AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘खोके’ नाट्य आणखीच रंगात, बच्चू कडू रात्रीतून मुंबईला, आता कुणाची मध्यस्थी?

बच्चू कडू यांना मुंबईत बोलावण्यामागील कारण मंत्रिमंडळ विस्तार आहे की आणखी काही आहे, हे येत्या काही दिवसातच समोर येईल.

'खोके' नाट्य आणखीच रंगात, बच्चू कडू रात्रीतून मुंबईला, आता कुणाची मध्यस्थी?
Image Credit source: social media
| Updated on: Oct 28, 2022 | 11:00 AM
Share

स्वप्निल उमप, अमरावतीः खोके घेऊन सत्तेत आले, हा आरोप शिंदे सरकारला (CM Eknath Shinde) स्वस्थ बसू देत नाहीये. तर मित्रपक्ष भाजपनेच आरोप केल्यामुळे शिंदे गटावर मोठं संकट कोसळलंय. भाजपचे आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी खोक्यांचे आरोप केल्याने खवळलेल्या बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनीही आता थेट आव्हान दिलंय. खोके घेतल्याचं कोर्टात सिद्ध करून दाखवाच म्हटलंय. यानंतर बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वाद आणखी पेटण्याची चिन्ह आहेत. या नाट्यात गुरुवारी रात्री बच्चू कडू तातडीने मुंबईला रवाना झालेत.

बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वाद आता मुंबईच्या दरबारात म्हणजे शिंदे-फडणवीस यांच्यासमोर सोडवला जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या प्रकरणी मध्यस्थी करण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडी सरकारमधील प्रमुख पक्ष शिवसेना फोडून एकनाथ शिंदे गट बाहेर पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी ही बंडखोरी करण्यासाठी खोके अर्थात पैसे घेतल्याचा आरोप वारंवार केला जातोय.

शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादीकडून तर हा आरोप होतोच आहे. शिवाय आता अमरावतीचे आमदार रवी राणा यांनीही असाच आरोप केला.

प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र पहिल्या टप्प्यात ते न मिळाल्याने बच्चू कडू नाराज आहेत.

त्यातच देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आमदार रवी राणा यांनी बच्चू कडू यांना डिवचलं. मी गुवाहटीला जाणारा आमदार नाही, पैशांसाठी धावत नाही, असं वक्तव्य केलं.

त्यानंतर बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वाद वाढत गेले. बुधवारी बच्चू कडू यांनी एक पत्रकार परिषद घेत, या आरोपांनाच आव्हान दिलंय. 1 नोव्हेंबर पर्यंत खोके घेतल्याचा आरोप सिद्ध करा, असा इशारा त्यांनी दिलाय. सिद्ध नाही झालं तर हा आरोप कायमचा मिटवता येईल, असंही ते म्हणालेत.

पत्रकार परिषद घेतल्यानंतर गुरुवारी रात्रीतूनच आमदार बच्चू कडू मुंबईत रवाना झाले आहेत. दिवाळीनंतर मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे शिंदे सरकारतर्फे सांगण्यात आले होते.

आता बच्चू कडू यांना मुंबईत बोलावण्यामागील कारण मंत्रिमंडळ विस्तार आहे की आणखी काही आहे, हे येत्या काही दिवसातच समोर येईल.

Follow Us
धनंजय मुंडेच्या हातात आता 2-3 महिनेच... करुणा मुंडेच्या दाव्याने राजका
धनंजय मुंडेच्या हातात आता 2-3 महिनेच... करुणा मुंडेच्या दाव्याने राजका.
ठाकरे खरंच फडणवीसांना भेटले होते का? अंबादास दानवेंनी अखेर सांगितलंच..
ठाकरे खरंच फडणवीसांना भेटले होते का? अंबादास दानवेंनी अखेर सांगितलंच...
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील गोळीबारामागे नेमका कुणाचा हात? मोठी अपडेट स
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील गोळीबारामागे नेमका कुणाचा हात? मोठी अपडेट स.
गुप्तधन शोधण्यासाठी अघोरी कृत्य, नंतर जे घडलं त्याची कल्पना करणं कठीण
गुप्तधन शोधण्यासाठी अघोरी कृत्य, नंतर जे घडलं त्याची कल्पना करणं कठीण.
फरार निदा खान आरोपींच्या संपर्कात, मोबाईलमधील त्या संशयास्पद फोटो...
फरार निदा खान आरोपींच्या संपर्कात, मोबाईलमधील त्या संशयास्पद फोटो....
मोठी घडामोड! भोंदू खरातला मदत करणाऱ्या बड्या अधिकाऱ्यावर होणार कडक कार
मोठी घडामोड! भोंदू खरातला मदत करणाऱ्या बड्या अधिकाऱ्यावर होणार कडक कार.
मोठी बातमी! भाजपमध्ये पक्षप्रवेश करताच राघ चड्ढांना धक्का, थेट...
मोठी बातमी! भाजपमध्ये पक्षप्रवेश करताच राघ चड्ढांना धक्का, थेट....
कर्जमाफीबद्दल मोठी अपडेट! 35 लाख शेतकऱ्यांना... नेमकी काय माहिती समोर
कर्जमाफीबद्दल मोठी अपडेट! 35 लाख शेतकऱ्यांना... नेमकी काय माहिती समोर.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होताच राऊत संतापले, भाजपला सुनावले खडे
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होताच राऊत संतापले, भाजपला सुनावले खडे.
काळजाचा ठोका चुकवणारी घटना! विमान टॅक ऑफ करणार इतक्यात.. थोडक्यात बचाव
काळजाचा ठोका चुकवणारी घटना! विमान टॅक ऑफ करणार इतक्यात.. थोडक्यात बचाव.