AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cabinet meeting : एमएमआरडीएला 60 हजार कोटींचं कर्ज देणार, अनेक प्रकल्प मार्गी लागणार – मुख्यमंत्री शिंदे

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची कॅबिनेट बैठक पार पडली. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये 60 हजार कोटीपर्यंतचे कर्ज उभारण्यास एमएमआरडीएला (MMRDA) मान्यता देण्यात आली आहे.

Cabinet meeting : एमएमआरडीएला 60 हजार कोटींचं कर्ज देणार, अनेक प्रकल्प मार्गी लागणार - मुख्यमंत्री शिंदे
| Updated on: Jul 16, 2022 | 12:41 PM
Share

मुंबई : आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची कॅबिनेट बैठक पार पडली. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये 60 हजार कोटीपर्यंतचे कर्ज उभारण्यास एमएमआरडीएला (MMRDA) मान्यता देण्यात आली आहे. तसेच पहिल्या टप्प्यात 12 हजार कोटींच्या रकमेसाठी शासन हमी देखील देण्यात आली आहे. याबाबत बोलताना एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, मेट्रोमुळे निर्माण होणाऱ्या ट्रॅफिकची कोंडी सोडवण्यासाठीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यासाठी 60 हजार कोटीपर्यंतचे कर्ज उभारण्यास एमएमआरडीएला मान्यता देण्यात आली आहे. तसेच पहिल्या टप्प्यात 12 हजार कोटींच्या रकमेसाठी शासन हमी देखील देण्यात आली आहे. कोणताही प्रकल्प थांबणार नाही यांची काळजी आम्ही घेत आहोत. फडणवीसांच्या कार्यकाळात अनेक विकास प्रकल्प सुरू झाले होते. मात्र कोरोनामुळे त्याला ब्रेक लागला. आता पुन्हा एकदा या प्रकल्पांचे काम वेगाने सुरू होईल, असं शिंदे यांनी म्हटले आहे.

औरंगाबादच्या नामांतरणाला मंजुरी

दरम्यान याच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे नाव धाराशिव व नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण  दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळ करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांनी आपल्या शेवटच्या कॅबिनेटमध्ये औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर तसेच उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याच्या प्रस्तावाल मंजुरी दिली होती. मात्र नवे सरकार सत्तेत येताच त्यांनी उद्धव ठाकरेंच्या या निर्णयला स्थगिती दिली व आज पुन्हा एकदा याबाबत नव्याने निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान याबाबत एकनाथ शिंदे यांना विचारले असता, पूर्वीचे सरकार हे अल्पमतात असताना ते निर्णय घेतले गेले होते, त्यामुळे काही कायदेशीर अडचण निर्माण होऊ नये म्हणून त्या निर्णयाला स्थगिती देऊन नव्याने निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मंत्रिमंडळ विस्तारावरून फडणवीसांचा टोला

मंत्रिमंडळाचा अद्यापही विस्तार झालेला नाही. त्यावरून आता विरोधकांनी नव्या सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. त्यांची लाईन डेड आहे, म्हणून त्यांना डेडलाईन हवी आहे. त्याची चिंता करू नका  असा टोला फडणवीसांनी लगावला आहे.

Follow Us
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी...
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी नेमकं काय घडणार?
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा थेट...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा धक्कादायक प्रकार
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
Sanjay Gaikwad : बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं..
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं आवाहन, आता...
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्ष
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका
पार्थ पवारांच्या भूमिकेवर मुंबई हायकोर्टाचे मोठं स्पष्टीकरण; मुंडवा...
पार्थ पवारांच्या भूमिकेवर मुंबई हायकोर्टाचे मोठं स्पष्टीकरण; मुंडवा गैरव्यवहार प्रकरणाला नवे वळण
केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकी सर्वात मोठा निर्णय; देशातील प्रमुख...
केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकी सर्वात मोठा निर्णय; देशातील प्रमुख महानगरांना जोडणाऱ्या रेल्वे नेटवर्कला मंजुरी
माझे कान 40 टक्के तर डीजेच्या आवाजामुळे खराब झाले; गुलाबराव पाटील....
माझे कान 40 टक्के तर डीजेच्या आवाजामुळे खराब झाले; गुलाबराव पाटलांच्या भाषणाची तुफान चर्चा