AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shrikant Shinde : रिक्षावालाच भारी, मर्सिडीज मधून पक्ष वाढू शकत नाही, श्रीकांत शिंदेंचा आदित्य ठाकरेंना टोला

बंडखोरी केलेल्या आमदारांवर गद्दार हा शिक्का पडलेला आहे. मात्र, नेमके गद्दार कोण हे आता शिवसेना आणि शिंदे गटाकडून पटवून सांगितले जातेय. शिवसेना पक्षाशी आणि ठाकरे कुटुंबाच्या पाठीत खंजीर खुपसणारे हे गद्दारच असल्याचे आदित्य ठाकरे सांगत आहेत तर दुसरीकडे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर मांडीला-मांडी लावून बसणारेच खरे गद्दार असल्याचा आरोप श्रीकांत शिंदे यांनी केला आहे.

Shrikant Shinde : रिक्षावालाच भारी, मर्सिडीज मधून पक्ष वाढू शकत नाही, श्रीकांत शिंदेंचा आदित्य ठाकरेंना टोला
खासदार श्रीकांत शिंदेImage Credit source: twitter
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Aug 23, 2022 | 6:15 PM
Share

वाशिम :  (Rebel MLA) आमदारांच्या बंडानंतर पक्ष मजबुतीकरणासाठी (Aaditya Thackeray) आ. आदित्य ठाकरे हे शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत आहेत. मात्र, विरोधकांकडून त्यांच्यावर खोचक टीका केली जात आहे. आता तर खासदार तथा एकनाथ शिंदे यांचे पुत्र (Shrikant Shinde) श्रीकांत शिंदे यांनी तर आदित्य ठाकरेंच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पक्ष वाढवण्यासाठी रिक्षावाले, पान टपरीवालेच लागतात मर्सिडीज मधून पक्ष वाढत नाही असा टोला त्यांनी ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेवर लगावला आहे. आतापर्यंत श्रीकांत शिंदे यांनी थेट आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केलेले नव्हते. पण आता दोन्ही गटातील अंतर वाढत असून आरोप-प्रत्यारोप हे वाढत आहेत. पक्ष संघटनेसाठी आदित्य ठाकरे यांचे प्रयत्न निष्फळ असल्याचेही शिंदे यांनी म्हटले आहे.

शिवसेनेतून बंड

गद्दार कोण? शिंदेंचा सवाल

बंडखोरी केलेल्या आमदारांवर गद्दार हा शिक्का पडलेला आहे. मात्र, नेमके गद्दार कोण हे आता शिवसेना आणि शिंदे गटाकडून पटवून सांगितले जातेय. शिवसेना पक्षाशी आणि ठाकरे कुटुंबाच्या पाठीत खंजीर खुपसणारे हे गद्दारच असल्याचे आदित्य ठाकरे सांगत आहेत तर दुसरीकडे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर मांडीला-मांडी लावून बसणारेच खरे गद्दार असल्याचा आरोप श्रीकांत शिंदे यांनी केला आहे. शिवाय ज्यांचे दाऊदसोबत संबंध त्यांच्याशी युती करणे बाळासाहेबांना पटले असते का असा सवालही शिंदे यांनी उपस्थित केला आहे.

हिंदुत्वाचे विचार कायम जोपसणार

बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही हिंदुत्वाचे विचार सोडले नाहीत. हिंदुत्वाचा प्रचार आणि त्यासाठीच त्यांनी आपले आयुष्य खर्ची केले आहे. असे असताना आता त्यांच्याच विचाराला बाजूला सारण्याचा घाट शिवसेनेत सुरु झाला आहे. त्यामुळे बाळासाहेबांचे विचार खऱ्या अर्थाने शिंदे गटच पुढे घेऊन जात आहे. तर हे सर्वसामान्य जनतेलाही मान्य असल्याचे श्रीकांत शिंदे यांनी सांगितले आहे. हिंदुत्वाच्या मुद्यावरुनही आता राजकारण वाढत आहे.

शिवसेना वाढवली कोणी?

आता पक्ष वाढवण्यासाठी आदित्य ठाकरे हे महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. मात्र, पक्ष अशापद्धतीने वाढत नाही, त्यासाठी रिक्षावाला आणि पान टपरीवालाच लागतो असे म्हणत शिवसेना वाढवली ही एकनाथ शिंदे यांनीच असेच श्रीकांत शिंदे यांना सुचित करायचे होते. तर आता मर्सिडीजमधून पक्ष वाढत नसतो असा टोलाही त्यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला आहे. त्यामुळे शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील आरोप-प्रत्यारोप हे आता वाढत जात आहेत.

Follow Us
1 सप्टेंबरला OBC आंदोलनाचा एल्गार; हजारो वाहनांच्या रॅलीचा दावा
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर लक्ष्मण हाके यांचा नेत्यांवर सवाल
अमोल बालवडकरांविरोधात भाजपची सुनेत्रा पवारांकडे तक्रार
पुण्यात राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर यांच्याविरोधात भाजपकडून सुनेत्रा पवारांकडे तक्रार
खाद्यतेल भेसळीविरोधात कठोर पाऊले. मुंढेंनी जाहीर केली नवीन नियमावली
राज्यात सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर बंदी; भेसळयुक्त तेल विकल्यास 10 लाखांचा दंड
अमित ठाकरेंच्या दौऱ्याच्या बॅनरवरून फोटोवॉर;जिल्हाध्यक्षांचा फोटो गायब
अमित ठाकरेंच्या दौऱ्यात मनसेत फोटो वॉर; जिल्हाध्यक्षांच्या फोटोवरून चर्चा
सर्वोच्च न्यायालयात उबाठाच्या युक्तिवादावर राजू वाघमारे यांची टीका
शिवसेना वाद: सर्वोच्च न्यायालयात उबाठाच्या युक्तिवादावर राजू वाघमारे यांची टीका
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला
मोदींच्या पंतप्रधानपदावर राऊतांचे भाकीत; बन यांच्याकडून प्रत्युत्तर
संजय राऊतांचा दावा: पंतप्रधान मोदींचा १७ सप्टेंबरला शेवटचा वाढदिवस असेल
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
पालकमंत्री गोगावलेंना तटकरेंच्या शुभेच्छा अजून नाहीत
पालकमंत्रीपदाच्या शुभेच्छा: भरत गोगावलेंना अजूनही सुनील तटकरेंच्या शुभेच्छांची प्रतीक्षा