AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rajya Sabha Election 2022: काय होती अहमद पटेल केस? जिच्या आधारावर भाजपानं मविआचे तीन मतं बाद करण्याची मागणी केलीय, अमित शहांना बसला होता झटका

Rajya Sabha Election : 2017 मध्ये गुजरातमध्ये काँग्रेस नेते अहमद पटेल यांच्या केसमध्ये नेमकं काय घडलं होतं? हे जाणून घेणं महत्वाचं ठरणार आहे. कारण, त्याच धर्तीवर भाजपकडून मविआची मतं बाद करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Rajya Sabha Election 2022: काय होती अहमद पटेल केस? जिच्या आधारावर भाजपानं मविआचे तीन मतं बाद करण्याची मागणी केलीय, अमित शहांना बसला होता झटका
अमित शाह, अहमद पटेल (फाईल फोटो)Image Credit source: TV9
sagar joshi
sagar joshi | Updated on: Jun 10, 2022 | 7:05 PM
Share

मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajya Sabha Election) आज मतदान पार पडलं. मात्र, 5 वाजता सुरु होणारी मतमोजणी अद्यापही सुरु झालेली नाही. कारण, भाजपकडून महाविकास आघाडीच्या दोन आमदारांच्या मतदानावर आक्षेप घेण्यात आलाय. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी आपली मतपत्रिका जयंत पाटील यांच्या हातात दिली आणि महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी आपली मतपत्रिका नाना पटोले यांच्या हातात दिल्याचा आक्षेप भाजपकडून घेण्यात आला आहे. त्यानुसार भाजपकडून केंद्रीय निवडणूक आयोगाला (Central Election Commission) पत्र लिहिण्यात आलंय. त्यामुळे राज्यसभेची मतमोजणी अद्यापही सुरु करण्यात आलेली नाही. अशावेळी 2017 मध्ये गुजरातमध्ये काँग्रेस नेते अहमद पटेल यांच्या केसमध्ये नेमकं काय घडलं होतं? हे जाणून घेणं महत्वाचं ठरणार आहे. कारण, त्याच धर्तीवर भाजपकडून मविआची मतं बाद करण्याची मागणी करण्यात आली आहे.

भाजपकडून राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड, काँग्रेसच्या यशोमती ठाकूर आणि शिवसेनेचे सुहास कांदे यांच्या मतांवर आक्षेप घेण्यात आला आहे. यशोमती ठाकूर, जितेंद्र आव्हाड आणि सुहास कांदे यांनी स्वत:च्या पक्षाच्या निवडणूक प्रतिनिधीशिवाय व्यक्तींना त्यांची मतपत्रिका दाखवून मतदानाच्या प्रक्रिया पाळली नाही, अशी तक्रार भाजपकडून करण्यात आली आहे. तसंच 2017 मध्ये अहमद पटेल प्रकरणात निवडणूक आयोगाने निवडणूक नियमांचे उल्लंघन करुन टाकलेले कोणतंही मत मतदानाच्या किंवा मतमोजणीच्या वेळी रद्द केले जाईल, अशी अट घातली होती. त्यामुळे अहमद पटेल 2017 मध्या कशाप्रकारे विजयी ठरले हे जाणून घेणं महत्वाचं आहे.

2017 मध्ये अहमद पटेल प्रकरणात काय घडलं होतं?

2017 मध्ये गुजरात विधानसभा निवडणुकीच्या आसपास राज्यसभा निवडणूक झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन भाजप अध्यक्ष अमित शाह हे केंद्रीय राजकारणात गेल्यानंतर तिथे पहिलीच निवडणूक होत होती. त्यामुळे संपूर्ण देशाचे डोळे या निवडणुकीकडे लागले होते. राज्यसभेच्या तीन जागांवर गुजरातमध्ये निवडणूक पार पडली होती. ज्यात दोन जागांवर भाजपचा विजय निश्चित मानला जात होता. तर एका जागेबाबत अनिश्चितता होती. तिसऱ्या जागेवर काँग्रेसचे नेते अहमद पटेल उमेदवार होते. तर भाजपकडून त्यांच्यासमोर एक उमेदवार उभा करण्यात आला होता.

भाजपकडून अहमद पटेल यांच्या विरोधात काँग्रेसमधूनच आलेले बलवंत राजपूत यांना संधी देण्यात आली होती. त्यामुळे 45 मतांची ही लढाई अधिक रंजक बनली होती. मात्र, निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या अनेक आमदारांनी राजीनामा दिला होता आणि नेमकी हीच बाब काँग्रेससाठी चिंतेचा विषय बनला होता. अशास्थितीत अहमद पटेल यांना मात देण्यासाठी भाजपनं रणनिती आखली होती. स्वत: अमित शाह यांनी या निवडणुकीत लक्ष घातलं होतं.

निवडणूक आयोगाकडून विशेषाधिकाराचा वापर

मतदान पार पडल्यानंतर दोन्ही बाजूचे नेते अर्ध्या रात्री निवडणूक आयोगाकडे पोहोचले होते. काँग्रेसच्या दोन आमदारांनी मतदान केल्यानंतर बूथबाहेर उभ्या असलेल्या अमित शाह यांना व्हिक्ट्री साईन दाखवलं, असा आक्षेप काँग्रेसनं घेतला होता. त्यामुळे त्यांचं मत रद्द करण्यात आलं. रात्री उशिरापर्यंत काँग्रेस आणि भाजपचे नेते निवडणुकीत आयोगाकडे चकरा मारत होते. अखेर रात्री 12 नंतर निवडणूक आयोगाने आपला अंतिम निकाल जाहीर केला. आयोगाने आपल्या संवैधानिक अधिकारांचा वापर करत रिटर्निंग ऑफिरसरचा मतं वैध ठरवण्याचा निर्णय रद्द केला. आयोगाने संविधानाच्या कलम 324 वर भर दिला. हे कलम आयोगाला निवडणूक प्रक्रियेचं संचलन करणाऱ्या लोकप्रतिनिधी कायद्यात समावेश नसलेल्या परिस्थितीत मुक्त आणि निष्पक्ष निवडणूक घेण्याचा अधिकार देतं.

Follow Us
पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
Rohit Pawar | रोहित पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले.....
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले, पश्चात्ताप झाला असेल तर या... रोख कुणाकडे?
काँग्रेसच्या झेंड्याखाली या...राऊतांच्या एका वक्तव्याने चर्चांना उधाण
Sanjay Raut UNCUT | काँग्रेसच्या झेंड्याखाली या... संजय राऊतांच्या त्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ....
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ एवढे टक्के साठा...
विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय
tv9 Marathi Special Report | विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय! राजकारणातील सर्वात मोठा ट्विस्ट
राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होणार?
Nana Patole On NCP Merger | राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होणार? नाना पटोलेंच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या हलाचाली, नेमकं काय घडलं?
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या विधानाची चर्चा, नेमकं काय म्हणाले?
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप प्रदेशाध्यक्षांच्या भेटीला; नेमकं काय घडतंय?*
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट...
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट म्हणाल्या न्याय देण्यासाठी...