AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यपाल दोघांना बोलावतील, पण आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होणे शक्य नाही : रामदास आठवले

राज्यपाल हे दोन दिवसात शिवसेना आणि भाजपला निमंत्रण देतील, असं माध्यमांशी बोलताना आठवले यांनी सांगितलं. मात्र, वरळीचे नवनिर्वाचित आमदार आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री होणे शक्य नाही, असंह रामदास आठवले यांनी सांगितलं.

राज्यपाल दोघांना बोलावतील, पण आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होणे शक्य नाही : रामदास आठवले
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: Nov 02, 2019 | 1:09 PM
Share

मुंबई : महायुतीतील घटक पक्षातील नेत्यांनी आज (2 नोव्हेंबर) राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेऊन भाजपला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रित करावं, अशी विनंती केली. यावेळी घटक पक्षांच्या इतर नेत्यांसोबतच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athawale) हे देखील उपस्थित होते. यावेळी राज्यपाल हे दोन दिवसात शिवसेना आणि भाजपला निमंत्रण देतील, असं माध्यमांशी बोलताना आठवले यांनी सांगितलं. तसेच, वरळीचे नवनिर्वाचित आमदार आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री होणे शक्य नाही, असंही ते म्हणाले (Ramdas Athawale on Aditya Thackeray). शिवाय, शिवसेनेने भाजपची ऑफर स्वीकारावी असा सल्लाही त्यांनी दिला.

‘शिवसेना काँग्रेससोबत जाणे योग्य नाही, शिवसेनेने भाजपसोबत जायला हवं. भाजपची ऑफर स्वीकारुन शिवसेनेने सत्तेत यावं’, असं आवाहन आठवले यांनी शिवसेनेला केलं. तसेच, राज्यपाल हे येत्या दोन दिवसात भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांना निमंत्रण देतील, असंही त्यांनी सांगितलं.

आदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात यावं : आठवले

शिवसेना भाजपमध्ये ज्या मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच सुरु आहे त्यावरही रामदास आठवले यांनी भाष्य केलं. आमदार आदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात यावं, असं मत त्यांनी व्यक्त केलं. तसेच, सत्ता वाटपाच्या मुद्यावरही आठवले यांनी खुलासा केला. शिवसेनेला पूर्वी 13 मंत्रिपद होते, आता त्यांना 16 मंत्रिपदं देण्यात येणार आहे, असं त्यांनी सांगितलं.

त्याशिवाय, भाजप आणि शिवसेनेच्या 50-50 च्या फॉर्म्युलावरही रामदास आठवले यांनी वक्तव्य केलं. ’50-50 मध्ये जागांबाबत बोलणी झाली होती, मुख्यमंत्रीपदाबाबत काहीही चर्चा नव्हती’, असं रामदास आठवले यांनी सांगितलं. तसेच, ‘1995 मध्ये शिवसेनेच्या जागा जास्त होत्या, म्हणून त्यांचा मुख्यमंत्री झाला. मात्र, आज आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होण्याबाबत शिवसेनेचं मत साध्य होणार नाही’, असं रामदास आठवले यांनी स्पष्ट केलं.

संजय राऊत यांनी तोडण्याचा नाही तर जोडण्याचा प्रयत्न करावा : आठवले 

रामदास आठवले यांनी संजय राऊतांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले. संजय राऊत यांनी तोडण्याची भूमिका घेण्यापेक्षा जोडण्याची भूमिका घ्यावी, असा सल्लाही त्यांनी दिला. तसेच, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या राष्ट्रपती राडवटीच्या वक्तव्यावरही रामदास आठवले यांनी स्पष्टीकरण दिलं. राष्ट्रपती राजवट ही सरकार बनलं नाही, तर कायद्यानुसार लागू होऊ शकते, असं ते म्हणाले. तसेच, आमच्याकडे 120 जागा आधीच आहेत, आता बहुमत कसं मिळवायचं याचं प्लॅनिंग सुरु असल्याचंही त्यांनी सांगितलं.

राज्यपालांच्या भेटीदरम्यान, राज्यातील ओल्या दुष्काळाबाबतही चर्चा झाल्याचं आठवले यांनी सांगितलं. शेतकरी दुष्काळामुळे हवालदील झाले आहेत, पीकं उद्ध्वस्त झाली आहेत, अशा शेतकऱ्यांना मदत करावी ही मागणी राज्यपालांतकडे केल्याचं आठवले यांनी सांगितलं.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...