AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘ये तो सिर्फ झाकी है, शहर अभी बाकी है’, औरंगाबादेत नामकरणावरुन राजकारण तापलं

शहरातील औरंगाबाद विमानतळाचं नाव बदलून छत्रपती संभाजी राजे विमानतळ असं नामकरण करण्यात आलं. याच विषयावरुन औरंगाबाद शहरात आता राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे.

'ये तो सिर्फ झाकी है, शहर अभी बाकी है', औरंगाबादेत नामकरणावरुन राजकारण तापलं
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Mar 06, 2020 | 7:22 PM
Share

औरंगाबाद : शहरातील औरंगाबाद विमानतळाचं नाव बदलून छत्रपती संभाजी राजे विमानतळ असं नामकरण करण्यात आलं. याच विषयावरुन औरंगाबाद शहरात आता राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे (Politics on Renaming of Aurangabad). शहराचं नाव बदलायचं सोडून विमानतळाचं नाव बदलून शिवसेना मुख्य विषयाला बगल देत असल्याचा आरोप विरोधी पक्ष करत आहेत. यावरुनच शिवसेना आणि विरोधीपक्ष यांच्यात जुंपली आहे.

गुरुवारी (5 मार्च) औरंगाबाद विमानतळचं नाव छत्रपती संभाजी राजे विमानतळ असं करण्यात आलं. या नामकरणानंतर शिवसैनिकांनी विमानतळावर गर्दी करत मोठा जल्लोष केला. ‘ये तो सिर्फ झाकी है, शहर अभी बाकी है’, अशा घोषणा मोठ्या आवेशात देण्यात आल्या. मात्र, गेल्या 30 वर्षांपासून औरंगाबादच्या नागरिकांना शहराचं नाव कधी बदललं जाणार याची प्रतिक्षा आहे. मात्र शहराचं नामकरण दृष्टीक्षेपात असल्याचं सांगून शिवसेनेचे नेते नागरिकांचा अजूनही विश्वास वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत.

विमानतळाचं नाव बद्दलण्यानंतर शहराचं नावही लवकरच बदलू असं शिवसैनिक सांगत आहेत. मात्र निवडणुकीच्या तोंडावर ही निव्वळ आश्वासनांची खैरात असल्याचा आरोप सध्या विरोधक करत आहेत. आश्वासन तर शहराचं नाव बदलण्याचं होतं. त्यामुळे शिवसेना शहराचं नाव बदलण्याऐवजी विमानतळाचं नाव बदलून हात झटकण्याचा प्रयत्न करत आहे का असा आरोप मनसेकडून केला जात आहे.

औरंगाबाद शहराचं नाव बदलण्यात यावं अशी आग्रही मागणी भाजपही सातत्याने केली आहे. शहराचं नाव बदलण्यासाठी भारतीय जनता पक्षाने महापालिकेच्या प्रत्येक सर्वसाधारण सभेत महापौरांना स्मरणपत्र दिलं आहे. आतापर्यंत भाजपनं जवळपास 5 स्मरणपत्र दिली आहेत. आता विमानतळाचे नाव बदलल्यानंतर भाजपने या निर्णयाचं स्वागत केलं. मात्र, शहराचं नाव कधी बदलणार असा सवालही उपस्थित केला आहे.

निवडणुकीच्या तोंडावर विमानतळाचे नाव बदलल्यानंतर याचा फायदा शिवसेनेला निश्चित होणार आहे. यानंतर शिवसेना शहराचं नाव बदलण्यासाठी आम्ही एक पाऊल पुढं टाकलंय असा दावाही करू शकते. मात्र, त्यामुळे शहराचं नाव बदलण्यासाठी विरोधकही शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी सज्ज झाल्याचं दिसत आहे.

Politics on Renaming of Aurangabad

Follow Us
गटातटांनी राष्ट्रवादीला पोखरलं... थेट सुनेत्रा पवार मैदानात उतरणार...
गटातटांनी राष्ट्रवादीला पोखरलं... थेट सुनेत्रा पवार मैदानात उतरणार....
ठो ठो आवाज आला... एकदा नव्हे दोनदा... नागपूरमधल्या गजबजलेल्या भागात...
ठो ठो आवाज आला... एकदा नव्हे दोनदा... नागपूरमधल्या गजबजलेल्या भागात....
मुंबईत मराठी फलक नाही? मग कारवाई अटळ; हजारो आस्थापनांची तपासणी....
मुंबईत मराठी फलक नाही? मग कारवाई अटळ; हजारो आस्थापनांची तपासणी.....
राष्ट्रवादीत मोठी धुसफूस! पार्थ पवार vs तटकरे- पटेल?
राष्ट्रवादीत मोठी धुसफूस! पार्थ पवार vs तटकरे- पटेल?.
ही वादळापूर्वीची शांतता….डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याने जगभरात तणाव
ही वादळापूर्वीची शांतता….डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याने जगभरात तणाव.
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही..
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही...
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी..
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्....
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?.
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात....
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात.....