Sanjay Raut : मनसेच काय ते एमआयएममध्येही जाऊ शकतात, संजय राऊतांचा शिंदे गटाला टोला

आता सत्तेचा दावा करण्यासाठी एकनाथ शिंदे गट हा कोणत्याही पक्षामध्ये सामील होऊ शकतो. याबद्दल संजय राऊत यांनी हा गट आमदारकी टिकवून ठेवण्यासाठी कोणत्याही स्थराला जाऊ शकतो असे सांगितले आहे. त्यांच्याकडे मनसे, समाजवादी पक्ष, प्रहार संघटना यासह इतर पर्याय असतील पण त्यांना ज्या शिवसेनेने जन्म दिला त्याचाच विसर पडला आहे.

Sanjay Raut : मनसेच काय ते एमआयएममध्येही जाऊ शकतात, संजय राऊतांचा शिंदे गटाला टोला
आमदारकी टिकवण्यासाठी शिंदे गट गट हा एमआयआम मध्येही विलिन होऊ शकतो असा टोला त्यांनी लगवाला आहे.Image Credit source: ANI
Follow us
| Updated on: Jun 27, 2022 | 2:38 PM

मुंबई : (Eknath Shinde) एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील इतर आमदारांनी बंड करताच हा गट (BJP) भाजपात विलिन होणार अशी चर्चा रंगू लागली होती. मात्र, दिवसेंदिवस राजकीय घडामोडी वेगळे वळण घेत असल्याचे चित्र राज्यात आहे. गेल्या दोन दिवसांपासून आता शिंदे गट आपली आमदारकी वाचवण्यासाठी प्रहार, भाजपा नाहीतर मनसे पक्षात विलिन होईल अशी शंकाही उपस्थित केली जात होती. मात्र, या सर्व प्रकरणावर संजय राऊत यांनी शिंदे गटाला टोला लगावला आहे. वेळ पडली तर आमदारकी वाचवण्यासाठी शिंदे गट हा (MIM) एमआयएममध्येही सामील होऊ शकतो असे म्हटले आहे. म्हणजेच हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन वेगळा गट कोणत्या स्थराला जाऊ शकतो हे राऊतांना सांगायचे होते.

शिवसेनेने जन्म दिला मात्र, त्याचाच विसर

आता सत्तेचा दावा करण्यासाठी एकनाथ शिंदे गट हा कोणत्याही पक्षामध्ये सामील होऊ शकतो. याबद्दल संजय राऊत यांनी हा गट आमदारकी टिकवून ठेवण्यासाठी कोणत्याही स्थराला जाऊ शकतो असे सांगितले आहे. त्यांच्याकडे मनसे, समाजवादी पक्ष, प्रहार संघटना यासह इतर पर्याय असतील पण त्यांना ज्या शिवसेनेने जन्म दिला त्याचाच विसर पडला आहे. त्यामुळे शिवसैनिक बाळासाहेब ठाकरे यांच्याशी किती प्रमाणिक राहिले याचा दाखलाही दिला. त्यांनी कोणताही निर्णय घेतला तरी महाराष्ट्राची माती त्यांना माफ करणार नसल्याचे सांगितले.

कोणकोणत्या पक्षात शिंदे गट सामील होण्याची चर्चा?

शिवसेनेतून बंडखोरी करीत आमदारांनी स्वतंत्र असा शिंदे गट तयार केला आहे. मात्र, या गटातील आमदारांना आमदारकी टिकवून ठेवण्यासाठी कुण्यातरी पक्षात सामील व्हावे लागणार आहे. त्याच अनुशंगाने सुरवातीला हा गट प्रहारमध्ये किंवा भाजपा पक्षात सामील होण्याचे संकेत देण्यात आले होते. त्यानंतर मनसेचे हिंदुत्व आणि एकनाथ गटाचा उद्देश एकच असल्याने हा गट मनसेमध्ये सामील होण्याच्या चर्चेला उधाण आले होते. पण आपली आमदारकी टिकवून ठेवण्यासाठी हा गट एमआयएममध्येही सामील होऊ शकतो असा टोला राऊतांनी लगावला आहे.

हे सुद्धा वाचा

कुणाच्याही भावना दुखावल्या नाहीत

बंडखोर आमदारांबद्दल प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी त्यांच्या भावना दुखावल्याचा आरोप केला जात होता. यावर आपण कुणाच्याही भावना दुखावलेल्या नाहीत. बंडखोरांचा बाप काढत भावना दुखावल्याचा आरोप माझ्यावर होत असला तरी याची सुरवात गुलाबराव पाटील यांनी सुरु केल्याचे सांगितले. त्यामुळे ही भाषा आपली नाही तर बंडखोर आमदारांचीच आहे. आतापर्यंत बंडखोरांना समावून घेण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र, बंडानंतर सात दिवसांनी हा शिंदे गट सरकारमधून बाहेर पडला आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.