Eknath Shinde : बंडखोर शिंदे गटाचा आपोआप गेम होणार? तरीही भाजपच्या बाजूनं असेल बहुमताचा आकडा? समजून घ्या नंबरगेम

Eknath Shinde : राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं आहे. त्यामुळे आता नंबर गेमचा खेळ सुरू झाला आहे. शिवसेनेकडे 55 आमदार आहेत. त्यातील 39 आमदारांनी बंड केलं आहे.

Eknath Shinde : बंडखोर शिंदे गटाचा आपोआप गेम होणार? तरीही भाजपच्या बाजूनं असेल बहुमताचा आकडा? समजून घ्या नंबरगेम
बंडखोर शिंदे गटाचा आपोआप गेम होणार? तरीही भाजपच्या बाजूनं होणार बहुमताचा आकडा? समजून घ्या नंबरगेम Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 29, 2022 | 2:12 PM

मुंबई: गेल्या आठ दिवसांपासून महाराष्ट्रावर राजकीय अस्थिरतेचे ढग जमले आहेत. त्यातच आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं आहे. त्यामुळे ठाकरे सरकारवरील संकट अधिक गडद झालं आहे. उद्या 30 जून रोजी सकाळी 11 वाजता बहुमत चाचणी होणार आहे. ही प्रक्रिया उद्या संध्याकाळी 5 वाजपर्यंत सुरू राहणार आहे. राज्यपालांच्या निर्णयाला स्थगिती मिळावी म्हणून शिवसेना कोर्टात गेला आहे. त्यामुळे ठाकरे सरकारच्या बाजूने निर्णय येतो की उद्या आघाडीला बहुमत सिद्ध करावे लागते हे पाहावं लागणार आहे. राज्यातील राजकीय परिस्थिती चांगली नाही. शिवसेनेच्या 39 आमदारांनी आघाडीतून (maha vikas aghadi) बाहेर पडण्याचं आवाहन केलं आहे. तर सात अपक्ष आमदारांनी पत्रं लिहून सरकारचा पाठिंबा काढून घेत असल्याचं जाहीर केलं आहे, अशी माहिती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिली आहे.

राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं आहे. त्यामुळे आता नंबर गेमचा खेळ सुरू झाला आहे. शिवसेनेकडे 55 आमदार आहेत. त्यातील 39 आमदारांनी बंड केलं आहे. हे सर्व आमदार गेल्या आठवड्यापासून गुवाहाटीला तळ ठोकून आहेत. तसेच ठाकरे सरकारमधील दोन आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच राष्ट्रवादीचे दोन आमदार तुरुंगात आहेत. म्हणजे 43 आमदार आघाडीच्या हातून निघून गेले आहेत. तसेच प्रहारचे दोन आमदार आणि इतर 7 अपक्ष आमदारांनीही शिंदे गटाला समर्थन दिलं आहे. त्यामुळे एकूण 50 आमदारांची आघाडीला कमतरता भासणार आहे.

हे सुद्धा वाचा

प्लॅन काय?

दुसरीकडे शिवसेनेने 16 आमदारांना अपात्रं ठरवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. शिंदे गटाने तांत्रिक कारणं पुढे देत शिवसेनेची कृती चुकीची आहे असं म्हटलं असलं तरी बंडखोरांसाठी वाटतो तितका मार्ग सोपा राहिलेला नाही. हे प्रकरण कोर्टात असल्याने कोर्ट काय निर्णय देतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शिंदे गटाकडे शिवसेनेचे 39 आमदार आहेत. म्हणजे शिंदे गटाकडे दोन तृतियांश मते आहेत. त्यामुळे त्यांच्यावर पक्षांतर बंदी कायदा लागू होत नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे वेगळा गट स्थापन करून हे लोक भाजपला पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आकडे काय सांगतात

महाराष्ट्राच्या विधानसभेत एकूण 288 आमदार आहेत. त्यापैकी शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचं निधन झाल्याने हा आकडा 287 झाला आहे. त्यामुळे सरकार स्थापनेसाठी 144 आमदारांची गरज आहे. राष्ट्रवादीकडे 53 आमदार आहेत. काँग्रेसकडे 44 आमदार आहेत. शिवसेनेकडे 55 आमदार आहेत. तिन्ही पक्षाच्या एकूण आमदारांची संख्या 152 होते. त्याशिवाय महाविकास आघाडीला बच्चू कडू यांच्या दोन आमदारांनी आणि इतर अपक्षांनी पाठिंबा दिला आहे. म्हणजे आघाडीला बविआच्या 3, सपाच्या दोन, पीजेपीच्या दोन आणि पीडब्लूपीच्या एका आणि 8 अपक्षांचा पाठिंबा आहे. मात्र, आता खेळ बिघडला आहे. कारण शिवसेनेच्या 39 आमदारांनी बंड केलं आहे. तर आघाडीच्या सर्व अपक्षांनी आणि प्रहारच्या दोन आमदारांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शिवसेनेकडे केवळ 16 आमदार उरले आहेत.

भाजपकडे मॅजिक फिगर

दुसरीकडे भाजपकडे 106 आमदार आहेत. त्यांना सात अपक्षांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भाजपचा आकडा 113 झाला आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी 144 आमदार हवे आहेत. शिंदे गटाकडे 39 आमदार आहेत. हे आमदार उद्या मतदानात सहभागी नाही झाल्यास बहुमतासाठीचा आकडा 121 होईल. अशावेळी भाजपकडे 113 आमदार आहेत. त्यांच्यासोबत 16 अपक्ष आणि इतर आमदारही आहेत. त्यामुळे भाजपचं संख्याबळ 129 वर पोहोचेल. तर 113 आमदाराच हाती असल्याने आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करता येणार नाही.

Non Stop LIVE Update
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.