AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी महापौरांना पाऊस दिसत नव्हता, आता संजय राऊतांचीही शेरोशायरी

दोन दिवसांपूर्वीच मुंबई महापालिकेचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी आश्चर्यकारक वक्तव्य केलं होतं. त्यामुळे ज्यांच्या हातात सत्ता दिली आहे, त्यांना लोकांविषयी सहानुभूती आहे का असा प्रश्न निर्माण होतोय.

आधी महापौरांना पाऊस दिसत नव्हता, आता संजय राऊतांचीही शेरोशायरी
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 02, 2019 | 3:28 PM
Share

मुंबई : कधीही न थांबणाऱ्या मुंबईचे रस्ते ठप्प झाले आहेत, लाईफलाईन असणारी लोकल रेल्वे बंद पडली आहे आणि रस्त्यांवर पाणी अजूनही साचलेलं आहे. पंपिंग स्टेशन आणि प्रशासनाकडून मदतकार्य केलं जात असलं तरी पाऊस आल्यानंतर पाणी आणखी वाढून अडचणी वाढत आहेत. चिंतेची बाब म्हणजे हवामान विभागाने आणखी चार दिवस पावसाचा इशारा दिलाय. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पण दुर्दैवाची बाब म्हणजे ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांच्याकडूनच बेजबाबदार वक्तव्य केली जात आहेत.

मुंबई महापालिकेवर शिवसेनेची गेल्या अनेक वर्षांपासून सत्ता आहे. पण पाणी तुंबण्यावर महापालिकेला अनेक अनुभवांनंतरही तोडगा काढता आलेला नाही. त्यातच मुंबईकर बेहाल झालेले असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शेरोशायरी केली आहे. दोन दिवसांपूर्वीच मुंबई महापालिकेचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी आश्चर्यकारक वक्तव्य केलं होतं. त्यामुळे ज्यांच्या हातात सत्ता दिली आहे, त्यांना लोकांविषयी सहानुभूती आहे का असा प्रश्न निर्माण होतोय.

कोणतीही आपत्ती नैसर्गिक असली तरी त्यावर तोडगा काढणे आणि लोकांमध्ये विश्वासाचं वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी ही सरकारची असते. कारण, लोकांनी आपले प्रतिनिधी मतदान करुन निवडून दिलेले असतात. दोन दिवसांपूर्वी रस्त्यांवर कंबरेपर्यंत पाणी असताना रस्त्यावर कुठेही पाणी नाही, असं अजब वक्तव्य खुद्द महापौरांनीच केलं होतं. त्यातच आता संजय राऊत यांच्या या शायरीमुळे लोकांचा संताप वाढलाय. युझर्सने संजय राऊत यांनी ट्रोलही केलंय आणि असंवेदनशीलपणावर संताप व्यक्त केलाय.

जबाबदारीने वक्तव्य करण्याची गरज : राहुल शेवाळे

लोकांना मदत करण्याची जबाबदारी ही लोकप्रतिनिधीची असते, त्यामुळे जबाबदारीने वक्तव्य करण्याची गरज असल्याचं शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी म्हटलंय. मुंबईतील अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत झालंय. यामध्ये मदत करण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींची आहे. त्याचबरोबर संपूर्ण जबाबदारी मुंबई महानगरपालिकेची आहे, असं मत राहुल शेवाळे यांनी व्यक्त केलं. लोकप्रतिनिधीने अशा वेळी कुठल्याही प्रकारचं वक्तव्य न करता सांभाळून वक्तव्य करावं आणि सर्वसामान्य जनतेला मदत होईल अशी भूमिका मांडावी असा सल्लाही त्यांनी दिला.

Follow Us
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी...
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी पहिल्यांदाच बोलले, सगळं सांगून टाकलं!
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री अभद्र कांड; धाड टाकताच...
अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा
Video | अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा व्हायरल व्हिडीओ तुफान चर्चेत
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज,
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज, मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
बापरे! गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...
बापरे! यंदा गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...युद्धाचा मोठा फटका!
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरे
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरेंचं थेट विधान, राज्यासभेतील जागेसंदर्भात नवीन ट्वीस्ट
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ..
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ अन्... थरकाप उडवणारी घटना
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मो
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मोठं गिफ्ट; राजकारणात खळबळ!
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर प
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर पोहोचला आकडा?
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन;
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन; उमेदवारांच्या माघारीमुळे राजकारण पेटलं