AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात राज ठाकरेंचे फेरबदल, माजी नगरसेवकाला हटवून नवे नेतृत्व

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वरळी विधानसभेची धुरा संजय जामदार यांच्या खांद्यावर दिली आहे. संजय जामदार यांनी पक्षातर्फे यापूर्वी वरळी विधानसभा निवडणूक लढवली होती

आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात राज ठाकरेंचे फेरबदल, माजी नगरसेवकाला हटवून नवे नेतृत्व
राज ठाकरेंसह मनसे उपाध्यक्ष संजय जमादार
| Edited By: | Updated on: Jul 14, 2021 | 3:24 PM
Share

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पक्षात संघटनात्मक बदल केले आहेत. माजी नगरसेवक संतोष धुरी (Santosh Dhuri) यांना वरळी विभाग अध्यक्ष पदावरुन हटवण्यात आले आहे. मनसे उपाध्यक्ष संजय जामदार (Sanjay Jamadar) यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या (BMC Election 2022) दृष्टीने मनसे आक्रमक होताना दिसत आहे.

पर्यटन मंत्री आणि शिवसेना आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आमदार असलेल्या वरळी (Worli) विधानसभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महत्त्वाचे बदल केले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वरळी विधानसभेची धुरा संजय जामदार यांच्या खांद्यावर दिली आहे. संजय जामदार यांनी पक्षातर्फे यापूर्वी वरळी विधानसभा निवडणूक लढवली होती. तर फेरबदल केल्यानंतर माजी नगरसेवक संतोष धुरी यांना वरळी विभाग अध्यक्ष पदावरुन हटवण्यात आले आहे.

कोण आहेत संजय जामदार?

संजय जामदार हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष आहेत वरळी विधानसभा मतदारसंघातून यापूर्वी निवडणूक लढवली होती मनसेच्या वीज बिल आंदोलनावेळी हिरीरीने सहभाग

संजय जामदार यांची इन्स्टाग्राम पोस्ट

आदित्य ठाकरेंविरोधात मनसे उमेदवार नव्हता

आदित्य ठाकरे 2019 मध्ये वरळी विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. तिथे आघाडीतर्फे राष्ट्रवादीने उमेदवार दिला होता, मात्र मनसेने ठाकरेंच्या विरोधात उमेदवार उभा केलेला नव्हता. याविषयी निवडणूक काळातच राज ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर ‘हे एक चांगलं कृत्य (जेश्चर) आहे. तो निवडणूक लढवत असेल, तर त्याच्याविरोधात उमेदवार देता कामा नये, असं मला वाटतं, त्यांना काय वाटतं, हा वेगळा मुद्दा आहे, असं राज ठाकरे म्हणाले होते.

संबंधित बातम्या :

आदित्य निवडणूक लढण्यात गैर काय? अमितलाही रोखणार नाही : राज ठाकरे

शिवाजी पार्क प्रकल्पाच्या निविदा रोखण्यासाठी राज ठाकरेंचं पत्र; तर आदित्य ठाकरे म्हणतात, घाई करा

(Raj Thackeray appoints MNS Vice President Sanjay Jamadar as Worli Chief in Aditya Thackeray Vidhansabha Constituency)

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.