AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

14 कोटींपैकी 18 हजार लोकांना शिवथाळी, इतरांनी जेवायला ‘मातोश्री’वर जायचं की ‘वर्षा’वर : संदीप देशपांडे

मनसेच्या दिशा येणाऱ्या अधिवेशनात ठरवू. एक नवी दिशा देण्याचे काम करु," असेही संदीप देशपांडे (mns sandeep deshpande on shivthali) म्हणाले.

14 कोटींपैकी 18 हजार लोकांना शिवथाळी, इतरांनी जेवायला 'मातोश्री'वर जायचं की 'वर्षा'वर : संदीप देशपांडे
संदीप देशपांडे, मनसे
| Updated on: Jan 03, 2020 | 6:00 PM
Share

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 10 रुपयात पोटभर जेवण ही योजना अंमलात अणली असून त्याबाबत शासन निर्णयही काढण्यात (mns sandeep deshpande on shivthali) आला. “राज्यात अनेक ठिकाणी शिवथाळी सुरु करण्यात आली आहे. मात्र ही शिवथाळी नक्की कोणासाठी? 14 कोटींपैकी 18 हजार लोकांना शिवथाळी मिळणार  आहे. मग बाकीच्यांनी काय मातोश्रीवर जाऊन जेवायचं की वर्षावर जाऊन?” असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला (mns sandeep deshpande on shivthali) आहे.

महाविकासआघाडीच्या खातेवाटपावरही संदीप देशपांडे यांनी टीका केली आहे. “एवढं गोंधळलेले सरकार मी आजपर्यंत बघितलेले नाही. निवडणुकीच्या निकालानंतर सरकार स्थापन होणार की नाही यावर तीन पक्षांचा गोंधळ होता. आपण एकत्र यायचा की नाही. तो गोंधळ संपून मुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडला. त्यानंतर मंत्रिमंडळाचा गोंधळ सुरु झाला.”

“कोण शपथ घेणार कोण शपथ घेणार असे करत करत शिवाजी पार्कवर 6 मंत्र्यांनी शपथ घेतली. त्या 6 मंत्र्यांना जे खातेवाटप करण्यात आलं तेही तात्पुरतं असल्याचे सांगण्यात आलं. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार कधी होईल यावर 15 ते 20 दिवस खलबतं झाली. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार झाला,” असेही संदीप देशपांडे यावेळी (mns sandeep deshpande on shivthali) म्हणाले.

“यानंतर आता खातेवाटपासाठी चार दिवस जातात. तरी अजून खातेवाटप होत नाही. सरकार स्थापन होण्यापूर्वी 20 दिवस बैठका केल्या. मग त्या बैठकीत काय सुरु होतं. त्यात काय खेळ खेळत होते का?,” अशी टीकाही संदीप देशपांडे यांनी केली.

“जवळपास 300 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आणि सरकार खातेवाटपात मश्गुल आहे. हे पहिलं सरकार असेल ज्याने खातेवाटपाआधी बंगले वाटप केलं. म्हणजेच मंत्र्यांना खात्यापेक्षा बंगल्यातच जास्त इंटरेस्ट आहे. यावरुन हे सरकार किती गंभीर आहे.” असेही संदीप देशपांडे (mns sandeep deshpande on shivthali) म्हणाले.

“मंत्र्यांना खाती खाण्यासाठी हवीत की लोकांची सेवा करण्यासाठी असेही संदीप देशपांडे म्हणाले. मुख्यमंत्री पूर्ण दिवस सलमान खानला भेटण्यासाठी महापौर बंगल्यात बसले होते. हे त्यांचे काम आहे का?” असेही ते म्हणाले.

“मंत्री कुठली कामं करतात. झोपा काढतात. बिनखात्याचे मंत्री आहे. ज्यांच्यावर कोणतीही जबाबदारी नाही. असेही देशपांडे म्हणाले. “ऐतिहासिक आघाडी आहे का असा प्रश्न संदीप देशपांडे यांना विचारला असता, ते म्हणाले, इतिहास ठरवेल की ही सर्वात मोठी घोडचूक आहे. ज्या पद्धतीने तीन जण एकत्र आले आहेत. कोणतेही उद्दिष्ट नाही. आपल्या स्वत:चे भलं कस होईल यामुळे हे सर्व एकत्र आले आहेत.

“मनसेच्या दिशा येणाऱ्या अधिवेशनात ठरवू. एक नवी दिशा देण्याचे काम करु,” असेही संदीप देशपांडे यावेळी (mns sandeep deshpande on shivthali) म्हणाले.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!.

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ.

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ

दिल्लीच्या आंदोलनावेळी कॉकरोच जनता पार्टीचे इन्स्टाग्राम सस्पेंड, पुढच्या क्षणात रिकव्हर, नेमकं काय घडलं?.

दिल्लीच्या आंदोलनावेळी कॉकरोच जनता पार्टीचे इन्स्टाग्राम सस्पेंड, पुढच्या क्षणात रिकव्हर, नेमकं काय घडलं?

मोदींचा घातपात करण्याचा कट होता का? एकनाथ शिंदे यांचा राहुल गांधींना सवाल.

मोदींचा घातपात करण्याचा कट होता का? एकनाथ शिंदे यांचा राहुल गांधींना सवाल

ICC Ranking: वनडेत गिलचं अव्वल स्थान 1 गुणाने हुकलं, मालिका पराभव आणि इतक्या धावांमुळे नुकसान.

ICC Ranking: वनडेत गिलचं अव्वल स्थान 1 गुणाने हुकलं, मालिका पराभव आणि इतक्या धावांमुळे नुकसान

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?.

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?