AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“ज्यांनी घराघरात भांडणं लावली त्यांच्या घरात आता टोकाची भांडणं, मेंढ्यांचं नेतृत्व कधीच लांडग्याकडे नसतं”

ज्यांनी राज्याच्या राजकीय घराण्यात भांडणं लावून घरं फोडली त्याच शरद पवारांच्या (Sharad Pawar) घरात आता टोकाची भांडणं सुरु आहेत, अशी टीका गोपीचंद पडळकर (Gopichand padalkar) यांनी केली. | Pandharpur Mangalwedha Bypoll

ज्यांनी घराघरात भांडणं लावली त्यांच्या घरात आता टोकाची भांडणं, मेंढ्यांचं नेतृत्व कधीच लांडग्याकडे नसतं
गोपीचंद पडळकर आणि शरद पवार
| Updated on: Apr 16, 2021 | 10:29 AM
Share

पंढरपूर (सोलापूर) :  “ज्यांनी राज्याच्या राजकीय घराण्यात भांडणं लावून घरं फोडली त्याच शरद पवारांच्या (Sharad Pawar) घरात आता टोकाची भांडणं सुरु आहेत. मला त्यांना सांगायचंय की नियतीचा न्याय इथेच असतो. मेंढ्यांचं नेतृत्व कधीच लांडग्याकडे नसतं”, अशा शब्दात भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी पवारांवर टीका केली.  (MLC Gopichand Padalkar Attacked Sharad Pawar And NCP Over Pandharpur Mangalwedha Bypoll)

राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पंढरपूर-मंगळवेढा जागेवर पोट निवडणूक (Pandharpur Mangalwedha Bypoll) होत आहे. राष्ट्रवादी आणि भाजपने ही जागा अतिशय प्रतिष्ठेची केली आहे. दोन्ही पक्षांच्या दिग्गज नेत्यांनी प्रचाराची राळ उडवलीय. काल (गुरुवार) प्रचाराच्या तोफा थंडावल्या. शेवटच्या दिवशी पडळकरांनी आवताडे यांच्या प्रचारार्थ सभा घेत राष्ट्रवादीवर आणि पवारांवर तुटून पडले.

राष्ट्रवादी हुशार, गरीब घरचा गृहमंत्री, चिल्लर त्याला, नोटा बारामतीला

गोपीचंद पडळकर म्हणाले, “ज्यांनी राज्यातल्या घराघरात भांडणं लावली, त्यांच्याच घरात आता टोकाची भांडणं आहेत. मात्र मला त्यांना सांगायचंय की नियतीचा न्याय इथेच असतो. राष्ट्रवादीने गोरगरिबांच्या घरावरुन गाढवाचा नांगर फिरवला. मेंढ्याचं नेतृत्व कधीच लांगडा करत नाही”

“राष्ट्रवादी खूप हुशार आहे. बघतानाच गरीब घरचा गृहमंत्री बघतात. साहजिक चिल्लर त्याला आणि नोटा बारामतीला”, अशा शब्दात पडळकर पवारांवर आणि राष्ट्रवादीवर तुटून पडले.

देशमुखांच्या राजीनाम्यानंतर जयंत पाटील खुलले, मात्र वळसे पाटील या गरिबाला गृहमंत्रिपद  दिलं

“एपीआय सचिन वाझे प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांना राजीनामा द्यायला लागला. या काळात जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे खूपच खुलले होते, मात्र दिलीप वळसे पाटील या गरिबाला गृहमंत्रिपद दिलं”, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.

दुसरीकडे पडळकर यांनी अनिल देशमुख यांनाही टोला लगावला. “राज्यात सीबीआयला परवानगीशिवाय एन्ट्री देणार नाही, अशी भाषा काही दिवसांपूर्वी काहीजण बोलत होते. आता त्यांचीच चौकशी सीबीआय करत आहे”, असं पडळकर म्हणाले.

(MLC Gopichand Padalkar Attacked Sharad Pawar And NCP Over Pandharpur Mangalwedha Bypoll)

हे ही वाचा :

‘चंद्रकांत पाटील आणि फडणवीसांना वाईट वाटू नये म्हणून आम्ही गप्प, नाहीतर…’, जयंत पाटलांचा भाजपला मोठा इशारा

चंद्रकांत पाटलांनी कधी शेती केली का? अजित पवारांनी पाटलांना पुन्हा डिवचलं

मला पुन्हा ‘चंपा’ बोललात तर याद राखा, तुमच्या मुलापासून सर्वांचे शॉर्टफॉर्म करेन; चंद्रकांतदादांचा अजित पवारांना इशारा

मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.