AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘गाडीखाली श्वान आला तरी, ते…’ अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येवर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

Abhishek Ghosalkar | विरोधी पक्षाकडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागितला जातोय, त्यावर देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला. "गोळीबाराची घटना गंभीर आहे. मात्र त्याच राजकारण करणं योग्य नाही. या प्रकारामुळे कायदा-सुव्यवस्था संपलेली आहे, असं म्हणण चुकीच आहे"

'गाडीखाली श्वान आला तरी, ते...' अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येवर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
devendra fadnavis
| Updated on: Feb 09, 2024 | 11:38 AM
Share

मुंबई : “एका तरुण नेत्याच अशा पद्धतीने निधन व्हाव हे अतिशय गंभीर आहे. काही लोक या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत. हे योग्य नाही” असं राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. अभिषेक घोसाळकर यांच्या निधनावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. ही घटना गंभीर आहे, मात्र “गोळ्या घातल्या त्या मॉरिस आणि अभिषेक घोसाळकर यांचे एकत्रित फोटो पहायला मिळालेत. वर्षानुवर्ष ते एकत्र काम करत होते. आता कुठल्या विषयावरुन बेबनाव झाला हे महत्त्वाच आहे, त्यांची चौकशी सुरु आहे. पोलीस तपासात वेगवेगळ्या गोष्टी लक्षात येत आहेत. योग्यवेळी ती माहिती तुम्हाला दिली जाईल” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“गोळीबाराची घटना गंभीर आहे. मात्र त्याच राजकारण करणं योग्य नाही. या प्रकारामुळे कायदा-सुव्यवस्था संपलेली आहे, असं म्हणण चुकीच आहे. कारण ही हत्या व्यक्तीगत वैमनस्यातून घडली आहे” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. “बंदुकांचे लायसन्स असतील, ही लायसन्स देताना काय खबरदारी घेतली पाहिजे? याचा विचार सरकार नक्कीच करेल” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

विरोधी पक्षांची सध्याची स्थिती अशी आहे की….

विरोधी पक्षाकडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागितला जातोय, त्यावर देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला. ते म्हणाले की, “हे पूर्णपणे राजकीय आरोप आहेत. विरोधी पक्षांची सध्याची स्थिती अशी आहे की, एखाद्या गाडीखाली श्वान आला तरी, ते राजीनामा मागतील. अभिषेक घोसाळकर यांच्यावरील गोळीबाराची घटना गंभीर आहे. त्यासाठी त्यांनी राजीनामा मागितला, तर मला आश्चर्य वाटत नाहीय. ही व्यक्तीगत वैमनस्यातून झालेली हत्या आहे. विरोधी पक्ष त्यांचं काम करतोय” असं देवंद्र फडणवीस म्हणाले.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.