AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाळासाहेबांनी शिकवलेल्या ‘त्या’ एका गोष्टीमुळेच आम्ही उठाव केला; उदय सामंतांनी स्पष्टपणे सांगितलं

Uday Samant On Gaddar Din : बाळासाहेब ठाकरे यांची शिकवणूक, गद्दारीचा आरोप अन् बंडखोरीच्या वर्षपूर्ती; मंत्री उदय सामंत यांची सविस्तर प्रतिक्रिया; म्हणाले...

बाळासाहेबांनी शिकवलेल्या 'त्या' एका गोष्टीमुळेच आम्ही उठाव केला; उदय सामंतांनी स्पष्टपणे सांगितलं
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Jun 20, 2023 | 2:43 PM
Share

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांसह केलेल्या बंडाला आज एक वर्ष पूर्ण झालं. हे बंड होण्यामागची कारणं काय होती? याची चर्चा राजकीय वर्तुळात मागच्या वर्षभरात चर्चेत राहिली. त्याची वेगवेगळी कारणंही शिंदे गटाकडून देण्यात आली आहेत. त्याची चर्चाही होते. शिंदे गटाने गद्दारी केली, असा आरोप ठाकरे गट करतो. आता राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बंडखोरीचं कारण सांगितलं आहे.

बाळासाहेब ठाकरेंनी स्वाभिमानच आम्हाला शिकवला आहे. कधी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसू नका, ही त्यांची शिकवण होती. त्यामुळे आम्ही मागच्या वर्षी 20 तारखेला उठाव केला. त्यात आम्ही सामील झालोय. आमचा हा स्वाभिमान दिन आहे. तर ठाकरे गटाचा गद्दार दिन आहे, असं उदय सामंत म्हणालेत.

शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून खोके दिन साजरा केला जाणार आहे. राष्ट्रवादी आजचा दिवस गद्दार दिन म्हणून साजरा करणार आहे. त्या पार्श्वभूमीवर उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

विरोधक टीका करणार आहेत. सत्ता गेल्यानंतर जी तडफड होते, त्याच उदाहरण आहे. काही लोकांनी सांगितलं आहे आजचा दिवस गद्दार साजरा केला पाहिजे. काही खोके दिन साजरा केला पाहिजे . मी असं समजतो की शिवसेना भाजप युती असताना आम्ही निवडून आलोय त्यानंतर मतदारांशी त्यांनी गद्दारी केली. ते गद्दार दिन साजरा करतात, असं सामंत म्हणालेत.

20 जूनला ज्यांचे खोके बंद झाले. ते खोके दिन साजरे करत आहेत. त्यामुळे त्यांना अजिबात मला किंमत द्यायची नाही. महाराष्ट्राने एकनाथ शिंदे यांचा नेतृत्व स्वीकारलं आहे, हे सिद्ध झालं आहे. आमच्या खऱ्या शिवसेनेला काही कमी पडणार नाही. याची मला खात्री आहे, असं सामंतांनी म्हटलं आहे.

खोटा इतिहास लिहिण्यात अनेक लोक पारंगत आहेत. वैयक्तिक पातळीवरचे टीका करणं, काही लोकांचा धंदा बनला आहे. त्यामुळे त्यांच्या प्रश्न उत्तर देणं, मला योग्य वाटत नाही. ते रिकामे आहेत. ते नऊ वाजता सुरू होतात. रात्री साडेदहा वाजता थांबतात. आम्हाला काम आहेत. आम्ही ती काम करतो, असं म्हणत उदय सामंत यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे.

Follow Us
अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाला वेगळंच वळण; थेट गृहमंत्रा
अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाला वेगळंच वळण; थेट गृहमंत्राल...
ठाकरेंचे बाकी तीन खसादर भाजपच्या... थेट पत्रकार परिषद घेत बड्यानेत्यान
ठाकरेंचे बाकी तीन खसादर भाजपच्या... थेट पत्रकार परिषद घेत बड्यानेत्यानं सांगितलं मोठं गुपित
खासदारांच्या बंडखोरीमागे देवेंद्र फडणवीस यांची मोठी भूमिका? 2 महिन्याआ
खासदारांच्या बंडखोरीमागे देवेंद्र फडणवीस यांची मोठी भूमिका? 2 महिन्याआधीच...मोठी अपडेट समोर!
तब्बल 13 कोटी 99 लाख रुपयांच्या नुकसानानंतर विधानसभेत मोठी घोषणा!
तब्बल 13 कोटी 99 लाख रुपयांच्या नुकसानानंतर विधानसभेत मोठी घोषणा! 1 एप्रिल 2021 पासून...
वरीष्ठांकडून दखल; शिंदे- फडवीसांची चर्चा अन्... संजय दीना पाटलांचं
वरीष्ठांकडून दखल; शिंदे- फडवीसांची चर्चा अन्... संजय दीना पाटलांचं विधान वादाच्या भोवऱ्यात, काय निर्णय घेणार?
संजय पाटील यांच्या त्या वक्तव्यांवरून ठाकरे गट आक्रमक; पोलिसांत तक्रार
Shivsena | संजय दिना पाटील यांच्या त्या वक्तव्यांवरून ठाकरे गट आक्रमक; पोलिसांत तक्रार दाखल
आता सगळंच समोर आलं... लोहगडावर जाण्यापूर्वी... आरोपी सिया आणि चेतनच्या
आता सगळंच समोर आलं... लोहगडावर जाण्यापूर्वी... आरोपी सिया आणि चेतनच्या कॅफेतील CCTVतून हादरवणार खुलासे
बदलापूरमध्ये पत्नीच्या हत्येचा धक्कादायक प्रकार उघड; हार्ट अटॅकचा बनाव
मोठी बातमी! बदलापूरमध्ये पत्नीच्या हत्येचा धक्कादायक प्रकार उघड; हार्ट अटॅकचा बनाव फसला, पती आणि सासू अटकेत
सत्ता डोक्यात गेलीय! संजय पाटलांवर सुषमा अंधारेंचा घणाघात
Sushma Andhare | सत्ता डोक्यात गेलीय! संजय दिना पाटलांवर सुषमा अंधारेंचा घणाघात; फडणवीसांनाही केला थेट सवाल
दोन शक्तिशाली भूकंपांनी व्हेनेझुएलात हाहाकार; मृतांचा आकडा 10
Venezuela | दोन शक्तिशाली भूकंपांनी व्हेनेझुएलात हाहाकार; मृतांचा आकडा 10 हजारांच्या पार जाण्याची भीती!