.
AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दोन दसरा मेळावे होत आहेत, पण मी समाधानी नाही; मेळाव्या आधीच रामदास कदमांचा खडा?

शरद पवारांसारखी व्यक्ती वयाच्या 82 व्या वर्षी संपूर्ण कोकणात फिरते. या कोकणात शिवसेना मोठी केली. मात्र उद्धव ठाकरे कोकणात फिरकलेही नाहीत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

दोन दसरा मेळावे होत आहेत, पण मी समाधानी नाही; मेळाव्या आधीच रामदास कदमांचा खडा?
दोन दसरा मेळावे होत आहेत, पण मी समाधानी नाहीImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 02, 2022 | 5:02 PM
Share

कृष्णकांत साळगावकर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, रत्नागिरी: शिवसेनेचा (shivsena) दसरा मेळावा मुंबईतील (dussehra rally) दादरच्या शिवाजी पार्कात होत आहे. तर शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर होत आहे. हे दोन्ही मेळावे यशस्वी करण्यासाठी आणि जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यासाठी दोन्ही गटाने जोरदार तयारी सुरू केली आहे. मात्र, शिंदे गटाचे नेते रामदास कदम (ramdas kadam) या दोन्ही मेळाव्यांवर खूश नाहीत. दोन मेळावे होत आहेत. पण मी त्यावर समाधानी नाही, असं विधान रामदास कदम यांनी केलं आहे. शिंदे गटाच्या मेळाव्याची जय्यत तयारी सुरू असतानाच रामदास कदम यांनी हे विधान केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

रामदास कदम यांनी मीडियाशी संवाद साधताना हे विधान केलं आहे. दोन ठिकाणी वेगळा मेळावा होत आहे. जे नको व्हायला पाहिजे ते होत आहे. दोन मेळावे होत आहेत त्यामुळे आपण समाधानी नाही. पक्ष उभा केलाय. केसेस घेतल्या आहेत. सगळं आपण भोगलंय. त्यामुळे दुःख होत आहे, अशी वेदना रामदास कदम यांनी बोलून दाखवली.

शिवसेनेचे भगवे झेंडे दोन्ही ठिकाणी दिसणार आहेत. बाळासाहेबांचे फोटो सुद्धा दोन्ही ठिकाणी असतील. शिवसेनेच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडतंय. त्याचं आपल्याला दुःख झालंय, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

दोन मिळावे शिवसेनाप्रमुखांना अभिप्रेत नाही. उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे विचार मांडू शकत नाहीत. बाळासाहेबांचे विचार ऐकण्यासाठी लोकं चातकासारखे वाट बघत होते. ते विचार उद्धव ठाकरे देऊ शकत नाहीत. विचार बाळासाहेब यांचेच. बाकी कुणाचे नाही. शिवसेनेचा दसरा मेळावा म्हणजे फक्त अफजलखानाचा विषय आणि भाजप टार्गेट असेल, असा टोला त्यांनी लगावला.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेच नसते, असं विधान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलं आहे. रामदास कदम यांनी राणेंच्या या सुरात सूर मिसळला आहे. शिवसेनाप्रमुख असते तर उद्धव ठाकरे तुम्हाला मुख्यमंत्री होऊ दिलं नसतं, असं त्यांनी म्हटलंय. मुख्यमंत्री झाला आणि महाराष्ट्राला वेळ दिला नाही. म्हणून हे सर्व घडलंय, अशी टीकाही त्यांनी केली.

यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचं कौतुक केलं. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे निर्णय घेत आहेत असे निर्णय मागच्या अडीच वर्षात होऊ शकले नाहीत, अशी टीका त्यांनी केली.

शरद पवारांसारखी व्यक्ती वयाच्या 82 व्या वर्षी संपूर्ण कोकणात फिरते. या कोकणात शिवसेना मोठी केली. मात्र उद्धव ठाकरे कोकणात फिरकलेही नाहीत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

Follow Us
रावणानेही दानपेट्या लुटल्या नाहीत, पण रामभक्तांनी...
Sanjay Raut Full Press | रावणानेही दानपेट्या लुटल्या नाहीत, पण रामभक्तांनी...; संजय राऊतांचा भाजपवर जिव्हारी लागणारा वार!
एक गट इकडे म्हणतंय तर दुसरं तिकडे; राष्ट्रवादी शरद पवार गटाचं...
एक गट इकडे म्हणतंय तर दुसरं तिकडे; राष्ट्रवादी शरद पवार गटाचं विलीनीकरण... नेमकं काय घडतंय?
टीईटी पेपरफुटीमधील मुख्य सूत्रधाराच्या पत्नीला पाटणातून अटक
TET Paper Leak |  ठाणे पोलिसांची कारवाई; टीईटी पेपरफुटीमधील मुख्य सूत्रधाराच्या पत्नीला पाटणातून अटक
शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली; कोणाला मिळणार उपसभापती पद? बड्या
Vidhan Parishad | शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली; कोणाला मिळणार उपसभापती पद? बड्या नेत्यांची नावे...
शिंदे गटातील दोन प्रमुख नेते मुख्यमंत्री फडणवीसांना भेटले...
ब्रेकिंग! शिंदे गटातील दोन प्रमुख नेते मुख्यमंत्री फडणवीसांना भेटले; वर्षा बंगल्यावर नेमकं काय शिजलं?
अमरावतीत पावसाचा हाहाकार! मेघा नदीला पूर; चांदूर बाजारातील...
Amravati Rain | अमरावतीत पावसाचा हाहाकार! मेघा नदीला पूर; चांदूर बाजारातील आठवडी बाजारात शिरले पाणी
APMC मार्केटमध्ये पाणीच पाणी, पहाटेपासून मुसळधार पावसाचा कहर
Navi Mumbai Rain | APMC मार्केटमध्ये पाणीच पाणी, पहाटेपासून मुसळधार पावसाचा कहर; वाहतूक विस्कळीत
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
Dada Bhuse On Paper Leak | टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची विधानसभेत मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
Nashik | मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर, नेमकं घडलं काय?
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
CM Devendra Fadnavis | चिमुकलीला अखेर न्याय! नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया