AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MVA: महाराष्ट्राच्या राजकीय नाट्यात राज्यपाल सक्रिय, केंद्राकडे सीआरपीएफ फोर्सची मागणी, गृहसचिवाला पत्र

शिवसैनिकांकडून होणारा हिंसाचार पाहता आधीच केंद्राने काही आमदारांच्या कुटुंबियांना वाय दर्जाची सुरक्षा दिली आहे. त्यात आता आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

MVA: महाराष्ट्राच्या राजकीय नाट्यात राज्यपाल सक्रिय, केंद्राकडे सीआरपीएफ फोर्सची मागणी, गृहसचिवाला पत्र
Image Credit source: tv9
दादासाहेब कारंडे
दादासाहेब कारंडे | Updated on: Jun 26, 2022 | 8:49 PM
Share

मुंबई : गेल्या काही दिवसात राज्यात मोठा पॉलिटिकल ड्रामा सुरू आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांचं बंड हे देशभर गाजत आहेत. अशात राजपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांना कोरोना झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. आजच ते बरे झाले. बरे होताच आता राज्यपाल पुन्हा राजकीय नाट्यात एक्टिव्ह मोडवर आले आहेत. त्यांनी बंडखोर आमदारांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेसाठी आधी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहिलं. त्यानंतर त्यांनी आता थेट केंद्रीय गृह सचिवालयाला पत्र लिहीत केंद्राकडे सीआरपीएफ फोर्सची (CRPF) मागणी केली आहे. त्यामुळे आता राज्यपालांच्या मागणीवर केंद्र ठोस पाऊलं उचलत आणखी सीआरपीएचे जवान तैनात करणार का? हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे. शिवसैनिकांकडून होणारा हिंसाचार पाहता आधीच केंद्राने काही आमदारांच्या कुटुंबियांना वाय दर्जाची सुरक्षा दिली आहे. त्यात आता आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

राज्यपालांचं पत्र जसच्या तसं

गृहमंत्रालयाचाही हाय अलर्ट

दुसरी राज्यातही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. “कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न उद्भवल्यास त्याला सामोरे जाण्यासाठी महाराष्ट्र पोलीस सतर्क आणि सज्ज आहेत. राज्याच्या विविध भागात प्रतिबंधात्मक आदेश लागू आहेत. शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल.” अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ट्विटवरून दिली आहे.

दिलीप वळसे-पाटलांचं ट्विट

शिवसैनिकांनी रान पेटवलं, तर शिंदे समर्थकांचाही इशारा

एकीकडे ठाकरे समर्थक शिवसैनिक रोज बंडखोरंविरोधात आंदोलन करत आहे. अनेक ठिकाणी बंडखोरांचे पुतळे जाळण्यात येत आहे. तर  अनेकांच्या पोस्टरला काळे फासले आहे. अनेकांच्या ऑफीसचा चुराडा केला आहे. तर दुसरीकडे शिंदे समर्थकांकडूनही आंदोलन करण्यात येत आहे. शिंदे समर्थकांनीही इशारा दिला आहे. त्यामुळे आता दोन्ही कार्यकर्ते आमनेसामने येऊन नयेत यासाठी ही खबरदारी घेण्यात येत आहे. तर बंडखोर आमदारांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेची काळजी लक्षात घेऊन आता राज्यपालही केद्राकडे वेळ पडल्यास अतिरिक्त सुरक्षेची मागणी करत आहेत. तर दुसरीकडे राज्यातील पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे.

Follow Us
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी
मोठी बातमी! अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी; कोर्टाचा मोठा निर्णय
फडणवीसांच्या PM शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा
Uddhav Thackeray | फडणवीसांच्या PM पदाच्या शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा; मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर....
नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की...
Pune Nasrapur Case | नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की जन्मठेप?; निकाल थोड्याच वेळात...
छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या..
Rohit Pawar | छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारला इशारा
सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच
Sindhudurg | सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच, शेतकरी चिंतेत!
विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....
Vilas Ghule Case | विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....हत्येचं मूळ कारण आलं समोर