AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकारच्या ‘त्या’ निर्णयाला मनोज जरांगे यांचं आव्हान; थेट मुलींनाच म्हणाले…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमत्री देवेंद्र फडवणीस यांच्यावर समाजाने पुन्हा एकदा विश्वास ठेवला आहे आणि 13 तारखेपर्यंत सगे सोयऱ्याची अंमलबजावणी आमच्या व्याख्येप्रमाणे ते करतील अशी आशा असल्याचे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

सरकारच्या 'त्या' निर्णयाला मनोज जरांगे यांचं आव्हान; थेट मुलींनाच म्हणाले...
मनोज जरांगे पाटील, देवेंद्र फडणवीसImage Credit source: TV9MARATHI
| Updated on: Jul 04, 2024 | 6:16 PM
Share

जालना – राज्य सरकारने मराठा आरक्षण आंदोलनानंतर मराठा समाजाला दिलेले आश्वासन पाळले पाहीजे. सरकारकडे यंत्रणा आहे. आम्ही आंदोलक आहोत. त्यामुळे आम्हाला विश्वास ठेवावा लागेल. सगे सोयरेची व्याख्या, हैदराबाद, बॉम्बे आणि सातारा गॅझेटबाबत येत्या 13 तारखेपर्यंत सरकार निर्णय घेईल असे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आहे. एक आंदोलक म्हणून समाजाची जवाबदारी आपण पेलतो, तर सरकारवर विश्वास ठेवावा लागतो. आडमुठी भूमिका घेतल्याने समाजाचे कल्याण होणार नाही. शंभूराजे देसाई ज्यावेळी आले होते, त्यावेळी समाजाला विचारून आपण सरकारला एक महिना वेळ दिला होता असेही जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमत्री देवेंद्र फडवणीस यांच्यावर समाजाने पुन्हा एकदा विश्वास ठेवला आहे आणि 13 तारखेपर्यंत सगे सोयऱ्याची अंमलबजावणी आमच्या व्याख्ये प्रमाणे ते करतील आणि हैदराबाद गॅझेटसाठीही तीन पत्रं दिल्याचे विधानसभेत शंभूराजे देसाई यांनी सांगितले आहे. त्यामुळे 13 तारखेपर्यंत आम्हाला न्याय मिळेल असा विश्वास असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले. सरकारने मराठा समाजाला जे दहा टक्के आरक्षण दिले होते त्यानूसार मुलांनी जी प्रमाणपत्र काढले होते ते प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यास अडचण येत आहे आणि त्यामुळे मराठा समाज पुरता अडचणीत सापडला आहे.

विद्यार्थ्यांना आडकाठी आणू नका

सरकारचा डाव आहे की यावर्षी मराठा समाजाची पोरांची नुकसान करायचं आणि याबाबत मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की अशी विद्यार्थ्यांना आडकाठी आणू नका असेही मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. सरकारने मुलींना मोफत शिक्षणाचा जो अध्यादेश काढलाय त्याची अंमलबजावणी होत नाही मग आदेश काढलाच कशाला असा सवाल जरांगे पाटील यांनी केला आहे. सरकार निर्णय घेते पण त्याची अंमलबजावणी होत नाही त्यामुळे मराठा समाज नाराज होत आहे. मुलींच्या बाबतीत मोफत शिक्षणाचा जो निर्णय घेतला आहे, त्याचा आज मुलींना फायदा होत नाही आणि जर कोणाला लाभ झाला असेल तर त्या मुलींनी मला येऊन सांगावे असे आव्हानच जरांगे पाटील यांनी मराठा मुलींना केले आहे.

Follow Us
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान.
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले.
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला...
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला....
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण...
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण....
सोलापुरात महापुरुषांच्या पुतळ्यावरून वाद; पोलीस आणि आंदोलकांमध्ये तणाव
सोलापुरात महापुरुषांच्या पुतळ्यावरून वाद; पोलीस आणि आंदोलकांमध्ये तणाव.
राज्यभरात हनुमान जयंतीचा उत्साह, अंजनेरी मंदिरात भाविकांची गर्दी
राज्यभरात हनुमान जयंतीचा उत्साह, अंजनेरी मंदिरात भाविकांची गर्दी.
हा आयोग चोर आहे... राऊतांची निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावर टीका
हा आयोग चोर आहे... राऊतांची निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावर टीका.
अजितदादाच्या राष्ट्रवादीत मोठा भूकंप होणार? किती आमदार फुटणार?
अजितदादाच्या राष्ट्रवादीत मोठा भूकंप होणार? किती आमदार फुटणार?.
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुनील तटकरे यांचा यू-टर्न
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुनील तटकरे यांचा यू-टर्न.
अजब-गजब ऐतिहासिक दावे जैन मुनीच्याच अंगलट; जैन समाजातूनच तीव्र विरोध
अजब-गजब ऐतिहासिक दावे जैन मुनीच्याच अंगलट; जैन समाजातूनच तीव्र विरोध.