AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LIVE : नागरिकत्व कायद्यात सुधारणा म्हणजे गांधींजींची स्वप्नपूर्ती : राष्ट्रपती

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अभिभाषणाने अधिवेशनाला सुरुवात झाली.

LIVE :  नागरिकत्व कायद्यात सुधारणा म्हणजे गांधींजींची स्वप्नपूर्ती : राष्ट्रपती
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jan 31, 2020 | 11:51 AM
Share

नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अभिभाषणाने (President Ramnath Kovind speech) अधिवेशनाला सुरुवात झाली. दुपारी 1 वाजता आर्थिक सर्व्हेक्षण मांडण्यात येणार आहे. (President Ramnath Kovind speech)

राष्ट्रपती  रामनाथ कोविंद यांनी आपल्या अभिभाषणात सुधारित नागरिकत्व कायद्याचं समर्थन केलं. राष्ट्रपती म्हणाले, “फाळणीनंतर निर्माण झालेल्या वातावरणात राष्ट्रपिता महात्मा गांधी म्हणाले होते की, “पाकिस्तानात  राहण्याची इच्छा नसलेले पाकिस्तानातील हिंदू आणि शीख भारतात येऊ शकतात. त्यांना सामान्य जीवनदान देणे हे भारत सरकारचे कर्तव्य आहे” . बापूंच्या या कल्पनेचे समर्थन करत अनेक राष्ट्रीय नेत्यांनी आणि राजकीय पक्षांनी वेळोवेळी हा मुद्दा पुढे केला. राष्ट्र निर्मात्यांच्या या इच्छेचा सन्मान करणे ही आपली जबाबदारी आहे.  संसदेच्या दोन्ही सभागृहांद्वारे नागरिकत्व सुधारणा कायदा करून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची इच्छा पूर्ण झाली याचा मला आनंद आहे”

पाकिस्तानमधील अल्पसंख्यांकांवरील अत्याचाराचा मी निषेध करतो आणि जागतिक समुदायाने याकडे लक्ष देऊन या दिशेने आवश्यक पावले उचलण्याची विनंती करतो. तसंच माझे सरकार हे पुन्हा स्पष्ट करु इच्छिते की, भारतावर आस्था ठेवणारे आणि भारताची नागरिकता घेऊ इच्छितात, त्या जगातील सर्व पंथीयांसाठी जी प्रक्रिया आधी होती, तीच आजही कायम आहे, असं राष्ट्रपतींनी स्पष्ट केलं.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणातील मुद्दे

21 व्या शतकाच्या उत्तरार्धात संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करताना मला आनंद होत आहे. नवीन वर्षाच्या शुभेच्छा. या ऐतिहासिक प्रसंगाचे साक्षीदार असल्याबद्दल मी पुन्हा एकदा सर्व खासदारांचे अभिनंदन आणि शुभेच्छा देतो- राष्ट्रपती रामनाथ कोविंद

हे दशक भारतासाठी खूप महत्वाचं आहे. या दशकात आपल्या स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण होतील. माझ्या सरकारच्या प्रयत्नांसह, गेल्या पाच वर्षांत, हे दशक भारताचे दशक आणि या शतकाला भारताचे शतक बनविण्यासाठी एक मजबूत पाया घातला गेला : रामनाथ कोविंद

आमची राज्यघटना देखील या संसदेकडून आणि या सभागृहात उपस्थित असलेल्या प्रत्येक सदस्याकडून देशातील लोकांच्या आशा आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांच्यासाठी आवश्यक असलेले कायदे करण्याची अपेक्षा ठेवून राष्ट्रहिताला सर्वोपरि ठेवते – राष्ट्रपती कोविंद

मला आनंद आहे की गेल्या 7 महिन्यांत संसदेने काम करण्याचे नवे विक्रम केले आहेत. या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनात, सभागृहाची कामगिरी गेल्या सात दशकांत एक नवीन विक्रम आहे – राष्ट्रपती कोविंद

रामजन्मभूमीवरील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर ज्या पद्धतीने देशवासियांनी परिपक्वता दाखवली ते कौतुकास्पद आहे – राष्ट्रपती कोविंद

परस्पर चर्चा आणि वादविवाद लोकशाहीला अधिक बळकट करतात हे माझ्या सरकारचं स्पष्ट मत आहे. त्याचवेळी निषेधाच्या नावाखाली होणारी कोणत्याही प्रकारची हिंसा समाज आणि देश कमकुवत करते – राष्ट्रपती कोविंद

सरकारने गेल्या पाच वर्षात केलेल्या तळागाळातील सुधारणांचा परिणाम असा आहे की भारताच्या आंतरराष्ट्रीय क्रमवारीत बर्‍याच क्षेत्रात अभूतपूर्व सुधारणा झाली आहे – राष्ट्रपती कोविंद

माझे सरकार ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ या मंत्राचा अवलंब करीत पूर्ण निष्ठा आणि प्रामाणिकपणाने काम करत आहे – कोविंद

संसदेच्या दोन्ही सभागृहांद्वारे दोन तृतीयांश बहुमताने घटनेतील कलम 370 आणि कलम 35 ए हटवणे हे केवळ ऐतिहासिक नाही तर जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या समान विकासाचा मार्गही मोकळा झाला आहे – कोविंद

जम्मू-काश्मीर आणि लडाखचा वेगवान विकास, संस्कृती आणि परंपरा यांचे संरक्षण, पारदर्शक व प्रामाणिक प्रशासन आणि लोकशाही सशक्तीकरण ही माझ्या सरकारची प्राथमिकता आहे – कोविंद

