AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Narayan Rane : शिंदे सरकारमुळे नाही तर महाविकास आघाडी सरकारच्या ‘त्या’कारनाम्यामुळे प्रकल्प गुजरातला, राणेंनी दिले स्पष्टीकरण

राज्यात विकासकामे जोमात सुरु आहेत. त्यावर काही बोलण्यासारखे आता राहिलेच नाही. त्यामुळे कोणताही मुद्दा काढून टीका करायची याशिवाय विरोधकांकडे काही कामच राहिले नसल्याचे नारायण राणे यांनी सांगितले आहे.

Narayan Rane : शिंदे सरकारमुळे नाही तर महाविकास आघाडी सरकारच्या 'त्या'कारनाम्यामुळे प्रकल्प गुजरातला, राणेंनी दिले स्पष्टीकरण
केंद्रीय मंत्री नारायण राणेImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 15, 2022 | 6:50 PM
Share

मुंबई :  (Vedanta Project) वेदांता प्रकल्पावरुन राज्याचे राजकारण तापले आहे. आरोप-प्रत्यारोप हे सुरुच असताना आपल्या आक्रमक शैलीमुळे चर्चेत असलेले  (Narayan Rane) केंद्रीय मंत्री नारायण राणे हे यावर काय बोलणार? याकडे लक्ष लागले होते. अखेर उशिरा का होईना त्यांची प्रतिक्रिया समोर आली असून, महाविकास आघाडीमध्ये तडजोड व्यवस्थित झाली नाही म्हणून हा प्रकल्प गुजरातला गेल्याचे त्यांनी सांगितले आहे. (CM Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर ते पत्रकारांशी संवाद साधत होते. शिंदे सरकार स्थापन होऊन दोन महिन्याचा कालावधी झाला आहे. या प्रकल्पाचे काम गेल्या अनके दिवसांपासून सुरु होते. पण राज्यात तिघाडी सरकार असल्यामुळे तडजोड झाली नाही आणि प्रकल्प इतरत्र गेल्याचे ते म्हणाले आहेत.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असून या ठिकाणी मिनी ट्रेन सुरु करण्याची मागणी त्यांनी केली आहे. आगामी बजेटमध्ये हा निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

राज्यात विकासकामे जोमात सुरु आहेत. त्यावर काही बोलण्यासारखे आता राहिलेच नाही. त्यामुळे कोणताही मुद्दा काढून टीका करायची याशिवाय विरोधकांकडे काही कामच राहिले नसल्याचे नारायण राणे यांनी सांगितले आहे.

शरद पवार हे राज्याचे 4 वेळेस मुख्यमंत्री होते. एवढ्या मोठ्या कालावधीत राज्यात का औद्योगिक क्रांती झाली नाही. शिवाय आताही शरद पवारांची राजवट आणि तीन पक्षाचे सरकार यामुळेच राज्यात उद्योग आले नसल्याचे राणे म्हणाले आहेत.

गेल्या अडीच वर्षाच्या काळात राज्यात विकास कामांचा झपाटा सुरु आहे. जनतेच्या हिताची कामे शिंदे सरकारने केली आहेत. शिवाय जनतेच्या मनातले सरकार सध्या सत्तेत आहे. त्यामुळे राज्याची चिंता सोडा आपल्या पक्षाचे बघा असा सल्ला नारायण राणे यांनी विरोधकांना दिला आहे.

Follow Us
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला.
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान.
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग.
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह.
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम.
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठा दिलासा; 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठा दिलासा; 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा.
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका.
कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार
कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार.
अर्थसंकल्पात खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा; 12 खेळांसाठी....
अर्थसंकल्पात खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा; 12 खेळांसाठी.....
अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनाबाबत मोठी घोषणा, फडणवीस नेमकं काय म्हणाले
अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनाबाबत मोठी घोषणा, फडणवीस नेमकं काय म्हणाले.