AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठे प्रकल्प महाराष्ट्राबाहेर, राज ठाकरेंचं पहिल्यांदाच रोखठोक भाष्य; म्हणाले, पंतप्रधानांनी सर्वांना…

पंतप्रधानांचा विचार विशाल असावा. त्यांनी देशाचा विचार करायला हवा. प्रत्येक राज्य मोठं झालं पाहिजे. प्रत्येक राज्यात उद्योगधंदे आले पाहिजे.

मोठे प्रकल्प महाराष्ट्राबाहेर, राज ठाकरेंचं पहिल्यांदाच रोखठोक भाष्य; म्हणाले, पंतप्रधानांनी सर्वांना...
मनसे अध्यक्ष राज ठाकरेImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Oct 31, 2022 | 1:58 PM
Share

मुंबई: एअर बसपाठोपाठ सॅफ्रॉन प्रकल्पही महाराष्ट्राच्या बाहेर गेला आहे. त्यावरून ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने (congress) शिंदे सरकारला चांगलेच घरले आहे. तसेच भाजपवरही (bjp) जोरदार हल्ला चढवला आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला पळवले जात असल्याचे राजकीय आरोपही होत आहेत. हा वाद सुरू असतानाच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी त्यात उडी घेतली आहे. राज्यातील प्रकल्प बाहेर जाणं योग्य नाही. प्रत्येक प्रकल्प गुजरातला कसा जातो? पंतप्रधानांनी त्याकडे लक्ष द्यावं. तसेच पंतप्रधांनानी सर्व राज्यांना मुलांसारखी समान वागणूक द्यावी, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

राज ठाकरे यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. राज्यातील बाहेर गेला म्हणजे कुठे गेला? गुजरातला गेला. तुम्ही माझी सर्व भाषणं ऐकली असतील तर पंतप्रधान हे देशाचे आहेत. एखाद्या राज्याचे नाहीत हेच मी आधीपासून सांगत आलो आहे. पंतप्रधानांना देशातील सर्व राज्य समान असायला हवीत. त्यांनी सर्व राज्यांना मुलांसारखं समान वागवलं पाहिजे, असं राज ठाकरे म्हणाले.

उद्या महाराष्ट्रातील प्रकल्प बाहेर गेला असता तो असामला गेला असता तर वाईट वाटलं नसतं. गुजरातला गेला. गुजरातही शेवटी देशात आहे. पण वाईट या गोष्टीचं वाटतं जो प्रकल्प येतो तो गुजरातला जातो. पंतप्रधानांनी याकडे लक्ष द्यावं. प्रत्येक गोष्ट गुजरातला जात असेल तर मग राज ठाकरे महाराष्ट्राबाबत बोलतो त्यावेळी संकुचित कसा ठरतो? असा सवाल त्यांनी केला.

पंतप्रधानांचा विचार विशाल असावा. त्यांनी देशाचा विचार करायला हवा. प्रत्येक राज्य मोठं झालं पाहिजे. प्रत्येक राज्यात उद्योगधंदे आले पाहिजे. तिथल्या लोकांना घर सोडून जायची आणि इतर राज्यांमध्ये ओझं बनण्याची आवश्यकता नाही. असे प्रकल्प प्रत्येक राज्यात गेले तर देशाचाच विकास होईल, असंही ते म्हणाले.

गुजरातमध्ये उद्योगांसाठीचं सेटअप आहे. त्यामुळे प्रकल्प तिकडे जात असल्याचं भाजप नेते सांगत आहेत. भाजपचा हा मुद्दा त्यांनी खोडून काढला. तामिळनाडूत, कर्नाटकात उद्योगाचा चांगला सेटअप आहे. फक्त गुजरातमध्ये नाही. उद्योगधंद्याबाबत महाराष्ट्र कोणत्याही राज्यापेक्षा पुढे आहे. उद्योगपतींनाही महाराष्ट्र हे पहिल्या पसंतीचं राज्य राहिलं आहे. त्यामुळे गुजरातमध्ये जास्त सुविधा आहेत आणि महाराष्ट्रात कमी सुविधा आहेत असं नाही. या गोष्टीकडे राजकीय न पाहता देशाचा विकास म्हणून प्रत्येक राज्य मोठं करणं ही पंतप्रधानांची जबाबदारी आहे, असंही त्यांनी सांगितलं.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.