AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रवादीत खरोखरच फूट पडलीय का?, विधानसभा अध्यक्षांचं मोठं विधान; पुन्हा कायद्याचा पेच निर्माण होणार?

अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केल्याने राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे. सध्या राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. एक म्हणजे शरद पवार आणि दुसरा म्हणजे अजित पवार यांचा. पण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी वेगळच विधान केल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

राष्ट्रवादीत खरोखरच फूट पडलीय का?, विधानसभा अध्यक्षांचं मोठं विधान; पुन्हा कायद्याचा पेच निर्माण होणार?
Rahul NarvekarImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jul 05, 2023 | 8:03 AM
Share

मुंबई : अजित पवार यांनी पक्षातच बंड केल्याने राष्ट्रवादीत फूट पडली आहे. अजित पवार यांनी भाजप आणि शिंदे गटाशी हातमिळवणी केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत आता शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले आहेत. यापैकी कोणत्या गटाकडे जावं याचा संभ्रम राष्ट्रवादीच्या आमदार आणि खासदारांना पडला आहे. शरद पवार यांची साथ धरावी की अजित पवार यांची साथ धरावी यामुळे आमदारांमध्ये गोंधळाची स्थिती झाली आहे. राष्ट्रवादीत उभी फूट पडल्याचं संपूर्ण देश पाहत आहेत. मात्र, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी वेगळंच विधान केल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

अद्यापपर्यंत कुठल्याही गटाने किंवा आमदाराने राष्ट्रवादीत फूट पडल्याचं निवेदन मला दिलेलं नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून एकच विधीमंडळ पक्ष आहे. त्यामुळे जो निर्णय होईल तो याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी होईल. अर्धा पक्ष इकडे आणि अर्धा पक्ष तिकडे अशी परिस्थिती आपल्याला उद्भवलेली दिसणार नाही. माझ्याकडे गेल्या दोन दिवसांत अनेक निवेदन आली आहेत, असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितलं. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

पुढचे निर्णय घेणं सोपं जाईल

काही आमदार आणि राजकीय पक्षांनी निवेदन दिली आहेत. त्यात एकापेक्षा अधिक नेत्यांनी पक्षाचं नेतृत्व केल्याचा दावा केला आहे. मला आता खात्री करून घ्यावी लागेल की, नेमका कोण नेता पक्षाचे नेतृत्व करत आहे. हा निर्णय घेतल्यानंतर मला पुढचे निर्णय घेणे सोपे होईल, असंही नार्वेकर यांनी सांगितलं. विधिमंडळ सचिवालयाकडे आलेली निवेदने आणि याचिकांचा अभ्यास केला जात आहे. त्याचं नोटींग तयार करून माझ्यासमोर सादर केल्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल, असंही ते म्हणाले.

कुणालाही बाधा आणू शकत नाही

ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेवर लवकरात लवकर निर्णय देण्यासाठी ही धाव घेतली आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. सर्वोच्च न्यायालयात आणि उच्च न्यायालयात याचिका दाखल करणे प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. त्यावर मी कुठलीही बाधा आणू शकत नाही. संविधानाने आपल्या देशात तीन संस्था निर्माण केल्या आहेत, कार्यकारी मंडळ, विधीमंडळ, कायदेमंडळ या तिन्ही संस्था स्वतंत्रपणे काम करत असतात. एकमेकांच्या कामात तिन्ही संस्था हस्तक्षेप करत नाहीत. संविधानातील तरतुदीनुसार विधानसभा अध्यक्षांच्या कामात आणि कामाच्या पद्धतीत कुठलीही संस्था ढवळाढवळ करणार नाही, असंही ते म्हणाले.

Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत