AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mamata Banerjee met PM Modi : ममता बॅनर्जींना घेतली पीएम मोदी यांची भेट, दोघांमध्ये 45 मिनिटे झाली चर्चा

पश्चिम बंगालचे भाजपचे वरिष्ठ नेते दिलीप घोष यांनी सांगितलं की, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पंतप्रधान मोदी यांना भेटायल्या गेल्या. कारण आमची राजकीय सेटिंग झाल्याचा संदेश त्यांना द्यायचा आहे.

Mamata Banerjee met PM Modi : ममता बॅनर्जींना घेतली पीएम मोदी यांची भेट, दोघांमध्ये 45 मिनिटे झाली चर्चा
ममता बॅनर्जींना घेतली पीएम मोदी यांची भेट
| Updated on: Aug 05, 2022 | 6:30 PM
Share

नवी दिल्ली : दिल्लीत आज पश्चिम बंगालच्या (W. Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली. दोघांमध्ये काही महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा झाली. दोघांमध्ये सुमारे 45 मिनिटे चर्चा झाली. पंतप्रधानांशी भेटीनंतर ममता बॅनर्जी तिथून निघाल्या. पंतप्रधान मोदी आणि ममता बॅनर्जी यांची भेट कित्तेक अर्थ काढले जात आहेत. काही लोकं याला राजकीय सेटिंग असल्याचा आरोप करत आहेत. काही जण शिक्षक भरती (Teacher Recruitment) घोटाळा प्रकरणी ईडी कारवाईची भीती सांगत आहेत. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांविरोधात सीबीआय आणि ईडीच्या कारवाईमुळं ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचा दिल्ली दौरा हा फिक्सिंगचा भाग असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय.

भेटीसंदर्भात माहिती जनतेला द्यावी

भाजपचे माजी प्रदेश अध्यक्ष तथागत रॉय यांनी पंतप्रधान मोदी यांना सल्ला दिला. ते म्हणाले, ममता बॅनर्जींसोबत भेट कशासाठी झाली, हे जनतेला सांगायला हवं. तथागत रॉय यांनी ट्वीट केलंय. कोलकात्यात सेटिंगवरून चर्चा सुरू होती. याचा अर्थ पंतप्रधान आणि ममता बॅनर्जी यांच्यांत नेमकं सिक्रेट काय आहे. तृणमूल काँग्रेसचे हत्त्यारे आणि चोर अशाप्रकारे मोकळे सुटतील. त्यामुळं आम्हाला सांगावं की, अशी कोणतीही सेटिंग झालेली नाही. तथागत रॉय यांनी आपलं ट्वीट पंतप्रधान मोदी यांना टॅग केलंय.

दिलीप घोष यांनीही सरकारला दिला सल्ला

पश्चिम बंगालचे भाजपचे वरिष्ठ नेते दिलीप घोष यांनी सांगितलं की, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पंतप्रधान मोदी यांना भेटायल्या गेल्या. कारण आमची राजकीय सेटिंग झाल्याचा संदेश त्यांना द्यायचा आहे. केंद्र सरकारनं ममता बॅनर्जी यांच्या जाळ्यात अडकू नये, असा सल्ला दिला.

2016 पासून सुरू आहे मॅच फिक्सिंग

पंतप्रधान मोदी आणि ममता बॅनर्जी यांच्यामध्ये झालेल्या बैठकीवरून काँग्रेससह अन्य पक्षांनी निशाणा साधला. बंगाल काँग्रेसचे प्रवक्ता रिट्जू घोषाल यांनी आरोप केलाय. ते म्हणाले, ही मॅच फिक्सिंग 2016 च्या पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीपासून सुरू आहे. ईडीनं कोळसा घोटाळा प्रकरणी अभिषेक बॅनर्जी यांची दोन वेळा चौकशी करण्यात आली. परंतु, नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना रोज त्रास दिला जात आहे.

Follow Us
SRPF परीक्षेत खासगी प्रकाशनामधील ८५ प्रश्न जसेच्या तसे, कसं आलं समोर
SRPF परीक्षेत खासगी प्रकाशनामधील ८५ प्रश्न जसेच्या तसे, कसं आलं समोर.
...म्हणून नसरापूर प्रकरणातील आरोपीनं मोबाईल वापरणं बंद केलं होतं,
...म्हणून नसरापूर प्रकरणातील आरोपीनं मोबाईल वापरणं बंद केलं होतं,.
मोठी बातमी! ममता बॅनर्जी यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार
मोठी बातमी! ममता बॅनर्जी यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार.
भोंदू खरातसाठी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी
भोंदू खरातसाठी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी.
अमित शहा ठरवणार बंगालचा मुख्यमंत्री, पक्षाने दिली सर्वात मोठी जबाबदारी
अमित शहा ठरवणार बंगालचा मुख्यमंत्री, पक्षाने दिली सर्वात मोठी जबाबदारी.
8 ग्रॅम सोनं, महिलांना 2500 रुपये, थलापती निवडणुकीत विजयी कसा झाला?
8 ग्रॅम सोनं, महिलांना 2500 रुपये, थलापती निवडणुकीत विजयी कसा झाला?.
तिला कॅफेमध्ये बोलवलं अन्...एका चुकीमुळे भांडाफोड; बीडमधील आक्षेपार्ह
तिला कॅफेमध्ये बोलवलं अन्...एका चुकीमुळे भांडाफोड; बीडमधील आक्षेपार्ह.
फडणवीस सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; नसरापूर प्रकरणानंतर नो पॅरोल धोरण लागू?
फडणवीस सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; नसरापूर प्रकरणानंतर नो पॅरोल धोरण लागू?.
मोठी अपडेट! अत्याचारानंतर मुलीचा मृत्यू ऑस्फक्सियामुळे, मेंदूसह इतर...
मोठी अपडेट! अत्याचारानंतर मुलीचा मृत्यू ऑस्फक्सियामुळे, मेंदूसह इतर....
दिवाळीआधीच शिंदेंचा मोठा डाव? शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची चर्चा.....
दिवाळीआधीच शिंदेंचा मोठा डाव? शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची चर्चा......