AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनामुळं सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात, ही मुख्यमंत्र्यांची जबाबदारी नाही का?, नारायण राणेंचा सवाल

देशातील सर्वात जास्त 43 हजार रुग्णांचा मृत्यू महाराष्ट्रात झाला. इतके रुग्ण मृत्यूमुखी पडले. याची जबबादारी मुख्यमंत्र्यांची नाही का?, असा सवाल भाजप खासदार नारायण राणेंनी केला आहे. (Narayan Rane said Uddhav Thackeray should be take responsibility of major corona deaths in Maharashtra)

कोरोनामुळं सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात, ही मुख्यमंत्र्यांची जबाबदारी नाही का?, नारायण राणेंचा सवाल
| Updated on: Oct 26, 2020 | 4:26 PM
Share

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यातील भाषणात राज्यात केलेल्या कोणत्याही कामाचा उल्लेख नाही. ना शेतकऱ्याचा उल्लेख ना, राज्याच्या आर्थिक स्थितीबद्दल ते बोलले नाही. कोरोनावर तर ते बोलले नाहीत. कोरोनामुळे  देशातील सर्वात जास्त 43 हजार रुग्णांचा मृत्यू महाराष्ट्रात झाला. इतके रुग्ण मृत्यूमुखी पडले. याची जबबादारी मुख्यमंत्र्यांची नाही का?, असा सवाल भाजप खासदार नारायण राणेंनी केला आहे. (Narayan Rane said Uddhav Thackeray should be take responsibility of major corona deaths in Maharashtra)

नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादानं शिवसेनेचे 56 आमदार निवडून आले. मोदींच्या नावानं मत मागितली म्हणून 56 आमदार निवडून आले, त्यांचे नाव घेतले नसते तर सेनेचे 25 आमदार देखील निवडून आले नसते. हिंदुत्वाला मुठमाती देऊन उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद मिळवलं, अशी टीका नारायण राणेंनी केला.

आजची पत्रकार परिषद दसऱ्याच्या निमित्ताने 47 शिवसैनिकांमध्ये झालेल्या भव्य सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जे भाषण केलं त्याला उत्तर म्हणून ही पत्रकार परिषद घेतोय, असं नारायण राणे म्हणाले. मी आतापर्यंत पाहिलेले जे जे मुख्यमंत्री झाले त्यांनी आपल्या भाषणाने शैलीने विचाराने आणि कामाने आपली आणि महाराष्ट्राची प्रतिष्ठा वाढवली. मात्र,आत्ताचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कालच्या भाषणात कसलाही ताळमेळ नव्हता, शिवराळ भाषेत ते बरळले आहेत.

उद्धव ठाकरे यांनी सीबीआयबद्दल स्वतःच आदित्य ठाकरे यांना क्लिन चीट दिली. सुशांतची आत्महत्या नाही, तो खून आहे. आरोपी आज ना उद्या गजाआड जातील. त्यात त्यांचा पूत्र आदित्य ठाकरे तुरुंगात जाईल. आज मी स्पष्ट बोलतो. ते सत्तेचा दुरुपयोग करुन मुलाला वाचवत आहेत. सुशांतच्या प्रकरणातील सत्य लवकरच बाहेर येईल. त्याला कुणी मारलं आणि दिशाचा बलात्कार कुणी केला, तिला वरुन खाली कोणी टाकलं हे सर्व बाहेर येईल. या माणसाने त्याच्या आयुष्यात काहीही केलेलं नाही. इतरांच्या मदतीनेच कामं केली.

मराठा समाजाला उद्धव ठाकरे आरक्षण देणार नाहीत. त्यांना मराठा समाजाबाबत द्वेष आहे. धनगर समाजाला आरक्षण देऊन दाखवावे, असं आव्हान नारायण राणेंनी दिले आहे.

संबंधित बातम्या :

खूर्ची शाबूत ठेवण्यासाठी आटापिटा, बाळासाहेबांच्या नावाने अजून किती दिवस पोळ्या भाजणार? : चंद्रकांत पाटील

Narayan Rane LIVE | उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्रीपदी राहण्याची लायकी नाही, नारायण राणेंचा हल्लाबोल

(Narayan Rane said Uddhav Thackeray should be take responsibility of major corona deaths in Maharashtra)

स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश
स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश.
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले...
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले....
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ.
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका.
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण...
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण....
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?.
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?.
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी...
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी....
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल.
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ.