AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘सोनिया गांधींनी केलेली चूक करु नका’, प्रकाश आंबेडकर यांचा मनोज जरांगेंना सल्ला

"ही मोठी लढाई आहे. यात कोण असेल नसेल सांगता येणार नाही. पण ही लढाई लढावी लागेल. ही लढाई लढत असताना देशावर संकट येणार नाही याची दक्षता घ्यावी लागणार आहे", असं प्रकाश आंबेडकर आपल्या भाषणात म्हणाले.

'सोनिया गांधींनी केलेली चूक करु नका', प्रकाश आंबेडकर यांचा मनोज जरांगेंना सल्ला
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Nov 25, 2023 | 10:20 PM
Share

मुंबई | 25 नोव्हेंबर 2023 : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आज दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे संविधान सन्मान महासभेचं आयोजन केलं. या सभेत त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर सविस्तर भूमिका मांडली. यावेळी त्यांनी मराठा नेते मनोज जरांगे यांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे. “आपण सर्वांना माणूस म्हणून बघितलं पाहिजे. मराठा समाजाचं आरक्षण दुराई स्वामीच्या केसमध्ये अडकलं आहे. त्याचं उत्तर आमच्याकडे आहे. म्हणून मी म्हणालो होतो, आम्हाला सत्ता द्या, आम्ही ते सोडवू. पण तुम्ही आग्रह धरला की, मी त्यातील सगळं मांडू, तर इथे जोरदार सामाजिक लढा सुरु आहे. निजामी मराठ्यांमधला आणि रयतेतल्या मराठ्यांमधला”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

“आपण यशवंतराव चव्हाण यांचा फोटो बघितला. यशवंतराव चव्हाण पहिल्यांदा 1962 साली मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांचा साताऱ्यात पहिल्यांदा सत्कार करण्यात आला. सरकार, इनामदार जहांगीरदार, सरदार असे सगळे होते, त्यांनी म्हटलं की, यशवंतराव आपण मुख्यमंत्री झालात, आम्ही तुमचा सत्कार करतो. आता हा किस्सा मजेशीर, यशवंतराव चव्हाण यांना मधोमध बसवलं. त्यांना सोन्याचा ताट दिला आणि जे काही जेवण होतं ते सोन्याच्या ताटात वाढवून खायला सांगितलं”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

‘जी चूक सोनिया गांधी यांनी केली ती…’

“उरलेले जे सरदार, देशमुख, इनामदार होते हे सगळे राऊंड करुन बसले आणि चांदीच्या ताटात जेवण करत बसले. यशवंतराव चव्हाण हे साध्या गरीब कुटुंबातील मराठे. हुशार होते म्हणून त्यांना पंडित जवाहरलाल नेहरु यांनी मुख्यमंत्री केलं. पण ते खटकलं. अपमान करायचा नाही म्हणून सोन्याचा ताट आणि आपण त्यांच्यापेक्षा वेगळे आहोत म्हणून आपल्याला चांदीचा ताट. वेगळेपणा दाखवताना भांडण कायम राहीलं हे लक्षात राहा”, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.

“जोपर्यंत हा निजामी मराठा सत्तेत बसलेला आहे तोपर्यंत रयतेच्या मराठ्याचा आरक्षणाचा प्रश्न कधीच सुटणार नाही. फक्त त्यांनी एवढंच तारतम्य बाळगावं, जी चूक सोनिया गांधी यांनी ‘मौत का सौदागर’ असे शब्द वापरुन केली, त्यांनी सुद्धा आरक्षणाच्या या लढाईत आपण भेदभाव करतोय, वेगळेपणा आणतो, असं कृपा करुन आणू नये. ही मोठी लढाई आहे. यात कोण असेल नसेल सांगता येणार नाही. पण ही लढाई लढावी लागेल. ही लढाई लढत असताना देशावर संकट येणार नाही याची दक्षता घ्यावी लागणार आहे”, असं प्रकाश आंबेडकर आपल्या भाषणात म्हणाले.

Follow Us
भाजप-राष्ट्रवादीत राजकीय संघर्ष
बदलापूर वृक्ष प्राधिकरण नियुक्तीवरून भाजप-राष्ट्रवादीत राजकीय संघर्ष
देवेंद्र फडणवीसांची धर्मेंद्र प्रधान यांच्याशी भेट; म्हणाले,‘माझे बंधू
फडणवीस-प्रधान भेट: माझे बंधू म्हणत देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आनंद
बदलापुरात सीलबंद पाण्याच्या नावाखाली दूषित पाण्याची विक्री?
बदलापूरमध्ये सीलबंद पाण्याच्या नावाखाली अशुद्ध पाण्याची विक्री
मीरा-भाईंदरमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळला; कंत्राटदारांवर 12 कोटींचा दंड
मीरा-भाईंदरमध्ये मेट्रो स्लॅब कोसळला, आदित्य ठाकरेंची कठोर कारवाईची मागणी
शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका? सुप्रीम कोर्टाच्या 'त्या'...
शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका? सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' निर्णयाने... फुटीर 6 खासदारांबाबत नवी अपडेट समोर
नवनाथ वाघमारेंचं वादग्रस्त वक्तव्य, नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया
नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्याचा निषेध, मराठा नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया
एकीकडे NDA सोबतच्या चर्चा फेटाळल्या, दुसरीकडे शरद पवार थेट भाजपच्या...
एकीकडे NDA सोबतच्या चर्चा फेटाळल्या, दुसरीकडे शरद पवार थेट भाजपच्या बड्या नेत्यासह एकाच मंचवर, त्या व्हिडीओची तुफान चर्चा
सचिन अहिर ॲक्शन मोडवर! थेट वरळीला पोहोचले अन्...
Sachin Ahir | सचिन अहिर ॲक्शन मोडवर! थेट वरळीला पोहोचले अन्...
गृहमंत्री अमित शाहांचा मोठा गौप्यस्फोट! स्वातंत्र्यादीनाच्या अगदी एका
गृहमंत्री अमित शाहांचा मोठा गौप्यस्फोट! स्वातंत्र्यदिनाच्या अगदी एका दिवसापूर्वी... धक्कादायक माहितीचा खुलासा
शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशींनी बोलावली तातडीची बौठक; NTA मध्ये मोठा बदल
शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशींनी बोलावली तातडीची बौठक; NTA मध्ये मोठा बदल... दिल्लीत हालचाली वाढल्या!