AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rahul Gandhi Ed Enquiry : राहुल गांधींची उद्या पुन्हा ईडी चौकशी, काँग्रेस अलर्ट मोडवर, बड्या नेत्यांना दिल्लीत बोलवलं

काँग्रेस वरिष्ठांकडून सुशीलकुमार शिंदे यांना दिल्लीत येण्याची सूचना दिल्याची माहिती समोर आली आहे. उद्या राहुल गांधी ईडी कार्यालयात हजर राहणार आहेत. मात्र सध्या काँग्रेस नेत्या सोनिया गांधी या आजरपणामुळे रुग्णालयात आहेत. त्यामुळे काँग्रेसकडून अतिरिक्त खबरदारी घेतली जात आहे.

Rahul Gandhi Ed Enquiry : राहुल गांधींची उद्या पुन्हा ईडी चौकशी, काँग्रेस अलर्ट मोडवर, बड्या नेत्यांना दिल्लीत बोलवलं
राहुल गांधींची उद्या पुन्हा ईडी चौकशी, काँग्रेस अलर्ट मोडवर, बड्या नेत्यांना दिल्लीत बोलवलंImage Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Jun 19, 2022 | 4:57 PM
Share

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची सलग तीन दिवस ईडी चौकशी (ED Enquiry) पार पडली आहे. त्यानंतर ईडीकडे काही दिवस राहुल गांधी यांनी वेळ मागितला होता. मात्र उद्या राहुल गांधी यांची ईडी चौकशी पुन्हा होणार आहे. त्यामुळे काँग्रेसही सध्या अलर्ट मोडवर आली आहे. काँग्रेसने आपल्या सर्व बड्या नेत्यांना दिल्लीत बोलावलं आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) नवी दिल्लीत दाखल झाले आहेत. काँग्रेस वरिष्ठांकडून सुशीलकुमार शिंदे यांना दिल्लीत येण्याची सूचना दिल्याची माहिती समोर आली आहे. उद्या राहुल गांधी ईडी कार्यालयात हजर राहणार आहेत. मात्र सध्या काँग्रेस नेत्या सोनिया गांधी या आजरपणामुळे रुग्णालयात आहेत. त्यामुळे काँग्रेसकडून अतिरिक्त खबरदारी घेतली जात आहे.

राज्यात अनेक कार्यकर्तेही राजधानीत दाखल

तसेच फक्त नेतेमंडळीच नाही तर अनेक राज्यातून अनेक कार्यकर्तेही दिल्लीत दाखल होत आहे.  महाराष्ट्रातूनही काँग्रेस कार्यकर्ते आता दिल्लीत दाखल होऊ लागले आहेत. राहुल गांधी यांच्यावरील ईडी कारवाईच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे. तसेच राहुल गांधी यांना अटक झाली तर देश पेटून उठेल, असा इशाराही महाराष्ट्र युवक कांग्रेस उपाध्यक्ष शिवराज मोरे यांच्याकडून देण्यात आला आहे.

आतापर्यंत 30 तास चौकशी पार पडली

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणातील गैरव्यवहाराबाबत आतापर्यंत राहुल गांधींची जवळपास 30 तास चौकशी करण्यात आली आहे. राहुल गांधी शुक्रवारी ईडीच्या चौकशीला उपस्थित राहू इच्छित नव्हते. त्यासाठी सोमवारी ही चौकशी करावी, असे आवाहन त्यांच्या वतीने करण्यात आले. तीन दिवसांच्या चौकशीबाबत बोलताना ईडीने अनेक प्रश्न विचारले आहेत. कोलकात्याच्या त्या डोटेक्स कंपनीबाबतही अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्या कंपनीबद्दल सांगितले जात आहे की, 2010 मध्ये तिने यंग इंडियाला एक कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. तरुण भारतने ते कर्ज कधीच फेडले नाही, असा आरोप भाजप करत आहे.

अनेक राज्यात आंदोलनं सुरूच

ईडीने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं राहुल गांधी देऊ शकले नाही, त्यामुळे चौकशीची प्रक्रिया लांबत चालली आहे. यापूर्वी ही चौकशी मंगळवारपर्यंत पूर्ण व्हावी, अशी राहुल गांधींची इच्छा होती, परंतु ईडीकडे प्रश्नांची मोठी यादी आहे जी अद्याप संपलेली नाही. आता प्रश्नांची यादी जितकी लांबेल तितकीच काँग्रेस कार्यकर्त्यांचीही आंदोलनं सुरू आहेत. राहुल गांधींची ईडीची चौकशी सुरू झाल्यापासून काँग्रेस कार्यकर्त्यांनी अनेक राज्यात आंदोलनं केली आहेत. काँग्रेसच्या अनेक नेत्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.