AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…म्हणून घेतला राजीनाम्याचा निर्णय; राजन तेली यांचे स्पष्टीकरण, दिपक केसरकरांवरही साधला निशाणा

राजन तेली यांनी भाजपाच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. मात्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी त्यांचा राजीनामा नामंजूर केला आहे. त्यानंतर राजन तेली यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

...म्हणून घेतला राजीनाम्याचा निर्णय; राजन तेली यांचे स्पष्टीकरण, दिपक केसरकरांवरही साधला निशाणा
राजन तेली, चंद्रकांत पाटील
| Edited By: | Updated on: Jan 04, 2022 | 7:45 PM
Share

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane), आमदार नितेश राणे (Nitesh Rane) आणि जिल्हाध्यक्ष राजन तेली (Rajan Teli) यांच्या नेतृत्वात भाजपनं दणदणीत विजय मिळवला. संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि विशेष करुन शिवसेनेला मोठा धक्का बसला. मात्र, निवडणुकीत राजन तेली यांना मात्र पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर तेली यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत, पुढेही पक्षासाठी काम करत राहणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तेली यांचा राजीनामा नामंजूर केला आहे. यावर आता तेली यांनी पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले तेली ?

राजन तेली पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, मी राजीनामा देणार याची वरिष्ठांना एक महिन्यापूर्वीच कल्पना दिली होती. मी कोणावरही नाराज नाही. नवीन लोकांना संधी मिळावी यासाठी मी राजीनाम्याचा निर्णय घेतला होता. मात्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माझा राजीनामा नामंजूर केला आहे. मी यापुढेही पक्षासाठी असेच काम करत राहील.

‘केसरकरांनी भाजपाच्या वाट्याला जाऊ नये’

दरम्यान यावेळी तेली यांनी शिवसेना नेते दीपक केसरकरांवर देखील निशाणा साधला आहे. मी निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी असतो तर आम्ही बँकेच्या सर्व जागा जिंकल्या असत्या असे केसरकर यांनी म्हटले होते. यावर आता तेली यांनी प्रत्युत्तर दिले आहे. केसरकर यांनी भाजपाच्या वाट्याला जाऊ नये, असे केसरकर यांनी म्हटले आहे. तसेच गेल्या 15 वर्षांपासून केसरकर हे बँकेची जागा वापरत असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा उपयोग हा जास्तीत जास्त गरीबांच्या कल्यासाठी करणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

संबंधित बातम्या 

Ajit Pawar | महाराष्ट्रात निर्बंध कठोर होण्याचा निर्णय केव्हा होणार? अजित पवारांनी स्पष्टपणेच सांगून टाकलं!

मुंबईत 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ, काँग्रेस म्हणते, निर्णय चांगला, पण…

राजन तेली यांचा राजीनामा चंद्रकांतदादांनी फेटाळला, तेलींवर विश्वास व्यक्त करत राजकीय वाटचालीसाठीही शुभेच्छा

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.