AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनसेसाठी ‘हीच ती वेळ’, शिवसेनेची जागा आता मनसे घेणार?

सत्तानाट्य संपल्यानंतर राज ठाकरेंची मनसे (Raj Thackeray MNS) राज्याच्या राजकारणात पुन्हा मैदानात उतरणार आहे. मनसेने राज्यातील महाविकास आघाडीला टार्गेट करण्याचे ठरवलं आहे.

मनसेसाठी 'हीच ती वेळ', शिवसेनेची जागा आता मनसे घेणार?
| Updated on: Dec 11, 2019 | 10:41 AM
Share

मुंबई : सत्तानाट्य संपल्यानंतर राज ठाकरेंची मनसे (Raj Thackeray MNS) राज्याच्या राजकारणात पुन्हा मैदानात उतरणार आहे. मनसेने राज्यातील महाविकास आघाडीला टार्गेट करण्याचे ठरवलं आहे. लवकरच मनसे कार्यकर्त्यांचं महाआधिवेशनदेखील घेणार आहे. मनसेच्या प्रमुख नेत्यांची (Raj Thackeray MNS) बैठक पार पडली. पण, या बैठकीला मनसे अध्यक्ष राज ठाकरेच नव्हते. राज्यातील सत्तानाट्यानंतर पहिल्यांदाच मनसेच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. यात मनसेची राजकीय वाटचाल, राज्यातील शेतीचे प्रश्न आणि राजकीय परिस्थिती दिल्लीत सुरु असलेल्या घडामोडींवर या बैठकीत आढावा घेण्यात आला.

शिवसेनेनं भाजपची साथ सोडली आणि काँग्रेस, राष्ट्रवादीचा हात पकडला. पण, नव्यानं उदयास आलेल्या या महाविकास आघाडीविरोधात मनसेनंही चांगलीच मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे.

2019च्या विधानसभा निवडणुकीत मनसेचा एकमेव आमदार कल्याण ग्रामीण मधून निवडून आला. पुढील काळात नवी मुंबई, कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांमध्ये मनसे महाविकासआघाडी आणि भाजप विरोधात प्रचार करुन आपल्या झोळीत मतं टाकून घेण्याच्या प्रयत्नात आहे.

आता आक्रमक शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेल्यानं मनसेलाही चांगलीच संधी आहे. आक्रमक विरोधक म्हणून आता मनसे रिकामी स्पेस भरुन काढू शकते. शिवसेना सत्तेत गेल्यानं राज्याच्या राजकारणात आक्रमक विरोधकाची पोकळी निर्माण झाली आहे. ती पोकळी भरून काढण्याचं लक्ष्य डोळ्यासमोर ठेवलं असलं तरी त्यांना आवश्यक ते बळ देण्यासाठी राज ठाकरेंनीही त्यांना वेळ देणं आवश्यक आहे.

Follow Us
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया.
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान.
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका.
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका.
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता.
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात.