AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईकर ऑफिसला कसे जाणार? अनलॉक नियमावलीवरुन काँग्रेस नेत्याचाच सरकारला प्रश्न

मुंबई लोकलसह सार्वजनिक वाहतूक अगदी मर्यादित स्वरुपात सुरु ठेवण्यात आलीय. त्यावरुन काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी ठाकरे सरकारला घरचा आहेर दिलाय.

मुंबईकर ऑफिसला कसे जाणार? अनलॉक नियमावलीवरुन काँग्रेस नेत्याचाच सरकारला प्रश्न
काँग्रेस नेते संजय निरुपम, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
| Edited By: sagar joshi | Updated on: Jun 07, 2021 | 3:10 PM
Share

मुंबई : राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत चित्र पाहायला मिळत आहे. त्यानुसार राज्यात 5 टप्पे पाडण्यात आले असून, त्यानुसार अनलॉकिंगची प्रक्रिया सुरु करण्यात आलीय. मुंबईतही काही प्रमाणात नियमावलीत शिथिलता देण्यात आली आहे. राज्य सरकारने राज्यातील जिल्ह्यांची 5 स्तरांमध्ये वर्गवारी केली आहे, त्यात मुंबई तिसऱ्या स्तरात येत असल्याच महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केलं आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील दुकाने, ऑफिस आदींना वेळेची मर्यादा घालून देत, ती सुरु करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, मुंबई लोकलसह सार्वजनिक वाहतूक अगदी मर्यादित स्वरुपात सुरु ठेवण्यात आलीय. त्यावरुन काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी ठाकरे सरकारला घरचा आहेर दिलाय. (Sanjay Nirupam questions Thackeray government about public transport)

संजय निरुपम यांनी ट्विटरद्वारे ठाकरे सरकारला प्रश्न विचारलाय. ‘मुंबईत लॉकडाऊन काही प्रमाणात हटवण्यात आला आहे. मात्र, त्यामुळे मुंबईकरांना अजून काही अडचणींचा सामना करावा लागणार आहे. कार्यालये सुरु होत आहेत, पण सार्वजनिक वाहतूक बंद आहे. बसेसची संख्या वाढवली जावी किंवा लोकल वाहतूक मर्यादित स्वरुपात सुरु करण्यात यावी. नाहीतर लोक कार्यालयांमध्ये कसे जाणार? वर्क फ्रॉम ऑफिसची एक मर्यादा आहे’, अशा शब्दात निरुपम यांनी ठाकरे सरकारला अनलॉकिंच्या मुद्द्यावर प्रश्न विचारला आहे.

लॉकडाऊन उठताच मुंबईत ट्रॅफिक जॅम

अडीच-तीन महिन्यांनंतर आजपासून मुंबईसह राज्यभरातील लॉकडाऊन उठवण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील जिल्ह्यांची पाच स्तरांमध्ये वर्गवारी केली आहे. यामध्ये दुसऱ्या स्तरात समावेश असलेल्या मुंबईत सोमवारी लॉकडाऊन उघडताच नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले.

शहरातील निर्बंध शिथील झाल्यामुळे रस्त्यावरील वर्दळ मोठ्याप्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे दादर परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. सध्या याठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र आहे. आज सकाळपासूनच लोकांनी कामासाठी घराबाहेर पडायला सुरवात केली आहे. ज्याचा थेट परिणाम मुंबईच्या ट्रॅफिकवर पाहायला मिळत आहे. त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला आहे. अनलॉक मुळे आता आंतरजिल्हा बंदी असली तरी ई-पास गरजेचा आहे. सध्या मुंबईला जाण्यासाठी मुलुंडच्या आनंदनगर टोलनाक्यावर मोठ्याप्रमाणावर गाड्यांची गर्दी पाहायला मिळत आहे.

संबंधित बातम्या :

Maharashtra Unlock | सोमवारपासून निर्बंध उठणार, आदेश जारी, कोणत्या टप्यात, कोणते जिल्हे अनलॉक? वाचा सविस्तर

‘आशा’ सेविका लढवय्या, कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यात तुमची भूमिका महत्त्वाची : मुख्यमंत्री

Sanjay Nirupam questions Thackeray government about public transport

Follow Us
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्....
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?.
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात....
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात.....
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार.
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत....
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत.....
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात...
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात....
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत.
आरोपींना संरक्षण देणाऱ्या अश्विनी चैनानीच्या जामीन अर्जाचं काय झालं?
आरोपींना संरक्षण देणाऱ्या अश्विनी चैनानीच्या जामीन अर्जाचं काय झालं?.
मोठी बातमी! 99.9% शुद्ध चांदीवर सरकारचा मोठा निर्णय
मोठी बातमी! 99.9% शुद्ध चांदीवर सरकारचा मोठा निर्णय.