AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde : आता 12 आमदारांच्या निवडीवरुन राजकारण तापणार, राज्यपाल कोश्यारी पुन्हा चर्चेत येणार, मुख्यमंत्र्यांच्या पत्रात दडलंय काय?

विधान परिषेदवर 12 आमदार हे राज्यपाल नियुक्त असतात. त्याअनुशंगाने राज्यात महाविकास आघाडी सरकारची स्थापना होताच या तीन्ही पक्षांकडून 12 नावाची यादी ही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना देण्यात आली होती. तेव्हापासून आतापर्यंत या यादीनुसार आमदारांची नियुक्ती ही करण्यात आलेली नाही. त्यामुळे अनेक मतभेदही झाले होते.

Eknath Shinde : आता 12 आमदारांच्या निवडीवरुन राजकारण तापणार, राज्यपाल कोश्यारी पुन्हा चर्चेत येणार, मुख्यमंत्र्यांच्या पत्रात दडलंय काय?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: Sep 03, 2022 | 4:40 PM
Share

मुंबई :  (MVA) महाविकास आघाडी सरकारच्या काळापासून (Legislative Council MLA) विधानपरिषदेवरील 12 राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रश्न निकाली लागला नाही. आता महाविकास आघाडी सरकारला पायउतार व्हावे लागले आहे, तर शिंदे सरकार सत्तेत आहे. त्यामुळे पुन्हा या आमदारांच्या निवडीचा मुद्दा नव्याने चर्चेत येत आहे. आणि त्याला कारण ठरले आहेत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ते पत्र. महाविकास आघाडी सरकारने राज्यपालांना दिलेली ती आमदारांची यादी रद्द करावी अशी मागणी पत्राद्वारे (CM Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. त्यामुळे या नव्या प्रकरणावरुन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे पुन्हा चर्चेत येणार असेच चित्र आहे. मात्र, भाजप अन् शिंदे गटाकडून राज्यपालांना पत्र म्हटल्यावर ते काय निर्णय घेणार हे देखील तेवढेच महत्वाचे आहे.

नेमका काय आहे मुद्दा..?

विधान परिषेदवर 12 आमदार हे राज्यपाल नियुक्त असतात. त्याअनुशंगाने राज्यात महाविकास आघाडी सरकारची स्थापना होताच या तीन्ही पक्षांकडून 12 नावाची यादी ही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना देण्यात आली होती. तेव्हापासून आतापर्यंत या यादीनुसार आमदारांची नियुक्ती ही करण्यात आलेली नाही. त्यामुळे अनेक मतभेदही झाले होते. शिवाय राज्यपाल यांच्या कार्यशैलीवरही सवाल उपस्थित करण्यात आले होते. आता शिंदे सरकारची स्थापना होताच महाविकास आघाडी सरकारने दिलेली ती यादी रद्द करण्याची मागणी होत आहे.

शिंदे सरकारकडून नवीन यादी

घर बदलले की घराचे वासेही बदलतात, त्या उक्तीप्रमाणे आता बदल होत आहेत. राज्यात शिंदे आणि फडणवीस यांचे सरकार आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने दिलेली यादी रद्द करुन आता शिंदे सरकारकडून देण्यात आलेल्या यादीवर विचार करावा असे पत्रच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. त्यामुळे राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये कोणाची वर्णी लागणार हे पहावे लागणार आहे.

विरोधकांचे काय आहे म्हणणे?

महाविकास आघाडीने दिलेली यादी जर राज्यपाल यांनी रद्द केली तर आपण कोर्टात जाणार असल्याचा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे. दीड वर्षापासून त्यांच्याकडे यादी असताना त्यावर निर्णयही झाला नाही आणि ती फेटाळण्यातही आली नाही. म्हणजेच ती यादी अजूनही राज्यपाल यांच्या विचारधीन आहे. असे असताना यादी अचानक रद्द झाली तर मात्र, न्यायालयीन लढा लढणार असे वडेट्टीवार यांनी सांगितले आहे.

Follow Us
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश