AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad | निवडणुका टाळण्याचा प्रयत्न? मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये प्रशासक नेमण्याचे आदेश

कोरोनाच्या पहिल्या लाटेतही अनेक पालिकांमध्ये प्रशासक नेमण्याची वेळ आली होती. आता कोरोनाची पहिली आणि दुसरी लाट ओसरली असली, तरिही संकट टळलेलं नाही आहे.

Aurangabad | निवडणुका टाळण्याचा प्रयत्न? मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये प्रशासक नेमण्याचे आदेश
मराठवाड्यातील नगरपरिषदा
| Edited By: | Updated on: Dec 27, 2021 | 11:51 PM
Share

मुंबई : मुदत संपत आलेल्या नगरपंचायती आणि नगरपरिषदांवर प्रशासकांची नेमणूक करण्यात येणार आहे.. मराठवाड्यातील 8 जिल्ह्यातील नगरपरिषदांवर प्रशासकाची नेमणूक करण्यात यावी, असे निर्देश देण्यात आले आहे. तसा आदेशही नगरविकास विभागाकडून जारी करण्यात आला आहे.

कोरोनाचा पुन्हा फटका

देशासह राज्यात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर सार्वत्रिक निवडणुका घेणं शक्य नसल्याचं बोललं जातंय. त्यामुळेच मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये प्रशासक नेमण्याचे आदेश जारी करण्यात आले आहे. मुदत संपूनही निवडणुका घेता येणं शक्य नसल्याचं कारण देत प्रशासकांची नेमणूक केली जावी, असे आदेश नगरविकास विभागानं दिले आहेत. औरंगाबादमधील चार नगरपरिषदा, जालन्यातील चार नगरपरिषदा, परभणीतील सात नगरपरिषदा, हिंगोलीतील तीन, बीडमधील सहा, नांदेडमधील अकरा, उस्मानाबादमधील आठ आणि लातूरमधील चार नगरपरिषदांवर प्रशासक नेमावा, असे आदेश जारी करण्यात आले आहेत.

ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर निवडणुका घेतल्या जाऊ नये, अशी मागणीदेखील करण्यात येत होती. ओबीसी आरक्षण नसल्यानं या निवडणुकांवर त्याचा परिणाम होईल, अशीही भीती व्यक्त केली जात होती. त्या पार्श्वभूमीवर या निवडणुका पुढे ढकलल्या जाव्यात अशीही मागणी जोर धरत होती. दरम्यान, आता कोरोनानं पुन्हा डोकं वर काढल्यामुळे चिंता व्यक्त केली जाते आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे निवडणुका घेता येणं शक्य नसून मुदत संपल्यानं आठ जिल्ह्यांतील नगरपरिषदांवर प्रशासक नेमला जावा, असे आदेश देण्यात आले आहे.

कधी होणार निवडणुका?

दरम्यान, आता या निवडणुका घेणं शक्य नसलं, तरीही नगरपरिषदांच्या निवडणुका नेमक्या कधी होणार, असाही प्रश्न उपस्थित केला जातो आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेतही अनेक पालिकांमध्ये प्रशासक नेमण्याची वेळ आली होती. आता कोरोनाची पहिली आणि दुसरी लाट ओसरली असली, तरिही संकट टळलेलं नाही आहे. ओमिक्रॉनच्या रुग्णांमध्ये वाढ होते आहे. अशा पार्श्वभूमीवर प्रशासकांची नेमणूक करुन आणखी काळ कारभार चालवला जातो, हेही पाहण महत्त्वाचं आहे. त्यासोबत नेमक्या या नगरपरिषदांच्या निवडणुका केव्हा होणार, हाही प्रश्न कायम आहे.

इतर बातम्या –

sudhir mungantiwar | विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया

Panaji | सार्वजनिक ठिकाणी अरविंद केजरीवाल यांचे पोस्टर्स, गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी दर्शविला आक्षेप

Nitesh Rane | राणे पितापुत्र गोवा विमानतळावर भेटले? राणे एकटेच कणकवलीत परतले

Follow Us
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.