‘खोके’ नाट्य आणखीच रंगात, बच्चू कडू रात्रीतून मुंबईला, आता कुणाची मध्यस्थी?

बच्चू कडू यांना मुंबईत बोलावण्यामागील कारण मंत्रिमंडळ विस्तार आहे की आणखी काही आहे, हे येत्या काही दिवसातच समोर येईल.

'खोके' नाट्य आणखीच रंगात, बच्चू कडू रात्रीतून मुंबईला, आता कुणाची मध्यस्थी?
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Oct 28, 2022 | 11:00 AM

स्वप्निल उमप, अमरावतीः खोके घेऊन सत्तेत आले, हा आरोप शिंदे सरकारला (CM Eknath Shinde) स्वस्थ बसू देत नाहीये. तर मित्रपक्ष भाजपनेच आरोप केल्यामुळे शिंदे गटावर मोठं संकट कोसळलंय. भाजपचे आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी खोक्यांचे आरोप केल्याने खवळलेल्या बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनीही आता थेट आव्हान दिलंय. खोके घेतल्याचं कोर्टात सिद्ध करून दाखवाच म्हटलंय. यानंतर बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वाद आणखी पेटण्याची चिन्ह आहेत. या नाट्यात गुरुवारी रात्री बच्चू कडू तातडीने मुंबईला रवाना झालेत.

बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वाद आता मुंबईच्या दरबारात म्हणजे शिंदे-फडणवीस यांच्यासमोर सोडवला जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या प्रकरणी मध्यस्थी करण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडी सरकारमधील प्रमुख पक्ष शिवसेना फोडून एकनाथ शिंदे गट बाहेर पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी ही बंडखोरी करण्यासाठी खोके अर्थात पैसे घेतल्याचा आरोप वारंवार केला जातोय.

शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादीकडून तर हा आरोप होतोच आहे. शिवाय आता अमरावतीचे आमदार रवी राणा यांनीही असाच आरोप केला.

प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र पहिल्या टप्प्यात ते न मिळाल्याने बच्चू कडू नाराज आहेत.

त्यातच देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आमदार रवी राणा यांनी बच्चू कडू यांना डिवचलं. मी गुवाहटीला जाणारा आमदार नाही, पैशांसाठी धावत नाही, असं वक्तव्य केलं.

त्यानंतर बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वाद वाढत गेले. बुधवारी बच्चू कडू यांनी एक पत्रकार परिषद घेत, या आरोपांनाच आव्हान दिलंय. 1 नोव्हेंबर पर्यंत खोके घेतल्याचा आरोप सिद्ध करा, असा इशारा त्यांनी दिलाय. सिद्ध नाही झालं तर हा आरोप कायमचा मिटवता येईल, असंही ते म्हणालेत.

पत्रकार परिषद घेतल्यानंतर गुरुवारी रात्रीतूनच आमदार बच्चू कडू मुंबईत रवाना झाले आहेत. दिवाळीनंतर मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे शिंदे सरकारतर्फे सांगण्यात आले होते.

आता बच्चू कडू यांना मुंबईत बोलावण्यामागील कारण मंत्रिमंडळ विस्तार आहे की आणखी काही आहे, हे येत्या काही दिवसातच समोर येईल.

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.