AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2022 ला संधी होती, ती घेतली असती तर आज राज्यात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री असता-अजित पवार

Ajit Pawar on Maharashtra CM : मी पवारसाहेबांच्याच नेतृत्वात तयार झालोय; अजित पवारांनी राजकीय कारकीर्दीवर प्रकाश टाकला

2022 ला संधी होती, ती घेतली असती तर आज राज्यात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री असता-अजित पवार
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Jul 05, 2023 | 3:01 PM
Share

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत बोलताना मोठे गौप्यस्फोट केल आहे. 2022 ला संधी होती, ती घेतली असती तर आज राज्यात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री असता, असं अजित पवार म्हणालेत. अजित पवार यांनी यावेळीअनेक गौप्यस्फोट केले. 2019 च्या पहाटेच्या शपथविधीवरही प्रकाश टाकला. तसंच 2017 साली देखील राज्यात वेगळं समीकरण समोर येणार होतं, असंही अजित पवार म्हणाले.

आज बोलावलेल्या आमदारांच्या बैठकीत बोलताना अजित पवार यांनी अनेक मुद्द्यांना स्पर्श केला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री होण्याचीही इच्छा व्यक्त केली आहे. मला मनापासून वाटतं की मुख्यमंत्री व्हावं, असं अजित पवार म्हणाले आहेत.

मी जातीपातीचं नात्यागोत्याचं काम केलं नाही. प्रत्येक कार्यकर्त्याचं काम करतो. पहाटे कामाला सुरुवात करतो. आजही करतो. महाराष्ट्र पुढे जावं म्हणून हे करत असतो. देशातील पहिल्या क्रमांकाचं राज्य म्हणून मी काम करत असतो, असंही अजित पवार म्हणाले.

राष्ट्रवादीवर ही वेळ का आली. मी राजकीय जीवनात काम करत असताना साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालो आहे. घडलो आहे. याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. साहेब श्रद्धास्थान आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या. देश पातळीवर आणि राज्य पातळीवर वेगळं राजकारण सुरू आहे, असं अजित पवार म्हणाले.

एखादा पक्ष कशासाठी स्थापन करत असतो. लोकांच्या विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी. संविधानाचा आदर करण्यासाठी. सर्व समाज असेल त्यांच्या विकासासाठी आपण काम करत असतो. सर्व लोकांनी गुण्यागोविंदाने नांदावं. हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकार करायचं असतं त्यासाठी आपण काम करत असतो, असं अजित पवार म्हणाले.

१९६२मध्ये आपल्या वरिष्ठ नेत्यांनी कामला सुरू केली. ६७ला उमेदवारी मिळाली. ७२ राज्य मंत्री झाले. ७५ला कॅबिनेट मंत्री झाले. त्यानंतर असाच प्रसंग उद्भवला आपल्या वरिष्ठ नेत्याने वसंतदादांचं सरकार बाजूला करून मुख्यमंत्री झाले. ते ३८ वर्षाचे होते. तेव्हापासून राज्यातील जनतेने त्यांना साथ दिली. त्यानंतर पुलोद आलं. त्यात हशू आडवाणी वगैरे होते. ८०ला सरकार गेलं. तेव्हाही इंदिराजी म्हणाल्या, तुम्ही काँग्रेसमध्ये आला तर सरकारमध्ये आला तर सरकार ठेवते. नाही म्हणून सांगितलं. ८०ला निवडणुका झाली. इंदिराजींची लाट आली. त्या पंतप्रधान झाल्या, असं अजित पवारांनी सांगितलं.

समाजवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन झाली. ही ८६ची गोष्ट. का झाली माहीत नाही. दोन वर्ष नेत्यांना पद दिलं नाही. राजीव गांधी यांनी नंतर मुख्यमंत्रीपद दिलं. ९०ला निवडणुका झाल्या. बहुमत मिळालं नाही. अपक्षांनी साथ दिली. त्यानंतर राजीव गांधी आपल्यातून निघून गेले,. त्यानंतर लाट आली. नरसिंहराव पंतप्रधान झाले., त्यानंतर नरसिंहराव यांनी केंद्रात बोलावलं. साहेब केंद्रात गेले. सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री झाले. त्यानंतर साहेबांना पुन्हा महाराष्ट्रात पाठवलं, असं म्हणत अजित पवार यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.

Follow Us
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
Andheri Accident | अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं, रिक्षांचा चुराडा
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadnavis | कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल
रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही..
Ramesh Mhatre | डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही कारवाईचे संकेत?
सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
Sudhir Mungantiwar | सत्ता आली की वचन विसरलात?; सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू...
Pandharpur Wari Chori News | पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट! खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू अनावर
सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
Beed kej Morcha | विलास घुले हत्या प्रकरण पेटलं! सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात मोठं काय घडतंय? चर्चांना वेग
नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील... ठाकरे गटाची मोठी पोलखोल
Nashik Thackeray Nagarsevak | नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील त्यांना... ठाकरे गटाची पत्रकार परिषदेत मोठी पोलखोल