AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपकडे कार्यकर्ते आहेत का? सगळे तर बिळात शिरले : नवाब मलिक

महाविकास आघाडी सरकारविरोधात भाजप 25 फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात 400 ठिकाणी धरणे आंदोलन करणार आहे.

भाजपकडे कार्यकर्ते आहेत का? सगळे तर बिळात शिरले : नवाब मलिक
| Edited By: | Updated on: Feb 18, 2020 | 12:37 PM
Share

मुंबई : “तुम्ही 25 तारखेला मोर्चा काढाल, पण भाजपकडे कार्यकर्ते आहेत का? सगळे तर बिळात शिरले आहेत”, असा खोचक टोला अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपला लगावला (Minister Nawab Malik slams BJP). महाविकास आघाडी सरकारविरोधात भाजप 25 फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात 400 ठिकाणी धरणे आंदोलन करणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल (17 फेब्रुवारी) पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. त्यानंतर आज नवाब मलिक यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत भाजपवर सडकून टीका केली.

“सीएए, एनआरसी आणि एनपीआर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या डोक्यातील कायदे आहेत. भाजपने या कायद्यांची माहिती लोकांपर्यंत नीट पोहोचवलेली नाही. त्यामुळे लोकांमध्ये या कायद्यांबाबत भीती निर्माण झाली आहे”, असा दावा नवाब मलिक यांनी केला.

“एनआरसीला आम्ही शेवटपर्यंत विरोध करणार आहोत. या कायद्याला आम्ही महाराष्ट्रात लागू होऊ देणार नाही. भाजपने त्यांच्या पक्ष कार्यालयांत आंदोलने करावीत, कारण तेच लोकांपर्यंत हे कायदे नीट पोहचवू शकले नाहीत”, असा सल्ला नवाब मलिक यांनी भाजपला दिला.

नवाब मलिक यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावरही सडकून टीका केली. “चंद्रकांत पाटील यांना मी सांगू इच्छितो की, त्यांनी स्वत:चा इलाज करावा. त्यांनी चांगला डॉक्टर बघावा. त्यांना रोग झाला आहे”, असा घणाघात नवाब मलिक (Minister Nawab Malik slams BJP) यांनी केला.

“कमळाबाईंना शिवसेनेनं सोडचिठ्ठी दिली आणि संसार थाटला नाही. शिवसेनेनं सोडचिठ्ठी दिली म्हणून त्यांना त्रास होतोय. आता ते रडत बसले आहेत. त्यामुळे सर्वकाही सुरु आहे. मात्र, त्याचा काही एक उपयोग होणार नाही”, अशा शब्दात नवाब मलिक यांनी टीका केली.

नवाब मलिक यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यावरुनही भाजपवर निशाणा साधला. “तुम्ही ट्रम्पला आणता. मात्र, अमेरिकेतील निवडणुकीचा हा एक प्रकारचा प्रचार आहे. देशाला या गोष्टीचा काहीच फायदा होणार नाही. देशात बेरोजगारी वाढली आहे. मोदींना देशातील गोरगरिबांची लाज वाटते. हे योग्य नाही”, असंदेखील नवाब मलिक म्हणाले.

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.