AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘माझी जात आडवी आली म्हणून मंत्रिपद मिळालं नाही’, राष्ट्रवादीचा बडा नेता अजितदादांवर नाराज

राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहे. आता बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री प्रकाश सोळंके यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं आहे ते जाणून घेऊयात.

'माझी जात आडवी आली म्हणून मंत्रिपद मिळालं नाही', राष्ट्रवादीचा बडा नेता अजितदादांवर नाराज
| Updated on: Jul 27, 2025 | 7:22 PM
Share

राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहे. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यांच्या जागी धनंजय मुंडेंना संधी दिली जाणार असल्याचीही चर्चा आहे. या सर्व प्रकरणावरून बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री प्रकाश सोळंके यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं आहे ते जाणून घेऊयात.

बीड जिल्हा ओबीसीसाठी राखीव दिला आहे का?

बीड जिल्ह्यातील माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी नाराजी व्यक्त केली आहे. बीड जिल्ह्यात 45 वर्षात मराठा समाजाचा कॅबिनेट मंत्री आणि पालकमंत्री झाला नाही हे दुर्दैव आहे. बीड जिल्ह्यामध्ये ओबीसी आणि मागासवर्गीयांना प्राधान्य देण्याचे काम पक्षाने मागच्या काही वर्षांमध्ये केलं आहे. बीड जिल्हा ओबीसीसाठी राखीव दिला आहे का? असा सवालही सोळंके यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

मराठा समाजाने राष्ट्रवादीला खंबीर पाठींबा दिला

पुढे बोलताना सोळंके म्हणाले की, ‘बीड जिल्ह्यामध्ये सातत्याने मराठा समाज राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठीराखा राहिला आहे. गेल्या अनेक निवडणुकीत केवळ आणि केवळ मराठा समाजाने राष्ट्रवादीला खंबीर पाठींबा दिला. मात्र, मंत्रिपद देताना शरद पवारांपासून ते आता अजित पवारांपर्यंत प्रत्येकाने ओबीसीला संधी दिली. मराठा समाजाकडे ढुंकूनही बघितले नाही.’

मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते

तुम्हाला मंत्रिपद का मिळत नाही यावर बोलताना प्रकाश सोळंके म्हणाले की, मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते असं मला वाटतं. मी ओबीसीमध्ये जन्माला आलो असतो तर संधी मिळाली असती असंही सोळंके यांनी म्हटलं आहे. तसेच आमदार धनंजय मुंडेंना बीडचं पालकमंत्री करावं, किंवा राज्य पातळीवरील मोठ पद द्या, त्यांना संधी मिळत असेल तर माझ्या शुभेच्छा आहेत असंही सोळंके यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, प्रकाश सोळंके यांच्या नाराजीची दखल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली आहे. अजित पवार म्हणाले की, मंगळवारी मुंबईत पक्षातील आमदारांची बैठक बोलावली आहे. त्यावेळी सोळंके यांच्याशी संवाद साधणार आहे. त्यावेळी त्यांच्या नाराजीचं नेमकं कारण जाणून घेणार आहे.’त्यामुळे आता अजित पवार आणि प्रकाश सोळंके यांच्यात नेमकं काय बोलणं होणार आणि त्याचे परिणाम काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Follow Us
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची..
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची...
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा.
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल.
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना....
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना.....
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या...
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या....
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना.
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ.
संजय राऊत यांचा इंधनावरून खळबळजनक दावा, म्हणाले, देशात फक्त एक महिना..
संजय राऊत यांचा इंधनावरून खळबळजनक दावा, म्हणाले, देशात फक्त एक महिना...
एलपीजी पुरवठ्याची संपूर्ण यंत्रणा कोलमडली, सरकार कबूल का करत नाही?
एलपीजी पुरवठ्याची संपूर्ण यंत्रणा कोलमडली, सरकार कबूल का करत नाही?.
महानगर गॅसची २०% कपात; मुंबईतील हॉटेल्स आणि उद्योगांवर परिणाम
महानगर गॅसची २०% कपात; मुंबईतील हॉटेल्स आणि उद्योगांवर परिणाम.