AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टीआरपीसाठी शरद पवार यांनी राजीनामा दिला; देवेंद्र फडणवीस यांचा घणघात

Devendra Fadnavis on Sharad Pawar : शरद पवार यांचा राजीनामा अन् राष्ट्र्वादी पक्षावर देवेंद्र फडणवीस यांची टीका; म्हणाले, हा तर टीआरपीसाठीचा...

टीआरपीसाठी शरद पवार यांनी राजीनामा दिला; देवेंद्र फडणवीस यांचा घणघात
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: May 18, 2023 | 4:55 PM
Share

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शरद पवार यांनी टीआरपीसाठी राजीनामा दिला, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत. वज्रमूठ सभेवर टीका करताना ‘लोक माझे सांगाती’ या शरद पवार यांच्या पुस्तकातील मजकूर देवेंद्र फडणवीस यांनी वाचूनही दाखवला. “मीच माझा राजीनामा माझ्या पक्षाकडे देणार आणि मीच राजीनामा मागे घेणार. टीआरपी कसा मिळवायचा हे पवारांना माहिती आहे, असं म्हणत फडणवीस यांनी शरद पवारांवर टीका केली आहे.

पवारांवर हल्लाबोल

शरद पवार म्हणाले होते की 4-5 राज्यातच भाजपची सत्ता आहे. पण त्यांना हे माहिती नाहीयं देशातील 16 राज्यात आमचं सरकार आहे. आणि इतर ठिकाणी प्रमुख विरोधीपक्ष भाजपच आहे. विरोधी पक्षनेते आमचेच आहेत, असं म्हणत फडणवीसांनी टोला लगावला आहे.

सध्याच्या राजकारणात कुणी म्हणतं भाकरी फिरवली पाहिजे कोण म्हणतं भाकरी करपली आहे. पण आपला भाजप हा एकमेव पक्ष आहे. जो गरिबांच्या भाकरीचा विचार करतो. नाहीतर काहीचे लोक फक्त फक्त भाकरी फिरवण्याची गोष्ट करत आहेत, असं फडणवीस म्हणालेत.

“कर्नाटक पटर्न महाराष्ट्रात चालणार नाही”

मतांचं धृवीकरण कितीही करा. कितीही लांगूलचालन करा. कर्नाटक पटर्न महाराष्ट्रात चालणार नाही. इथे फक्त मोदींचा पटर्न चालणार. कर्नाटकमध्ये 700 पेक्षा कमी मतांनी पडलेले उमेदवार 5 आहेत आणि 2 ते तीन हजारांनी पडलेले 42 उमेदवार आहेत. राज्यात भाजप आणि सेनेची युती भक्कम आहे. आज फक्त शिल्लक सेना महाविकास आघाडीकडे आहे. येत्या निवडणुकीत महापालिका असो की लोकसभा की विधनासभा या निवडणुका युतीच जिंकणार, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

बुथ समक्ष असला तर सर्वजण जरी एकत्र आले तरी काही फरक पडणार नाही. कर्नाटक निकालानंतर उड्या मारत आहेत. मात्र त्याचवेळी सर्वात जास्त राज्यातील सर्व महापालिका भाजपने जिंकल्या. यांचा कर्नाटक फॉर्म्युला लोकसभेत लक्षात येणार आहे. कर्नाटकमध्ये 28 पैकी 25 जागा निवडून येणार, असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला.

ठाकरेंना टोला

उद्धव ठाकरेंनी 8 मागण्या सर्वोच्च न्यायालयात मांडल्या होत्या. मात्र एकही मागणी मान्य झाली नाहीये. तरी उद्धव ठाकरे म्हणतायत जा जा गावी कोर्टचा निर्णय सांगा…, असं म्हणत फडणवीसांनी टोला लगावला आहे.

कार्यकर्त्यांना आवाहन

एका वर्षाचं समर्पण हे मोदींच्या कार्यासाठी, देशासाठी असणार आहे. पुढच्या एका वर्षात कुणाला काहीही मिळणार नाही. कुणी समिती मागायची नाही. कुणी मंत्रिपद मागायचं नाही, असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलंय.

शिंदे-फडणवीस सरकार कार्यकाळ पूर्ण करेन आणि पुढे सुद्धा निवडून येईल, असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केलाय.

Follow Us
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
आदित्य ठाकरे यांच्याकडून त्र्यंबकेश्वरमधील पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
कोर्टातील निकालाच मोठा परिणाम हा... शिंदेंच्या गट नेत्याचं मोठं विधान
कोर्टातील निकालाच मोठा परिणाम हा... एकीकडे कोर्टात सुनावणी सुरू दुसरीकडे शिंदेंच्या गट नेत्याचं मोठं विधान
विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचं 61% कामकाज ठप्प
विनोद तावडे: विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचं 61% कामकाज ठप्प
कंगना राणावत यांची टीका: गृह मंत्रालयाबाबत दुहेरी भूमिका
राहुल गांधींच्या भूमिकेवर कंगना राणावत यांची टीका: गृह मंत्रालयाबाबत दुहेरी भूमिका
रायगडचा पालकमंत्री मीच, लवकरच निर्णय
भरत गोगावले यांची घोषणा: रायगडचा पालकमंत्री मीच, लवकरच निर्णय