AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोणता पवार पॉवर फुल्ल, आजच निक्काल लागणार; शरद पवार यांनी बोलावलेल्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर आज शरद पवार आणि अजित पवार गटाची बैठक होणार आहे. दोन्ही गटाने राष्ट्रवादीच्या आमदारांना व्हीप बजावला आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

कोणता पवार पॉवर फुल्ल, आजच निक्काल लागणार; शरद पवार यांनी बोलावलेल्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष
sharad pawarImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 05, 2023 | 6:52 AM
Share

मुंबई : राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केल्यानंतर राष्ट्रवादीत मोठी फूट पडली आहे. अजित पवार सत्तेत सहभागी झाले आहेत. त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली आहे. तर त्यांच्या 9 सहकाऱ्यांनाही मंत्रीपदाची शपथ देण्यात आली आहे. अजितदादांसोबत 43 आमदार असल्याचं सांगितलं जात आहे. तर काही आमदार आणि खासदार परत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना येऊन मिळाले आहेत. मात्र, शरद पवार आणि अजित पवार यांच्या बाजूने किती आमदार आणि खासदार आहे याचा निश्चित आकडा अजूनही समोर आलेला नाही. आज शरद पवार यांनी आमदारांची बैठक बोलावली आहे. अजित पवार यांनीही मेळावा आयोजित केला असून त्यातूनच हे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे आजच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

शरद पवार यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादीच्या आमदार आणि खासदारांची बैठक पार पडणार आहे. शरद पवार यांची बैठक वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये दुपारी 1 वाजता होणार आहे. या बैठकीला पदाधिकाऱ्यांनाही बोलावण्यात आलं आहे. त्यामुळे या बैठकीला कोणकोण आमदार आणि खासदार उपस्थित राहणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर बंड केल्यानंतर अजित पवार यांच्या गटाचा आजच मेळावा होणार आहे. अजित पवार गटाचा मेळावा भुजबळ सीटीला होणार आहे. त्यामुळे अजितदादांच्या या बैठकीला किती आमदार आणि खासदार उपस्थित राहणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

अजितदादा गटाचा दावा काय?

आमच्याकडे पुरेसे संख्याबळ आहे. 40 आमदार आमच्यासोबत आहेत. त्याचबरोबर तीन अपक्ष आमदारही आमच्यासोबत आहेत. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थित राहील, असं आमदार अमोल मिटकरी म्हणाले.

आमदारांची अडचण

दरम्यान, उद्याच्या बैठक आणि मेळाव्यासाठी दोन्ही गटाकडून व्हीप काढण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या आमदारांची अडचण झाली आहे. अजित पवार गटाचे प्रतोद अनिल पाटील यांनी आमदारांसाठी व्हीप काढला आहे. सर्व आमदारांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनाही नोटीस पाठवण्यात आली आहे. विधीमंडळातील गटनेता या नात्याने नोटीस पाठवण्यात आली आहे. दोन्ही गटाकडून नोटीस आल्याने आता आमदार कोणत्या बैठकीला जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Follow Us
खड्डे, बंद कंपन्या आणि बेरोजगारी! वाजेंनी सरकारला एकाच वेळी घेरलं
Rajabhau Waje | खड्डे, बंद कंपन्या आणि बेरोजगारी! राजाभाऊ वाजेंनी सरकारला एकाच वेळी घेरलं
शिवसेनेच्या आमदारांना पवईच्या हॉटेलमध्ये... नरेश म्हस्के काय म्हणाले?
शिवसेनेच्या आमदारांना पवईच्या हॉटेलमध्ये... नरेश म्हस्केंनी सांगितलं पक्ष फुटीच्या अगदी काही दिवसांपूर्वी काय काय घडलं होतं?
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन.... शिंदे गटातील नेत्याचं विधान
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन नाहीतर.... शिंदे गटातील बड्या नेत्याचं राऊतांना खुलं चॅलेंज
मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली....
मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली, ५-६ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
संजय राऊतांची सुप्रीम कोर्टाकडे मोठी मागणी! चुकीच्या लोकांच्या...
संजय राऊतांची सुप्रीम कोर्टाकडे मोठी मागणी! चुकीच्या लोकांच्या हातात शिवसेनेचं चिन्ह...
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? निकालाआधी राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…
राऊतांनी म्हस्केंना बोलावलं अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच हसले!
Sanjay Raut - Naresh Mhaske | सुप्रीम कोर्टाबाहेर राऊतांनी म्हस्केंना बोलावलं अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच हसले!
राज ठाकरे अचानक फडणवीसांच्या भेटीला! भेटीचं नेमकं कारण काय?
मोठी बातमी! भाजपवर टीका अन् अचानक मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला! राज ठाकरेंच्या भेटीचं नेमकं कारण काय?
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?