AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नारायण राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेतून आदित्य ठाकरेंचा वरळी मतदारसंघ वगळला! कशी असेल राणेंच्या यात्रेची वाटचाल?

राणेंची ही यात्रा 19 आणि 20 ऑगस्टपासून मुंबईतून सुरू होणार आहे. मात्र, आता राणेंच्या यात्रेचं वेळापत्रक बदलण्यात आलं आहे. राणेंच्या या यात्रेतून युवा सेनेचे अध्यक्ष आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघ वगळण्यात आला आहे. त्यामुळे चर्चेला उधाण आलंय.

नारायण राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेतून आदित्य ठाकरेंचा वरळी मतदारसंघ वगळला! कशी असेल राणेंच्या यात्रेची वाटचाल?
केंद्रीय मंत्री नारायण राणे
| Edited By: | Updated on: Aug 18, 2021 | 9:19 PM
Share

मुंबई : भाजप नेते आणि केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला उद्यापासून सुरुवात होणार आहे. राणेंची ही यात्रा 19 आणि 20 ऑगस्टपासून मुंबईतून सुरू होणार आहे. मात्र, आता राणेंच्या यात्रेचं वेळापत्रक बदलण्यात आलं आहे. राणेंच्या या यात्रेतून युवा सेनेचे अध्यक्ष आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघ वगळण्यात आला आहे. त्यामुळे चर्चेला उधाण आलंय. राणे यांची वरळीमध्ये नियोजित सभा होती. मात्र, ही सभाही आता रद्द करण्यात आली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राणेंची यात्रा भाजपसाठी महत्वाची आहे. अशावेळी राणेंच्या यात्रेतून वरळी मतदारसंघ वगळण्यात आल्यामुळे चर्चा सुरु झालीय. (Union Minister Narayan Rane’s Jana Aashirwad Yatra)

कशी असेल राणेंची जनआशीर्वाद यात्रा?

नारायण राणे यांची जन-आशिर्वाद यात्रा 19 आणि 20 ऑगस्टपासून मुंबईतून सुरू होणार आहे. गुरुवार दिनांक 19 ऑगस्ट, सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ येथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करुन यात्रेला सुरुवात होईल. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस या यात्रेला हिरवा झेंडा दाखवतील. यात्रेदरम्यान नारायण राणे हे स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक, चैत्यभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, शिवाजी पार्क येथील हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन करणार आहेत.

‘बाळासाहेब ठाकरे फक्त शिवसेनेचे नाही तर संपूर्ण देशाचे’

भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यालय, नरीमन पॉईंट येथे आयोजित पत्रकार परिषदेत जन-आशिर्वाद यात्रेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर म्हणाले की, जन-आशिर्वाद यात्रेमुळे मुंबई महानगरपालिकेवर भाजपाचा झेंडा फडकवण्यासाठी नक्कीच ताकद मिळेल. या यात्रेमुळे विकास व विश्वासाचं वातावरण निर्माण होईल. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे फक्त शिवसेनेचे नसून संपूर्ण देशाचे आहेत. त्यामुळे त्यांचा आशिर्वाद घेण्याचा सर्वांना अधिकार आहे, असंही दरेकर म्हणाले.

इतर बातम्या :

‘कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण देऊ नका’, मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं जनतेला आवाहन

‘बिंदू नामावलीनुसार धनगर समाजातील विद्यार्थ्यांना जागा द्या, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करु’, पडळकरांचा इशारा

Union Minister Narayan Rane’s Jana Aashirwad Yatra

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.