AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोनिया गांधी जनतेमुळे जिंकल्या तुमच्यामुळे नाही, प्रियांका गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांना झापलं

काँग्रेसच्या चिंतन मंथन बैठकीत 2022 च्या विधानसभा निवडणुकांवर चर्चा करण्यात आली. मात्र, यावेळी प्रियांका गांधी या कार्यकर्त्यांवर जरा नाराज दिसल्या.

सोनिया गांधी जनतेमुळे जिंकल्या तुमच्यामुळे नाही, प्रियांका गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांना झापलं
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: Jun 13, 2019 | 2:21 PM
Share

रायबरेली : युपीए अध्यक्षा सोनिया गांधी बुधवारी (12 जून) रायबरेलीच्या एक दिवसीय दौऱ्यावर होत्या. यावेळी काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी वाड्रा यादेखील त्यांच्यासोबत होत्या. दरम्यान त्यांनी भूएमऊ गेस्ट हाऊसमध्ये नेते आणि कार्यकर्त्यांच्या वेगवेगळ्या बैठका घेतल्या. काँग्रेसच्या चिंतन मंथन बैठकीत 2022 च्या विधानसभा निवडणुकांवरही चर्चा करण्यात आली. मात्र, यावेळी प्रियांका गांधी या कार्यकर्त्यांवर जरा नाराज दिसल्या.

“मी इथे भाषण नाही, तर पुनरावलोकन करुन आपल्या भावना सांगणार आहे. तुम्ही समर्थन दिलं. मात्र, या निवडणुकांमध्ये रायबरेलीच्या जनतेने सोनिया गांधी यांना जिंकवलं. लोकसभा निवडणुकांमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी व्यवस्थित काम केलं नाही. हे ऐकायला वाईट वाटत असलं तरी खरं आहे. गेल्या निवडणुकांमध्ये सोनिया गांधी या 3.5 लाख मतांनी जिंकल्या होत्या. मात्र, यावेळी त्या केवळ 1.67 मतांनी जिंकल्या”, असं प्रियांका गांधी यांनी कार्यकर्त्यांना सुनावलं.

“तुमच्या पैकी कुणी प्रमाणिकपणे काम केलं आहे, हे तुम्हाला माहीत आहे आणि कुणी प्रामाणिकपणे काम केलं नाही त्यांचा शोध मी घेईल. निवडणूक एक संघटन लढत असते, हे मी नेहमी सांगितलं आहे. तयार व्हा, प्रामाणिकपणे काम करायचं असेल तर संघर्ष करावा लागेल”, असंही प्रियांका गांधी म्हणाल्या.

काँग्रेसच्या चिंतन मंथन बैठकीत 2022 मध्ये विधानसभा निवडणुकांमध्ये चर्चा झाली. निवडणुकांमध्ये प्रियांका गांधी वाड्रा या मुख्यमंत्री पदाचा चेहरा असाव्या, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. तसेच आता पराजयाच्या विचारातून बाहेर पडत नव्या जोमाने एकत्रीत होण्याची गरज असल्याचं पक्षातील नेत्यांनी सांगितलं.

विधानसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशात 12 जागांवर निवडणुका पार पडतील. लोकसभा निवडणुकांमध्ये आलेला पराभव मागे सारत आता काँग्रेसने विधानसभा निवडणुकांसाठी कंबर कसली आहे.

संबंधित बातम्या :

थँक्यू राजसाहेब : अमोल कोल्हे

शिवसेना नगरसेविकांची हाणामारी, नगरसेविकेविरुद्ध पोलिसात तक्रार

राहुल गांधींना 2004 पासून राहत असलेला सरकारी बंगला सोडावा लागणार

पुढचा मुख्यमंत्री भाजपचाच, अमित शाहांच्या दाव्याने शिवसेनेची नाराजी?

Follow Us
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी...
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी पहिल्यांदाच बोलले, सगळं सांगून टाकलं!
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री अभद्र कांड; धाड टाकताच...
अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा
Video | अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा व्हायरल व्हिडीओ तुफान चर्चेत
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज,
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज, मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
बापरे! गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...
बापरे! यंदा गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...युद्धाचा मोठा फटका!
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरे
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरेंचं थेट विधान, राज्यासभेतील जागेसंदर्भात नवीन ट्वीस्ट
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ..
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ अन्... थरकाप उडवणारी घटना
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मो
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मोठं गिफ्ट; राजकारणात खळबळ!
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर प
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर पोहोचला आकडा?
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन;
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन; उमेदवारांच्या माघारीमुळे राजकारण पेटलं