AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rajya Sabha Election 2022 : आमदार सुहास कांदे यांचं मत बाद! भाजपनं आक्षेप घेतल्यानंतर निवडणूक आयोगाचा निर्णय, शिवसेनेला मोठा धक्का

सुहास कांदे यांनी आपली मतपत्रिका आपल्या पोलिंग एजंटला मत दाखवताना इतरांनाही दाखवलं, असा आक्षेप भाजपनं घेतला होता. त्यामुळे आता सुहास कांदे यांचं मत बाद करण्यात आलं आहे.

Rajya Sabha Election 2022 : आमदार सुहास कांदे यांचं मत बाद! भाजपनं आक्षेप घेतल्यानंतर निवडणूक आयोगाचा निर्णय, शिवसेनेला मोठा धक्का
सुहास कांदे यांचं मत बाद, शिवसेनेला धक्काImage Credit source: TV9
sagar joshi
sagar joshi | Updated on: Jun 11, 2022 | 1:24 AM
Share

मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या (Rajya Sabha Election) मतमोजणीला अखेर सुरुवात झाली आहे. मात्र, यावेळी शिवसेनेला मोठा धक्का बसलाय. कारण आमदार सुहास कांदे यांचं मत बाद ठरवण्यात आलं आहे. सुहास कांदे (Suhas Kande) यांनी आपली मतपत्रिका आपल्या पोलिंग एजंटला मत दाखवताना इतरांनाही दाखवलं, असा आक्षेप भाजपनं घेतला होता. त्यामुळे आता सुहास कांदे यांचं मत बाद करण्यात आलं आहे. 10 जून रोजी महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 6 जागांसाठी मतदान झालं. त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता मतमोजणीला (Counting) सुरुवात होणार होती. मात्र, महाविकास आघाडी आणि भाजपकडून एकमेकांच्या काही आमदारांच्या मतांबाबत आक्षेप घेण्यात आला त्यामुळे रात्री उशिरा मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

सुहास कांदेंची पहिली प्रतिक्रिया

दरम्यान, माझं मत बाद झालं याबाबत कायदेशीर पुरावा माझ्याकडे आलेला नाही. माझ्याकडे ते आलं तर मी माझ्या पक्षाच्या नेत्यांना आणि कायदेतज्ज्ञांना दाखवून पुढचा निर्णय घेईल, अशी प्रतिक्रिया सुहास कांदे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना फोनवरुन दिलीय.

आता मतांचं गणित कसं असणार?

एक मत बाद झाल्याने आता 284/7+1 = 40.58. म्हणजे आता मतांचा कोटा 41 झाला आहे. त्यामुळे पहिल्या पसंतीची 41 मते ज्या उमेदवाराला पडणार तो उमेदवार विजय होणार आहे.

सुहास कांदेंवरचे आक्षेप काय?

>> मतदारानं मतप्रत्रिकेची घडी घालणं गरजेचं असतं, पण कांदेंनी मतपत्रिकेची घडी घातली नाही >> सुहास कांदेंनी आपल्या पक्षाच्या प्रतिनिधीला मतदान कक्षाच्या बाहेरुन मतपत्रिका दाखवली >> त्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांना मतदान कक्षात जाण्यास सांगितलं

284 जागांची मतमोजणी होणार

राज्यसभा निवडणुकीसाठी एकूण 285 आमदारांनी मतदान केलं होतं. त्यापैकी शिवसेनेच्या सुहास कांदे यांचं मत बाद करण्यात आलं आहे. निवडणूक आयोगाने तसं जाहीर केलंय. त्यामुळे आता 284 आमदारांचं मत गृहित धरुन मतमोजणीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जातोय. 

आव्हाड, ठाकुरांचं मत वाचलं

भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांच्या मतांबाबतही आक्षेप घेतला होता. आव्हाड यांनी आपली मतपत्रिका जयंत पाटलांच्या तर यशोमती ठाकूर यांनी आपली मतपत्रिका नाना पटोले यांच्या हातात दिल्याचा आक्षेप भाजपचा होता. त्यानुसार त्यांनी निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवला होता. मात्र, निवडणूक आयोगाने त्यांचं मत वैध ठरवलं आहे. त्यामुळे वैयक्तिक आव्हाड, ठाकूर यांच्यासह राष्ट्रवादी आणि काँग्रेसला मोठा दिसाला मिळालाय.

भाजपलाही दिलासा

दुसरीकडे महाविकास आघाडीकडून भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार आणि अपक्ष आमदार रवी राणा यांच्या मतांवर आक्षेप घेतला होता. सुधीर मुनगंटीवार यांनी आपली मतपत्रिका आशिष शेलार आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे दिल्याचा आक्षेप नोंदवला होता. तर रवी राणा यांनी हनुमान चालिसा दाखवत हिंदू मतं प्रभावित करण्याचा आक्षेप शिवसेनेनं नोंदवला होता. मात्र, या दोघांना आणि भाजपला मोठा दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळत आहे.

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...