AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या राजकारणातील रिंग मास्टर; कुणी केली टीका?

मराठा आरक्षण हा अंतर्गत लढा आहे. निजामी मराठा आणि रयतेचा मराठा असा हा संघर्ष आहे. 70 वर्ष सत्तेमध्ये असलेल्या निजामी मराठ्यांनी रयतेतल्या मराठ्यांकडे दुर्लक्ष केलं. आज या रयतेतल्या मराठ्याचं नेतृत्व मनोज जरांगे पाटील करत आहेत. पण त्यांनाही खाली खेचण्याचं काम केलं जात आहे. काहीजण मराठा विरुद्ध ओबीसी असं भिडवण्याचा प्रयत्न करत आहे. अदृश्य शक्ती हे काम करत आहे, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या राजकारणातील रिंग मास्टर; कुणी केली टीका?
pm modi Image Credit source: TV9MARATHI
| Updated on: Nov 29, 2023 | 8:25 PM
Share

सांगली | 29 नोव्हेंबर 2023 : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. नरेंद्र मोदी हे देशाच्या राजकारणाचे रिंग मास्टर आहेत. त्यांना आपण सर्वांनी ओळखलं पाहिजे. भाजपला रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आणि एकत्र येणं आपल्या हातात आहे, असं मत प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. प्रकाश आंबेडकर हे साांगलीच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना हे विधान केलं.

प्रकाश आंबेडकर यांनी मिरजेतील ईदगाह मैदानाला भेट दिली. यावेळी त्यांनी मुस्लिम समाज आणि मोहल्ला कमिटीची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी मुस्लिम बांधवांनी आंबेडकर यांच्यासमोर ईव्हीएम मशीनबाबत तक्रार केली. त्यावर इलेक्शन कमिशन आणि सरकार दोघेही ईव्हीएम मशीनच्या तपासणीच्या विरोधात आहेत. त्यामुळे ते बॅलेटपेपरवर मतदान घेत नाहीत, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

ईव्हीएमला विरोध

प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी आगामी निवडणुका बॅलेट पेपरवर होण्यासाठी विविध पर्यायही सांगितले. जनतेतून जागृती करून बॅलेट पेपरवर निवडणुकांची मागणी झाली तर शासनाला पर्याय उरणार नाही, असं आंबेडकर म्हणाले.

देशात काहीही घडू शकतं

सध्या राजकारणात समझोता चालू आहे. शेवटी राजकारण आहे. काहीही घडू शकते. निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने आम्ही सध्या जाहीर सभा घेऊ शकतो. केंद्र सरकारचे एक एक धोरण विचारपूर्वक नसल्याचं दिसत आहे. देशातील मुस्लिमांसोबत जसे भाजपा वागत आहे, तसेच दुसऱ्या राष्ट्रांशी वागत आहे. तुम्ही ख्रिश्चनांविरोधात आहात, मग उद्या अमेरिका आणि युरोपबाबत हेच मापदंड लावणार का? केंद्राचं धोरण अपरिपक्व आहे. हे धोरण जातीय व्यवक्थेवर आधारीत आहे, अशी टीका त्यांनी केली.

त्यांनी विचारावं

ज्यांचे नातेवाईक परदेशात आहेत. त्यांनी केंद्र सरकारला प्रत्येक गोष्टीमध्ये धार्मिकता का आणताय? आमचे नातेवाईक धोक्यात का घालताय? असं विचारलं पाहिजे, असंही ते म्हणाले.

पोलीस ठाण्याला विचारा

राज्यात दंगली घडतील असं विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलं होतं. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. दंगली घडवण्याचा अलर्ट पोलिसांना आला की नाही हे प्रत्येक पोलीस ठाण्यात जाऊन विचारा. पोलीस ठाण्यात अलर्ट आला आहे. आधी आयबीला येत होता. आता प्रत्येक पोलीस ठाण्यात आला आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश
स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश.
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले...
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले....
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ.
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका.
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण...
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण....
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?.
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?.
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी...
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी....
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल.
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ.