AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विनोद तावडेंना मनसे नेते संदीप देशपांडेंचं ओपन चॅलेंज

मुंबई : गुढी पाडव्यानिमित्त मुंबईतील शिवाजी पार्क येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पोलखोल करत जोरदार टीका केली. त्यानंतर भाजपच्या नेत्यांकडून राज ठाकरेंना प्रत्युत्तर देण्यास सुरुवात झाली आहे. भाजप नेते आणि राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी अत्यंत जहरी शब्दात राज ठाकरेंवर कालच्या सभेवरुन टीका केली. त्यानंतर आता मनसेकडूनही विनोद तावडेंसह […]

विनोद तावडेंना मनसे नेते संदीप देशपांडेंचं ओपन चॅलेंज
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:04 PM
Share

मुंबई : गुढी पाडव्यानिमित्त मुंबईतील शिवाजी पार्क येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पोलखोल करत जोरदार टीका केली. त्यानंतर भाजपच्या नेत्यांकडून राज ठाकरेंना प्रत्युत्तर देण्यास सुरुवात झाली आहे. भाजप नेते आणि राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी अत्यंत जहरी शब्दात राज ठाकरेंवर कालच्या सभेवरुन टीका केली. त्यानंतर आता मनसेकडूनही विनोद तावडेंसह भाजपला जोरदार प्रत्युत्तर देण्यास सुरुवात झाली आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे यांचं ओपन चॅलेंज

“विनोद तावडेच नव्हे, भाजपच्या तमाम नेत्यांना माझं आव्हान आहे की, त्यांच्यात हिंमत असेल, जे प्रश्न राजसाहेबांनी विचारले आहेत, हिंमत असेल तर मुद्देसूद उत्तरे द्यावीत अन्यथा फालतू बडबड बंद करावी.” असं म्हणत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी विनोद तावडे यांच्यासह भाजपच्या नेत्यांना ओपन चॅलेंज दिलं आहे.

तसेच, “विनोद तावडेंमध्ये हिंमत असेल, तर त्यांनी आमच्यासोबत हरिसालला यावं. आमची एक तरी गोष्ट खोटी ठरली, तर मी राजकारण सोडायला तयार आहे किंवा त्यांनी तरी राजकारण सोडावं, हे माझं त्यांनी खुलं आव्हान आहे.,” असेही संदीप देशपांडे म्हणाले.

अन्यथा राज ठाकरेंना पुढच्या स्क्रीप्ट मिळणार नाहीत, तावडेंची जहरी टीका

“विनोद तावडे हे राज ठाकरेंचं वाक्य मोडून-तोडून सांगत आहेत. राजसाहेब असे म्हणाले की, नरेंद्र मोदींनी आता ज्याप्रकारे देश खड्ड्यात घातला आहे, त्यापेक्षा खड्ड्यात देश जाऊ शकत नाही. हे राजसाहेबांचं वाक्य होतं. मात्र, खोटं बोला, रेटून बोला, ही जी गोबेल्सनिती आहे, ती भाजपची असल्याने विनोद तावडे अशी वक्तव्य करत आहेत.”, असे म्हणत संदीप देशपांडे यांनी विनोद तावडेंसह भाजपवर टीकास्त्र सोडलं.

विनोद तावडेंनी राज ठाकरेंवर काय टीका केली होती?

“देश खड्ड्यात घालायला राहुल गांधींना पंतप्रधान करा, म्हणायला तो काय मनसे पक्ष आहे का? आणि राहुल गांधी पंतप्रधान हवे का ते शरद पवारांना विचारा, अन्यथा पुढच्या स्क्रीप्ट मिळणार नाहीत.” अशी टीका विनोद तावडे यांनी राज ठाकरेंवर केली. पंतप्रधानपद हा काही खेळ नाही, हा भारत देशाचा प्रश्न आहे, असा टोमणाही तावडेंनी राज ठाकरेंना लगावला.

VIDEO : मनसे नेते संदीप देशपांडे काय म्हणाले?

Follow Us
नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
CJP Protest | नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
Viral Video | व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
संध्याकाळी 6 वाजता राहुल गांधींची खासदारांसोबत बैठक,
संध्याकाळी 6 वाजता बैठक, पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलनानंतर कॉंग्रेसची पुढील रणनीती काय?
मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत
Suvrat Joshi | मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा...
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा घेणार लोकसभा अध्यक्षांची भेट
आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
Assam Flood | आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
Viral Video | एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
मंत्रीपदासाठी थेट पक्षच बदलता येत नाही; CM फडणवीसांचं नाव घेत...
मंत्रीपदासाठी थेट पक्षच बदलता येत नाही; CM फडणवीसांचं नाव घेत शिंदेंचा नेता स्पष्टच म्हणाला
MPSC कडून निवड पद्धतीत मोठा बदल, अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होण्याआधी..
MPSC कडून निवड पद्धतीत मोठा बदल, आता अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होण्याआधी...काय बदलणार?