AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नगरचे खासदार दिलीप गांधींवर पंतप्रधान मोदी नाराज?

अहमदनगर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगरमध्ये भाजपच्या आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. बैठकीला प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे स्वतः उपस्थित राहणार आहेत. यावेळी येणाऱ्या निवडणुकीत विरोधकांना हरवण्यासाठी रणनीती आखण्यात येईल. शिवाय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना जबाबदारी निश्चित करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे नगरचे खासदार दिलीप गांधींवर पंतप्रधान नरेंद्र मोदी नाराज आहेत. त्यामुळे गांधींची उमेदवारी धोक्यात आल्याचं बोललं जातंय. […]

नगरचे खासदार दिलीप गांधींवर पंतप्रधान मोदी नाराज?
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:46 PM
Share

अहमदनगर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगरमध्ये भाजपच्या आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. बैठकीला प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे स्वतः उपस्थित राहणार आहेत. यावेळी येणाऱ्या निवडणुकीत विरोधकांना हरवण्यासाठी रणनीती आखण्यात येईल. शिवाय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना जबाबदारी निश्चित करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे नगरचे खासदार दिलीप गांधींवर पंतप्रधान नरेंद्र मोदी नाराज आहेत. त्यामुळे गांधींची उमेदवारी धोक्यात आल्याचं बोललं जातंय.

दिलीप कुमार मनसुखलाल गांधी हे अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. पंतप्रधान त्यांच्यावर नाराज होण्याचं कारणही तसंच आहे. आपल्याला मंत्रीपद द्यावं या मागणीसाठी गांधी यांनी एक शिष्टमंडळ दिल्लीला पाठवल्याचं बोललं जातंय. जैन खासदार असल्याने मंत्रीपद द्यावे अशी मागणी शिष्टमंडळाने केली होती. आधी पक्षाचं काम करा, नंतर मंत्रीपदाचं पाहू असं मोदींनी शिष्टमंडळाला बजावल्याची माहिती आहे. यामुळेच मोदी खासदार गांधींवर नाराज आहेत.

मोदींचं महाराष्ट्रातल्या भाजप खासदारांवर विशेष लक्ष

विरोधक मोदींना हरवण्यासाठी एकत्र येत आहेत. तर मोदीही आपला प्लॅन तयार करत आहेत. या प्लॅनमध्ये महाराष्ट्रातील भाजपचे अर्धे खासदार अडचणीत सापडताना दिसत आहेत. कारण, खासदारांचा कामाचा अहवाल मोदींनी मागवलाय. संसदीय पटल कार्यालयाने 22 खासदारांची माहिती मागवली आहे. संसदेतील उपस्थिती, विचारलेल्या प्रश्नांचा अहवाल, संसदीय बैठकीतली उपस्थिती याचा यामध्ये समावेश आहे. वाचापंकजांसमोर खासदार दिलीप गांधींना मुंडे समर्थकांचे खडेबोल

22 खासदारांचा अहवाल तयार करुन तो मोदींसमोर सादर केला जाईल. कोणत्या खासदारांना परत तिकीट मिळेल, कोणाचा पत्ता कट होईल हे ठरवलं जाणार आहे. महाराष्ट्रात शिवसेना सध्या स्वतंत्र लढण्याची भाषा करते. पण सध्या तरी जे 22 खासदार आहेत, त्यांचं काम आणि लोकप्रियता जाणून घेण्यासाठी आता मोदीच पुढे सरसावले आहेत. वाचाकिंगमेकर शिवाजी कर्डिलेंच्या दोन्ही मुलींचा निकाल लागला!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनही हालचालींना वेग आलाय. दोन दिवसांआधीच नागपुरात संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. 2019 ची लढाई 2014 सारखी नाही. एकत्र येऊन मोदींना हरवण्याचा प्लॅन विरोधक करत आहेत. त्यामुळे तगड्या टीमसोबतच मैदानात उतरण्याची तयारी मोदींनी केली आहे. पण यामुळे महाराष्ट्रातील भाजपच्या खासदारांची धडकी भरली हे मात्र निश्चित आहे.

या खासदारांच्या तिकिटावर टांगती तलवार

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.