AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rajya Sabha Election 2022: काय होती अहमद पटेल केस? जिच्या आधारावर भाजपानं मविआचे तीन मतं बाद करण्याची मागणी केलीय, अमित शहांना बसला होता झटका

Rajya Sabha Election : 2017 मध्ये गुजरातमध्ये काँग्रेस नेते अहमद पटेल यांच्या केसमध्ये नेमकं काय घडलं होतं? हे जाणून घेणं महत्वाचं ठरणार आहे. कारण, त्याच धर्तीवर भाजपकडून मविआची मतं बाद करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Rajya Sabha Election 2022: काय होती अहमद पटेल केस? जिच्या आधारावर भाजपानं मविआचे तीन मतं बाद करण्याची मागणी केलीय, अमित शहांना बसला होता झटका
अमित शाह, अहमद पटेल (फाईल फोटो)Image Credit source: TV9
sagar joshi
sagar joshi | Updated on: Jun 10, 2022 | 7:05 PM
Share

मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajya Sabha Election) आज मतदान पार पडलं. मात्र, 5 वाजता सुरु होणारी मतमोजणी अद्यापही सुरु झालेली नाही. कारण, भाजपकडून महाविकास आघाडीच्या दोन आमदारांच्या मतदानावर आक्षेप घेण्यात आलाय. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी आपली मतपत्रिका जयंत पाटील यांच्या हातात दिली आणि महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी आपली मतपत्रिका नाना पटोले यांच्या हातात दिल्याचा आक्षेप भाजपकडून घेण्यात आला आहे. त्यानुसार भाजपकडून केंद्रीय निवडणूक आयोगाला (Central Election Commission) पत्र लिहिण्यात आलंय. त्यामुळे राज्यसभेची मतमोजणी अद्यापही सुरु करण्यात आलेली नाही. अशावेळी 2017 मध्ये गुजरातमध्ये काँग्रेस नेते अहमद पटेल यांच्या केसमध्ये नेमकं काय घडलं होतं? हे जाणून घेणं महत्वाचं ठरणार आहे. कारण, त्याच धर्तीवर भाजपकडून मविआची मतं बाद करण्याची मागणी करण्यात आली आहे.

भाजपकडून राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड, काँग्रेसच्या यशोमती ठाकूर आणि शिवसेनेचे सुहास कांदे यांच्या मतांवर आक्षेप घेण्यात आला आहे. यशोमती ठाकूर, जितेंद्र आव्हाड आणि सुहास कांदे यांनी स्वत:च्या पक्षाच्या निवडणूक प्रतिनिधीशिवाय व्यक्तींना त्यांची मतपत्रिका दाखवून मतदानाच्या प्रक्रिया पाळली नाही, अशी तक्रार भाजपकडून करण्यात आली आहे. तसंच 2017 मध्ये अहमद पटेल प्रकरणात निवडणूक आयोगाने निवडणूक नियमांचे उल्लंघन करुन टाकलेले कोणतंही मत मतदानाच्या किंवा मतमोजणीच्या वेळी रद्द केले जाईल, अशी अट घातली होती. त्यामुळे अहमद पटेल 2017 मध्या कशाप्रकारे विजयी ठरले हे जाणून घेणं महत्वाचं आहे.

2017 मध्ये अहमद पटेल प्रकरणात काय घडलं होतं?

2017 मध्ये गुजरात विधानसभा निवडणुकीच्या आसपास राज्यसभा निवडणूक झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन भाजप अध्यक्ष अमित शाह हे केंद्रीय राजकारणात गेल्यानंतर तिथे पहिलीच निवडणूक होत होती. त्यामुळे संपूर्ण देशाचे डोळे या निवडणुकीकडे लागले होते. राज्यसभेच्या तीन जागांवर गुजरातमध्ये निवडणूक पार पडली होती. ज्यात दोन जागांवर भाजपचा विजय निश्चित मानला जात होता. तर एका जागेबाबत अनिश्चितता होती. तिसऱ्या जागेवर काँग्रेसचे नेते अहमद पटेल उमेदवार होते. तर भाजपकडून त्यांच्यासमोर एक उमेदवार उभा करण्यात आला होता.

भाजपकडून अहमद पटेल यांच्या विरोधात काँग्रेसमधूनच आलेले बलवंत राजपूत यांना संधी देण्यात आली होती. त्यामुळे 45 मतांची ही लढाई अधिक रंजक बनली होती. मात्र, निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या अनेक आमदारांनी राजीनामा दिला होता आणि नेमकी हीच बाब काँग्रेससाठी चिंतेचा विषय बनला होता. अशास्थितीत अहमद पटेल यांना मात देण्यासाठी भाजपनं रणनिती आखली होती. स्वत: अमित शाह यांनी या निवडणुकीत लक्ष घातलं होतं.

निवडणूक आयोगाकडून विशेषाधिकाराचा वापर

मतदान पार पडल्यानंतर दोन्ही बाजूचे नेते अर्ध्या रात्री निवडणूक आयोगाकडे पोहोचले होते. काँग्रेसच्या दोन आमदारांनी मतदान केल्यानंतर बूथबाहेर उभ्या असलेल्या अमित शाह यांना व्हिक्ट्री साईन दाखवलं, असा आक्षेप काँग्रेसनं घेतला होता. त्यामुळे त्यांचं मत रद्द करण्यात आलं. रात्री उशिरापर्यंत काँग्रेस आणि भाजपचे नेते निवडणुकीत आयोगाकडे चकरा मारत होते. अखेर रात्री 12 नंतर निवडणूक आयोगाने आपला अंतिम निकाल जाहीर केला. आयोगाने आपल्या संवैधानिक अधिकारांचा वापर करत रिटर्निंग ऑफिरसरचा मतं वैध ठरवण्याचा निर्णय रद्द केला. आयोगाने संविधानाच्या कलम 324 वर भर दिला. हे कलम आयोगाला निवडणूक प्रक्रियेचं संचलन करणाऱ्या लोकप्रतिनिधी कायद्यात समावेश नसलेल्या परिस्थितीत मुक्त आणि निष्पक्ष निवडणूक घेण्याचा अधिकार देतं.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार