AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“कोश्यारीजी, कंबोज-सोमय्या यांच्यासारखे लोक मुंबईतून हाकलून लावा, आमच्या इथली घाण साफ होईल”, विद्या चव्हाण कडाडल्या…

Vidya Chavan: भाजपचे नेते मोहित कंबोज यांच्या निशाण्यावर राष्ट्रवादीचे नेते आहेत. त्याला आता विद्या चव्हाण यांनी जश्यास तसं उत्तर दिलं आहे.

कोश्यारीजी, कंबोज-सोमय्या यांच्यासारखे लोक मुंबईतून हाकलून लावा, आमच्या इथली घाण साफ होईल, विद्या चव्हाण कडाडल्या...
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Aug 29, 2022 | 10:46 AM
Share

मुंबई : ” राज्यपाल भगत सिंह कोश्यारी म्हणाले की मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोक गेले तर काहीच उरणार नाही. आमची त्यांना हात जोडून विनंती आहे. मोहित कंबोज (Mohit Kamboj), किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यासारखे लोक मुंबईतून हाकलून लावा. हे लोक महाराष्ट्राचा अपमान करतात.त्यांचं इथं काहीही काम नाही. ते गेले तर आमच्या मुंबईतील घाण साफ होईल. नरेंद्र मोदी आणि अमित शाहांना जर त्यांचा पुळका असेल तर त्यांना दिल्लीला घेऊन जावं. त्यांना सांभाळावं. इथे राहून ते केवळ बेछूट आरोप करत असतात. आता असले उद्योग त्यांनी बंद करावेत”, असं राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण (Vidya Chavan) म्हणाल्या आहेत. विद्या चव्हाण यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना आपलं मत मांडलं.

सोलापुरात कंबोज यांच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं त्यावर विद्या चव्हाण यांना विचारण्यात आलं तेव्हा मोहित कंबोज सारख्या लोकांना जोडे नाही मारणार तरा काय करणार?, असं चव्हाण म्हणाल्या आहेत. कंबोज तु किरीट सोमय्याचा बाप बनायला लागला की की?, असा सवालही विद्या चव्हाण यांनी विचारला आहे.

निवडणुकीदरम्यानचा ‘तो’ किस्सा

विद्या चव्हाण यांनी निवडणुकीदरम्यानचा किस्सा सांगितला आहे. “भाजपचे बरेचसे नेते माझ्या ओळखीचे आहेत. पण मोहित कंबोज कोण त्यांना मी ओळखत नाही. ते माझ्या परिचयाचे नाहीत. एका निवडणुकीदरम्यान मी दिंडोशी-मालाडमध्ये होते. तेव्हा नोटांनी भरलेली बॅग पोलिसांनी पकडली होती. आमचे कार्यकर्ते त्यांच्या विरोधात आक्रमक झाले होते. ती बॅग घेऊन राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पोलीस स्टेशनला आले होते. पण तेव्हा तत्कालिन मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला की, ते भाजपचे कार्यकर्ते आहेत. तेव्हा मला कळालं की हे मोहित कंबोज आहेत आणि ते भाजपचे नेते आहेत. फडणवीसांकडे गृहखातं असल्यामुळे ते वाचले”, असा किस्सा विद्या चव्हाण यांनी सांगितला.

“मोहित कंबोज म्हणजे ठग आहे. भाजपचा मनी सप्लायर आहे. त्याने मला जय श्रीराम केलंय. तर मी ही त्याला उत्तर दिलंय. हर हर महादेव, जय जय बजरंग बली तोड दे दुश्मन की नली, जय सियाराम! आम्ही रामाच्या आधी सितामय्याचं नाव घेतो. कारण आम्ही सच्चे हिंदु आहोत. आमचं हिंदुत्व ढोंगी नाही. त्यांचं हिंदुत्व ढोंगी आहे” , असं म्हणत विद्या चव्हाण यांनी मोहित कंबोज यांना प्रत्युत्तर दिलंय.

Follow Us
कुत्रे भुंकतात… वाघ शिकार करतो! शिंदेंचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल!
कुत्रे भुंकतात… वाघ शिकार करतो! शिंदेंचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल!
हिम्मत असेल तर समोर या! शिंदेंचं ठाकरेंना थेट खुलं आव्हान
Eknath Shinde | हिम्मत असेल तर समोर या! शिंदेंचं ठाकरेंना थेट खुलं आव्हान, ऑपरेशन तुडवावर जोरदार पलटवार
माझ्यावरील आरोप खरे असतील तर पक्षप्रमुख पद सोडायला तयार...
Uddhav Thackeray | माझ्यावरील आरोप खरे असतील तर पक्षप्रमुख पद सोडायला तयार; ठाकरेंचे मोठे विधान
ऑपरेशन टायगर नंतर; आधी ऑपरेशन कमळ करावं लागेल, ठाकरेंचा मोठा इशारा
Uddhav Thackeray On Operation Kamal | ऑपरेशन टायगर नंतर; आधी ऑपरेशन कमळ करावं लागेल, ठाकरेंचा मोठा इशारा
आज त्या मतदारांची माफी मागतो! उद्धव ठाकरे भावुक, नेमकं काय म्हाणाले...
Uddhav Thackeray | आज त्या मतदारांची माफी मागतो! उद्धव ठाकरे भावुक, नेमकं काय म्हाणाले....
तुमची पोरं पळवणारी टोळी आहे! ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर हल्लाबोल
तुमची पोरं पळवणारी टोळी आहे! वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर हल्लाबोल
आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नाही, सत्ता आमच्यासाठी जन्माला आली
Uddhav Thackeray | आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नाही, सत्ता आमच्यासाठी जन्माला आली; ठाकरेंची सिंहगर्जना
हा फक्त झटका आहे, महापालिकेत मोठा चटका देणार; गुलाबराव पाटलांचा इशारा
Gulabrao Patil | हा फक्त झटका आहे, महापालिकेत मोठा चटका देणार; गुलाबराव पाटलांचा थेट इशारा
2 दिवस थांबा... सगळं स्पष्ट होईल; शिंदेंच्या एका वाक्याने वाढला सस्पेन
2 दिवस थांबा... सगळं स्पष्ट होईल; श्रीकांत शिंदेंच्या एका वाक्याने वाढला सस्पेन्स
मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची..
मोठी बातमी! मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची मोठी घोषणा