AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राहुल गांधी अमेठीशिवाय या मतदारसंघातूनही निवडणूक लढणार

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी त्यांचा पारंपरिक मतदारसंघ अमेठीशिवाय आणखी एका मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. केरळमधील वायनाड मतदारसंघातून ते लढणार असल्याच्या वृत्ताला काँग्रेस आमदार दीपक सिंह यांनी दुजोरा दिलाय. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचा बडोदा आणि उत्तर प्रदेशातील वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. राहुल गांधी हे संपूर्ण देशाचे नेते […]

राहुल गांधी अमेठीशिवाय या मतदारसंघातूनही निवडणूक लढणार
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:12 PM
Share

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी त्यांचा पारंपरिक मतदारसंघ अमेठीशिवाय आणखी एका मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. केरळमधील वायनाड मतदारसंघातून ते लढणार असल्याच्या वृत्ताला काँग्रेस आमदार दीपक सिंह यांनी दुजोरा दिलाय. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचा बडोदा आणि उत्तर प्रदेशातील वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.

राहुल गांधी हे संपूर्ण देशाचे नेते आहेत. वायनाडमधूनही ते निवडणूक लढतील आणि अमेठीप्रमाणेच लाखोंच्या फरकाने जिंकून येतील. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधीही दोन-दोन जागी निवडणूक लढले होते. या पारंपरिक बाबी आहेत, असं दीपक सिंह म्हणाले. शिवाय राहुल गांधी दोन ठिकाणी निवडणूक लढण्याबाबत विचार करत असल्याचं काँग्रेस प्रवक्त रणदीप सुरजेवाला यांनी म्हटलंय.

वायनाड मतदारसंघ केरळमध्ये काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. एआयसीसी महासचिव ओमन चांडी यांच्या मते, राहुल गांधींनी दक्षिण भारतातूनही निवडणूक लढावी यासाठी मागणी केली जात आहे. त्यामुळेच राहुल गांधींकडे वायनाडमधून लढण्यासाठी आग्रह केला आहे.

काँग्रेस केरळच्या 20 पैकी 16 जागांवर निवडणूक लढत आहे, ज्यापैकी 14 उमेदवार जाहीर केले आहेत. पण वायनाड आणि वडाकरा मतदारसंघाचा उमेदवार अजून जाहीर केलेला नाही. अगोदर राहुल गांधी नांदेडमधून लढणार असल्याचीही चर्चा होती. पण आता वायनाडमधून ते लढणार असल्याचं समोर येतंय.

Follow Us
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!.
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी.
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण.
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक.