एअरस्ट्राईकचे पुरावे मागणाऱ्या राहुल गांधींना बॉम्बला बांधून पाठवायला हवं होतं : पंकजा

जालना : सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना बॉम्ब बांधून पाठवायला हवं होतं, मग कळलं असतं, असे वादग्रस्त वक्तव्य भाजपच्या नेत्या आणि राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या प्रचारासाठी पंकजा मुंडे यांनी जालन्यातील अंबड तालुक्यातील जामखेड येथे सभा घेतली. पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या? ” आमच्या […]

एअरस्ट्राईकचे पुरावे मागणाऱ्या राहुल गांधींना बॉम्बला बांधून पाठवायला हवं होतं : पंकजा
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:00 PM

जालना : सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना बॉम्ब बांधून पाठवायला हवं होतं, मग कळलं असतं, असे वादग्रस्त वक्तव्य भाजपच्या नेत्या आणि राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या प्रचारासाठी पंकजा मुंडे यांनी जालन्यातील अंबड तालुक्यातील जामखेड येथे सभा घेतली.

पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या?

” आमच्या सैन्यावर भ्याड हल्ला झाल्यावर सर्जिकल स्ट्राईक केला, हे इतिहासात पहिल्यांदा झालंय. सर्जिकल स्ट्राईक कुणी केलंय, त्याचे पुरावे काय? मी म्हणलं, एखाद्या बॉम्बला बांधून राहुल गांधींना पाठवायचं होतं दुसऱ्या देशामध्ये. मग कळलं असतं.” असं ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या.

14 फेब्रुवारी 2019 रोजी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे जैश-ए-मोहम्मद या पाकिस्तानातील दहशतवादी संघटनेने सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला. आयईडीने भरलेली गाडी सीआरपीएफच्या ताफ्यात घुसवून दहशतवाद्यांनी स्फोट घडवला. या स्फोटात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले.

या हल्ल्यानंतर संपूर्ण भारतामध्ये संतापाची लाट पसरली होती. त्यानंतर 12 दिवसांनी म्हणजे 26 फेब्रुवारी रोजी भारतीय वायूदलाने पाकिस्तानात घुसून बालाकोट येथील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे तळ उद्ध्वस्त केले. सुमारे एक हजार किलोचा बॉम्ब भारतीय वायूदलाने जैशच्या दहशतवादी तळांवर टाकला.

भारतीय वायूदलाने केलेल्या एअरस्ट्राईकमध्ये किती दहशतवादी मारेल गेले, यावरुन भारतात अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. एअरस्ट्राईकमध्ये नेमके किती दहशतवादी मारले गेले, हे सरकारने सांगावे, अशी मागणी विरोधी पक्षातील अनेकांनी केली होती. मात्र, “वायूदलाने स्पष्ट केले होते की, आम्ही आमचं लक्ष्य पूर्ण केलं, किती दहशतवादी ठार झाले, हे मोजण्याचे काम वायूदलाचे नाही.”

Non Stop LIVE Update
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.