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मार्च 2018 पर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये सुमारे 3500 घरे बांधली गेली होती, मात्र दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीत 24 हजार पेक्षा जास्त घरे पूर्ण झाली आहेत – राष्ट्रपती कोविंद

जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये दळणवळण, कनेक्टिव्हिटी, सिंचन, रुग्णालये, पर्यटन संबंधित योजना आणि आयआयटी, आयआयएम, एम्स यासारख्या उच्च शिक्षण संस्थांच्या स्थापनेचे कामही वेगाने सुरू आहे – राष्ट्रपती कोविंद

माझ्या सरकारने कर्तारपूर साहिब कॉरिडोर रेकॉर्ड वेळेत तयार केला आणि गुरुनानक देवजी यांच्या 550 व्या प्रकाश पर्वाच्या निमित्ताने देशाला समर्पित केले – रामनाथ कोविंद

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत 40 लाखाहून अधिक लोक स्वत:च्या हक्काचं घर मिळेल या अपेक्षेने जगत होते.दिल्लीतील 1700 पेक्षा अधिक कॉलनीत राहणाऱ्या लोकांची अपेक्षा पूर्णही झाली.

गेल्या 2 ऑक्टोबर रोजी गांधीजींच्या 150 व्या जयंतीनिमित्त देशाच्या ग्रामीण भागात हगणदारीमुक्त जाहीर करून राष्ट्रपित्याबद्दल खरा आदर व्यक्त केला गेला – राष्ट्रपती कोविंद

आजही देशातील ग्रामीण भागात सुमारे 15 कोटी अशी घरे आहेत, जिथे नळाद्वारे पाणीपुरवठा होत नाही. देशातील खेड्यांमध्ये प्रत्येक घरात पुरेसे पिण्याचे पाणी पोहोचावं, यासाठी माझ्या सरकारने जल जीवन मिशन सुरू केले आहे – कोविंद

देशातील ११२ जिल्ह्यांना आकांक्षा जिल्हा दर्जा देऊन सरकार गरीबांच्या विकासाशी संबंधित प्रत्येक योजनेवर विशेष लक्ष देत आहे – राष्ट्रपती कोविंद

सरकारच्या प्रयत्नांमुळे, सन 2022 पर्यंत सिक्कीम, मिझोरम, मणिपूर आणि नागालँडच्या राजधान्या रेल्वेच्या जाळ्यांनी जोडल्या जातील – राष्ट्रपती कोविंद

केंद्र आणि आसाम सरकारने बोडो संघटनांसोबत 5 दशकांपूर्वीच्या वादाचा शेवट करण्यासाठी ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी केली आहेः राष्ट्रपती कोविंद

केंद्र आणि आसाम सरकारने बोडो संघटनांशी नुकतीच पाच दशकातील बोडो समस्या संपविण्यासाठी ऐतिहासिक करार केला आहे. या करारामुळे अशी एक जटिल समस्या, ज्यामध्ये 4 हजाराहून अधिक लोक मरण पावले, त्यांचे निराकरण झाले आहे – राष्ट्रपती कोविंद

या करारानंतर बोडो समाजाच्या विकासासाठी सरकारकडून 1,500 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत – कोविंद

माझ्या सरकारच्या विशेष विनंतीनुसार, सौदी अरेबियाने हज यात्रेचा कोटा अभूतपूर्व वाढविला गेला, त्यामुळे यावेळी हजमध्ये विक्रमी 2 लाख भारतीय मुस्लिमांनी प्रार्थना केली. भारत हा पहिला देश आहे ज्यामध्ये हजची संपूर्ण प्रक्रिया डिजिटल आणि ऑनलाइन केली गेली आहे – कोविंद

फाळणीनंतर निर्माण झालेल्या वातावरणात राष्ट्रपिता महात्मा गांधी म्हणाले होते की, “तेथे राहण्याची इच्छा नसलेले पाकिस्तानचे हिंदू आणि शीख भारतात येऊ शकतात. त्यांना सामान्य जीवनदान देणे हे भारत सरकारचे कर्तव्य आहे. ”- रामनाथ कोविंद

बापूंच्या या कल्पनेचे समर्थन करत अनेक राष्ट्रीय नेत्यांनी आणि राजकीय पक्षांनी वेळोवेळी हा मुद्दा पुढे केला. राष्ट्र निर्मात्यांच्या या इच्छेचा सन्मान करणे ही आपली जबाबदारी आहे- राष्ट्रपती कोविंद

संसदेच्या दोन्ही सभागृहांद्वारे नागरिकत्व सुधारणा कायदा करून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची इच्छा पूर्ण झाली याचा मला आनंद आहे. – राष्ट्रपती कोविंद

पाकिस्तानमधील अल्पसंख्यांकांवरील अत्याचाराचा मी निषेध करतो आणि जागतिक समुदायाने याकडे लक्ष देऊन या दिशेने आवश्यक पावले उचलण्याची विनंती केली – राष्ट्रपती कोविंद

माझे सरकार हे पुन्हा स्पष्ट करु इच्छिते की, भारतावर आस्था ठेवणारे आणि भारताची नागरिकता घेऊ इच्छितात, त्या जगातील सर्व पंथीयांसाठी जी प्रक्रिया आधी होती, तीच आजही कायम आहे – राष्ट्रपती

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली