर्षी जून महिन्यात लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. या निकालानंतर काँग्रेस पक्षामध्ये एक उत्साह होता. हरियाणा विधानसभा निवडणुकीपर्यंत हा उत्साह टिकून होता. पण हरियाणाच्या निवडणूक निकालानंतर सगळ चित्रच बदललं. काँग्रेसच्या नेत्यांनाच आपल्या पक्षाच्या विजयाची खात्री उरलेली नाही. हे त्यांच्या वक्तव्यामधून दिसून येत आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानावरुन हे दिसून येतं. हरियाणामध्ये हमखास जिंकणार असा काँग्रेसला विश्वास होता. मागच्या दोन टर्मपासून असलेलं भाजपच सरकार जाणार असं ठाम विश्वास या पक्षाला होता. पण निवडणूक निकालात उलटच घडलं. काँग्रेसचा पराभव झाला. भाजपने हरियाणात विजयाची हॅट्ट्रिक केली.

हरियाणानंतर महाराष्ट्रातही तेच झालं. खरंतर लोकसभा निवडणुकीला 13 जागा जिंकून काँग्रेस महाराष्ट्रातला मोठा पक्ष ठरला होता. काँग्रेस नेत्यांकडून थेट मुख्यमंत्री पदावर दावा सुरु झाला होता. पण सहा महिन्यात महाराष्ट्रात असं काही चित्र बदललं की, अजूनही महाविकास आघाडीचे नेते आणि समर्थकांचा विश्वास बसत नाहीय. 288 सदस्यांच्या महाराष्ट्र विधानसभेत पुन्हा एकदा महायुतीने सत्ता मिळवली. महत्त्वाच म्हणजे ही सत्ता मिळवताना काँग्रेससह मविआचा दारुण पराभव झाला. महायुतीने 230 पेक्षा जास्त जागा जिंकल्या. भाजपने महाराष्ट्राच्या इतिहासातील घवघवीत यश संपादन केलं. काँग्रेसला सर्वात कमी म्हणजे फक्त 16 जागा मिळाल्या.

निकालाआधीच पराभव मान्य केला का ?

महाराष्ट्राच्या निकालानंतर काँग्रेस नेत्यांचा आत्मविश्वासच जणू हरवलाय असं दिसतय. दिल्ली विधानसभा निवडणुकीबाबत पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानातून हे दिसून आलं. “काँग्रेस आणि आप एकत्र असते, तर चांगलं झालं असतं, दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-आपची आघाडी होताना दिसत नाहीय” असं ते म्हणाले. इतकच नाही, तर “दिल्ली विधानसभा निवडणूक महत्त्वाची आहे. अरविंद केजरीवाल ही निवडणूक जिंकू शकतात. काँग्रेसही शर्यतीत आहे. पण इथे बसून मला दिल्लीबद्दल जास्त काही बोलता येणार नाही” असं त्यांनी सांगितलं. पृथ्वीराज चव्हाण यांचं हे विधान म्हणजे निवडणुकीआधीच पराभव मान्य करण्यासारखं आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.