AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘त्या’ प्रतिज्ञेला भाजपचा आक्षेप; रामदास आठवले म्हणतात, 22 प्रतिज्ञा आम्हाला मान्य

मी स्वतः बौद्ध असून 22 प्रतिज्ञाला माझा कायम पाठिंबा राहिला आहे. त्यामुळे मी कधीही 22 प्रतिज्ञाना विरोध केला नाही. जर कुठे माझ्या वक्तव्यातून तसा अर्थ बोध होत असेल तर मी स्वतः त्या शब्दांना मागे घेतो.

'त्या' प्रतिज्ञेला भाजपचा आक्षेप; रामदास आठवले म्हणतात, 22 प्रतिज्ञा आम्हाला मान्य
'त्या' प्रतिज्ञेला भाजपचा आक्षेप; रामदास आठवले म्हणतात, 22 प्रतिज्ञा आम्हाला मान्यImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 15, 2022 | 1:51 PM
Share

मुंबई: नागपूरमध्ये धम्म चक्र परिवर्तन दिनानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात दिल्लीतील आपच्या मंत्र्याने हजेरी लावली. या सोहळ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर (babasaheb ambedkar) यांनी आपल्या अनुयायांना दिलेल्या 22 प्रतिज्ञा वाचण्यात आल्या. त्यात राम, कृष्ण यांना देव मानणार नसल्याचा उल्लेख आहे. आपच्या नेत्याने ही प्रतिज्ञा घेतल्याने भाजपने त्याला विरोध केला आहे. भाजपने (bjp)आप नेत्याला हिंदू विरोधी ठरवले आहे. यावरून वाद सुरू असतानाच भाजप सरकारमधीलच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी 22 प्रतिज्ञांचं समर्थन केलं आहे. आम्हाला 22 प्रतिज्ञांचा अभिमान आहे. या प्रतिज्ञा आम्हाला मान्य आहेत आणि प्रत्येक बौद्धाने या प्रतिज्ञांचं पालन केलं पाहिजे, असं रामदास आठवले (ramdas athawale)यांनी म्हटलं आहे. आठवले यांच्या या भूमिकेमुळे भाजपची चांगलीच कोंडी झाली आहे.

रामदास आठवले यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. रामदास आठवले यांनी मध्यंतरी 22 प्रतिज्ञेबाबत आपली भूमिका मांडली होती. मात्र, त्यांच्या म्हणण्याचा विपर्यास करण्यात आला. त्यावर खुलासा करताना त्यांनी हे विधान केलं आहे.

बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी ऐतिहासिक धर्मांतर केले होते. यावेळी त्यांनी देशभरातील आपल्या लाखो अनुयायांना 22 प्रतिज्ञा दिल्या होत्या. या प्रतिज्ञा आम्हाला मान्य आहेत. या प्रतिज्ञांचा आम्हाला अभिमान असून या 22  प्रतिज्ञा बौद्ध आदर्श जीवनमार्ग शिकविणाऱ्या आहेत. आम्ही या प्रतिज्ञांचे पालन करतो, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

प्रत्येक बौद्धाने या 22 प्रतिज्ञाचे  पालन केले पाहिजे. धम्म दीक्षा विधीमध्ये हिंदू धर्मातून धर्मांतर करून बौद्ध धम्म स्वीकारणाऱ्या प्रत्येकाला या 22 प्रतिज्ञा दिल्या जातात, असं सांगतानाच 22 प्रतिज्ञांच्या भूमिकेबाबत समाज माध्यमांवर काही ठिकाणी अपल्याबाबत चुकीची बातमी प्रसारित होऊन अपल्याबाबत गैरसमज पसरविण्यात येत आहेत, असं ते म्हणाले.

मी स्वतः बौद्ध असून 22 प्रतिज्ञाला माझा कायम पाठिंबा राहिला आहे. त्यामुळे मी कधीही 22 प्रतिज्ञाना विरोध केला नाही. जर कुठे माझ्या वक्तव्यातून तसा अर्थ बोध होत असेल तर मी स्वतः त्या शब्दांना मागे घेतो. मात्र मी कधीही वेगळी आणि चुकीची भूमिका घेतली नाही. या 22 प्रतिज्ञांना मी कधीच विरोध केला नाही, असंही त्यांनी सांगितलं.

बाबासाहेबांना मुंबईच्या रेसकोर्सवर भव्य धर्मांतर सोहळा घडवून आणायचा होता. पण त्यापूर्वीच त्यांचं निधन झालं. त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्याचा मी निर्धार केला होता. त्यानुसरा आम्ही 2006मध्ये रेसकोर्सवर धम्मदीक्षा सोहळ्याचं आयोजन केलं होतं. याशिवाय वर्ल्ड बुद्धिस्ट सोसायटी या बौद्धांच्या जागतिक संघटनेच्या उपाध्यक्षपदीही मी काम केलं आहे. त्यामुळे 22 प्रतिज्ञांना माझा विरोध कसा असेल? असा सवाल आठवले यांनी केला आहे. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. सोशल मीडियावरील गैरसमजावर विश्वास ठेवू नका, असं आवाहन आठवले यांनी केलं आहे.

Follow Us
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर.
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल.
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत.
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला...
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला....
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू.
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....