AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देवेंद्र फडणवीस हे सध्या ना-आवडाबाई झालेत!; ‘अर्धवटराव’च्या टीकेवरून उद्धव ठाकरेंचा पलटवार

मला अर्धवटराव म्हणत असतील तर हे काय आवडाबाई आहेत का?, पण ते...; उद्धव ठाकरेंचा भर पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस सवाल

देवेंद्र फडणवीस हे सध्या ना-आवडाबाई झालेत!; 'अर्धवटराव'च्या टीकेवरून उद्धव ठाकरेंचा पलटवार
Uddhav Thackeray-devendra fadnavis
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Jun 20, 2023 | 3:23 PM
Share

मुंबई : उद्धव ठाकरे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्न विचारला आहे. मला अर्धवटराव म्हणत असतील तर देवेंद्र फडणवीस काय आवडाबाई आहेत का?, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे. पण सध्या देवेंद्र फडणवीस हे ना-आवडाबाई झाले आहेत, असं ठाकरेंनी म्हटलं आहे.

अर्धवटराव, मी काय म्हणालो होतो, ते पूर्ण ऐकलेच नाही… असो, आता ऐका… याच अर्धवटपणामुळे तुम्हाला पानिपत शब्द अलिकडे अधिक आठवायला लागला … म्हणून म्हणतो स्क्रिप्ट रायटर बदला!, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. या टीकेला उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं आहे.

बऱ्याच दिवसांनंतर मुंबईतील नगरसेवकांची बैठक घेतली. मुंबई महापालिका विसर्जित करून आता जवळपास एक वर्ष होऊन गेलं आहे. पण निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. पावसाप्रमाणे निवडणुका सुद्धा आता लांबत चाललेल्या आहेत. पण निवडुका घेण्याची हिंमत आताचं बेकायदेशीर सरकार करत नाहीये, उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

महापालिकेत पैसा उधळला जातोय. त्याला जाब विचारणारं कुणीच नाही. जेव्हा महापालिकेत लोकांचे प्रतिनिधी असतात. तिथं चर्चा होते. तिथं एखाद्या निर्णायाला मंजुरी किंवा ना-मंजुरी दिली जाते. पण आताची परिस्थिती पाहिली तर वारेमाप खर्च केला जातोय. त्यावर कुणाचं नियंत्रण नाही. या भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी, जाब विचारण्यासाठी येत्या एक जुलैला ठाकरे गट महापालिकेवर मोर्चा काढणार आहे. आदित्य ठाकरे आणि इतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते या मोर्चाचं नेतृत्व करतील, अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली आहे. समुद्राचं खारं पाणी गोडं पाणी करण्याबाबतचा प्रकल्प सरकारने रोखला आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबच्या कबरीवर जात माथा टेकवला. त्यावर प्रश्न विचारण्यात आला तेव्हा उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे. जेव्हा आमची युती होती तेव्हा लालकृष्ण आडवाणी सुद्धा जिन्नाच्या कबरीवर नतमस्तक झाले होते आणि नवाज शरीफच्या वाढदिवसाला सुद्धा केक खायला आपले पंतप्रधान गेले होते. त्यामुळे मला वाटतं की स्वच्छ आणि एका विचाराने पुढे जाण्याची गरज आहे. लोकांना इतिहासात अडकवून ठेवण्याची गरज नाही, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.

गद्दारांकडे स्वत:ची ताकद देखील नाहीये. त्यांना ताकददेखील चोरावी लागत आहे. त्यांना सरकारी यंत्रणा आणि पोलिसांची ताकद लावावी लागते आहे. मग स्वत:तील मर्दुमकी कुठंय?, असा सवाल ठाकरेंनी शिंदे गटाला विचारला आहे.

Follow Us
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच: समितीच्या कामकाजावरून वाद
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान: महायुती म्हणून एकत्रित लढण्याला प्राधान्य
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर...
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर कुत्र्याने मालकाच्या घरासमोर ठाण मांडलं
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात...
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात... राजकारणातील हालाचली वाढल्या
त्रिशुलीतील बँक बचाव मोहीम: पुराच्या पाण्यातून सोने आणि रोकड जप्त
नेपाळ पूर: पाण्यात बुडालेल्या बँकेतून ५० कोटींचे सोने सुरक्षित बाहेर
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट...
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट गुन्हा दाखल
पीडित कुटुंबाला सुनेत्रा पवारांकडून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन
पिंपरी चिंचवड हुंडाबळी प्रकरण; सुनेत्रा पवारांनी गवारे कुटुंबीयांशी साधला संवाद
लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी मोर्चाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली
मुंबईत ओबीसी आंदोलनाला परवानगी नाकारली; पोलिसांचा दुसऱ्यांदा नकार