रत्नागिरी: रत्नागिरीतून विमानसेवा सुरु करण्याच्या जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. विमानतळाच्या विस्तारासाठी प्रशासनानं जमिनीचं अधिग्रहण केलीय.मात्र त्याचा मोबदला अजून जमिन मालकांना मिळालेला नाही. शेतकऱ्यांना त्याचा मोबदला अजूनही मिळालेला नाही. त्यामुळेच मोबदल्याबाबत आज प्रांतधिकाऱ्यांकडे या संदर्भात सुनावणी होणार आहे. विमानतळाच्या विस्तारासाठी पार्किग आणि अन्य सुविधांसाठी ५० एकर जमिनीची आवश्यकता आहेे. तर सध्या रत्नागिरीचे विमानतळ कोस्टगार्डच्या ताब्यात आहे.